पोस्ट्स

जाणता राजा

छत्रपती हे नाव सार्या जगामधी हे गाजे  सांगा ओरडून उभ्या जगाला शिवराय आमचे राजे ना कोणाचे भय आम्हाला ना कोणी इथे साजे शिवरायांच्या कार्तुत्वापुढे हिमालयही लाजे महासागरही छोटा वाटे असा छत्रपती माझा जगात गाजावाजा शिवराय जाणता राजा  ।। १ ।। स्वराज्याची संकल्पना जिजाऊ मासाहेबांची मेढ  रोवली शिवरायांनी रयतेच्या स्वराज्याची बांधले तोरण स्वराज्याचे हि साथ मावळ्यांची जातिभेदाला गाडून मातीत नाती जोडली मनाची महासागरही छोटा वाटे असा छत्रपती माझा जगात गाजावाजा शिवराय जाणता राजा   ।। 2 ।। रयतेच्या हितासाठी अखंड झिजला मानवतेचा कल्पतरू या भारतात रुजला स्वाभिमानी जिने जगती मराठे हे आजला प्रणाम करती दुनिया सारी शिवराया तुजला महासागरही छोटा वाटे असा छत्रपती माझा जगात गाजावाजा शिवराय जाणता राजा    ।। 3 ।। करुनी छातीचा कोठ रक्षिला समाज बहुजनांचा  रयतेसाठी लढणारा राजा तू दिनांचा स्वाभिमानी जिने आपले लढाऊ बाणा  तुमचा हाती घेवूनी तलवार  केला संहार त्या विकृती सैतानांचा महासागरही छोटा वाटे असा छत्रपती माझा जगात गाजावाजा शिवराय जा...

गद्दार लोकांचा संघ

बाबा तुझ्या पिलांना उरलाच नाही स्वाभिमान कसा वाटेल त्यांना तुझ्या कर्तुत्वाचा अभिमान झाले गद्दार तुझी लेकरे नाही राहिला त्यांचा सन्मान विकला दलालांच्या बाजारात बाबा तुझा बहुमान नाही राहिली जान त्यांना  तुझ्या उपकाराची  गद्दार झाली लेकरे तुझी अशी कथा त्यांच्या गद्दारीची ।। धृ ।। धम्म बुद्धाचा दिला  आम्हाला होण्या  बुद्धाचे अनुयायी समजलाच नाही बुद्ध आम्हाला अजून आम्ही हिंदुच्या ठायी जग चालले बुद्धासोबत आम्ही चाललो  जुन्या रूढीनिशी कधी समजणार आम्हाला बुद्ध कधी हिनर एकरूप त्याच्याशी न उमगेना न समजेना महती बुद्ध ज्ञानाची गद्दार झाली लेकरे तुझी अशी कथा त्यांच्या गद्दारीची    ।। १ ।।  धम्म घेतला ५६ झाली नागांच्या नागपुरात झालो आम्ही अजरामर त्या बुद्ध इतिहासात बाबा तुम्ही जगाला असता अजून या भारतवर्षात नक्कीच बुद्ध समजला असता आज या बहुजनात आणि आज सारा भारत गात असता  वाणी त्या बुद्धाची गद्दार झाली लेकरे तुझी अशी कथा त्यांच्या गद्दारीची    ।। २ ।। गद्दार लोकांची  कथा आहे  बहु न्यारी घराघरात यांच्या गणपतीची स...

कथा आमच्या गुलामीची

बहुजन हिताय बहुजन सुखाय  घोषवाक्य आमचे आम्हीच झालो गुलाम आम्हाला काय महत्व तयाचे ज्यांनी लाथाडले आम्हाला तयाशी नाते जुळवायचे नको हि गुलामी बंधुनो आता तुम्हीच ठरवायचे ।। धृ ।। स्वप्न आमचे स्वप्न राहिले असते कमरेचा झाडू गळ्यात गाडगेच असते गावाच्या बाहेरच होतो आता आम्हाला बाहेर फेकले असते तेव्हा जोहर करायचे आता चित्र वेगळेच असते बरे झाले बाबा तुम्ही जन्मले म्हणून नाही तर काय झाले असते या समाजाचे नको हि गुलामी बंधुनो आता तुम्हीच ठरवायचे   ।। १ ।। ज्यांचे होते जीवन  यातानाचा सागर त्याला जतिनिर्मित नद्यांची भर करून गुलाम मानवाला जाती  जातीचा डोंगर म्हणूनच बाबासाहेबांनी निवडला बुद्ध महासागर आव्हान केल बाबांनी अश्या समाजाला सार्थक करण्या जीवन तयाचे नको हि गुलामी बंधुनो आता तुम्हीच ठरवायचे    ।। २।। मनुस्मृतीने  घातले शुद्राच्या जन्माला गीतेत जन्म आमचा पाप योनीत झाला पुराने घालती अज्ञानी म्हणून जन्माला संविधान मात्र घालते जन्माला  मानव म्हणून आम्हाला मग कशाला त्या धर्माचे अजून गोडवे गायाचे नको हि गुलामी बंधुनो आता तुम्हीच ठर...

गणतंत्र का महानायक

इमेज
भारत हा प्रजासत्ताक म्हणून जगात ओळखला  जातो त्याचे श्रेय फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर यांना जाते त्याचा सविस्तर माहिती आपण घेणार आहोत बाबासाहेब यांना गणतंत्र का महानायक म्हटले जाते त्याचे कारण आहे कारण ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीची पहिली बैठक झाली त्या तारखेकडे पहिले तर आज घटना समितीच्या कार्यास २ वर्षे ११ महिने आणि १७ दिवस पूर्ण होतात  घटना समितीची एकूण ११ अधिवेशने साली त्यापैकी सहा अधिवेशने उद्दिष्टांचा ठराव आणि मुलभूत हक्क केंद्राची घटना केंद्राचे अधिकार प्रांतिक घटना अल्पसंख्यांक जमाती शेड्युल विभाग शेड्युल जमाती यासबंधीची कमिट्याचे रिपोर्ट पास करण्यात खर्ची पडलेले आहे उरलेली पाच अधिवेशने घटना मसुद्यातील विचाराकरिता उपयोगी पडलेली आहेत घटना सभेच्या ११ अधिवेशनात एकूण १६५ दिवस असतात आणि यापैकी  घटना मसुद्याच्या विचारासाठी म्हणून फक्त ११४ दिवस उपयोगी  पडले घटना समितीच्या बैठकी प्रमाणे घटना मसुदा कमिटीतच बैठकीचा अहवाल  उपयुक्त होईल त्यावरून घटनेच्या कार्याची व तिला लागणाऱ्या वेळेची चांगली कल्पना येईल २९ ऑगस्ट १९४७ साली घटना समितीने मसुदा कमिटीची निवड ...

बाबासाहेबांच्या समाजाची विचारसरणी

दलित म्हटलं कि एका जातीकडे पाहिलं जात त्यांच्या विशिष्ट बाबींकडे पहिले जाते सामाजिक आर्थिक घटकांचा विचार करता आजच्या युगात दलित समाज काही प्रमाणात उच्चवर्गीयांच्या प्रमाणात बसतो त्यांची संकृती बदलली विचार बदलले परंतु माणसाच्या मनी असणारे भाव मात्र तेच राहतात बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलित समाजाला नवसंजीवनी देणारे अमृत तसेच कोटी कोटी बहुजनांना उद्धारण्यासाठी जन्माला आलेला कोहिनूर हिरा प्रज्ञा शील करुणा ह्या मानवाने अंगीकारल्या पाहिजेत तरच या जणांचा उद्धार होईल पण आजही दलित बांधव परंपरेच्या जाळ्यात अडकलेले आपणाला पहावयाला दिसतात मानवाच्या सदविवेक बुद्धीला पटणारे विषय या समजत घेतले जात नाही मानवता हि आजच्या माणसात दिसतच नाही बौद्ध धम्माच्या विचारांचा पगडा सार्या जगावर  असताना भारतातील दलित समाज आजही जुन्या रूढीना धरून जगात आहे सर्व प्रकारची नाहीती असतानाही जातीधर्माच्या बेड्या आपल्या पायी का बांधून घेत आहे हे समाजात नाही का त्या विषमतेच्या दरीत परत उडी मारत आहे आणि परिणाम काय तर परत त्यांना त्या नाहक हानीला सामोरे जावे लागत आहे आणि याला कारणीभूत हे दलित लोक आहे प्रथमतः दलित समाजातील...

राजकारणी भाले

आम्ही कोण म्हणुनी काय विचारता आम्ही असू लाडके दिला अधिकार बाबा भीमाने आम्हाला म्हणुनी जाहलो आम्ही बोलके करुनी चिंधड्या समजाच्या काय तुम्ही साधले भाडखावू भडव्यानो गुलामीत तुम्ही समाधान मानले ।। धृ ।। आठवलेंची किमया न्यारी केली ली भेटीस मातोश्रीवर स्वारी काय प्रीत म्हणावी ठाकरेंची प्यारी स्वार्था साठी मनुवादी जयभीम करी का विसरला नामांतर्याच्या लढ्याला तुम्ही आठवले भाडखावू भडव्यांनो गुलामीत तुम्ही समाधान मानले  ।। १ ।। गवई ची तर कथा निराळी त्यांनी तर सरळ लोटांगणच घातली बाबांच्या विचारांची त्यांनी पोथीच बांधली बाबांनी सांगितले नका जावू जळत्या घराच्या सावलीखाली यांनी मात्र तिथेच आपली आय घातली जनता मारतेय यांनी मात्र आपले घर भरले भाडखावू भडव्यांनो गुलामीत तुम्ही समाधान मानले  ।।२ ।। कवाडेनि केला केला नुसताच गाजाबाजा यांच्यामुळे बिचारा समाज भोगतोय सजा करुनी तुकडे पक्षाचे विभागला गरीबांचा राजा अजून किती नालायक होणार आता तरी लाजा बाबांनी करून एक समाज अन्याया विरुद्ध लढले भाडखावू भडव्यांनो गुलामीत तुम्ही समाधान मानले  ।। ३।। बिनबुडाच्या बांडगुलानो  आत...

विद्रोह

शोषितांचा पीडितांचा वाली भीम माझा का जलता तुम्ही भीम पाठीराखा माझा विझले नाहीत निखारे अजून त्या चितेचे आणि दुश्मनांना सामील झाले पुढारी आमचे गरज काय होती जावून मिळण्याची अश्या भेकडाना आता तरी जागे व्हा आणि उडवा लाथेने अश्या गद्दारांना ।। धृ ।। बाबांच्या चळवळीला पडुनी खिंडार गद्दारिचे अश्या भेकडांच्या पाठीत मारा भाले ते इमानाचे सांगा त्यांच्या पिलावळीला रक्त आहे हे बाबांच्या स्वाभिमानाचे विकले जाणार नाही कारण आम्ही अनुयायी बाबा भीमाचे भिक नाही घालत आम्ही तुमच्या सारख्या कापरांना आता तरी जागे व्हा आणि उडवा लाथेने अश्या गद्दारांना ।। १।। स्वाभिमानाची जान येणार रे तुम्हा मूर्खाना का लाजवता तुम्ही बाबांच्या लेकरांना होवुनी अंगार साथ द्या त्या बाबांच्या विचारांना हीच खरी ठरेल बाबाना वंदना म्हणुनी म्हणतो जागे व्हा आणि आचरणी आणा बाबांच्या विचारांना आता तरी जागे व्हा आणि उडवा लाथेने अश्या गद्दारांना  ।। २ ।। होवुनी आंधळे भक्त बाबांच्या समाजा तू नको होवू परत गुलाम तू स्वाभिमानाची जिवंत मूर्ती तू मग कशाला भटकतो दुसर्याच्या पाठीमागे तू नाही सुधारलास  तर होईल नायनाट...

वेदांमध्ये स्त्रियांचे स्थान

वेद हे हिंदूंचे प्राचीन साहित्य आहे आणि त्यानुसार हिंदू समाजातील रूढीवादी वर्ग वेद हे ईश्वर निर्मित आहेत असे ठासून सांगत असला तरी त्यातील गोष्टीवरून विशेषतः अर्ध्या मनुष्य जातीविषयी म्हणजे स्त्रीयाविषयी वेदांची रचना करणाऱ्या ना अमानुष दृष्टीकोन दिसून येतो वेदामध्ये पुत्र जन्मासाठी भरपूर प्रार्थना आहेत परंतु त्यातील कोणत्याही रुचेत मुलीच्या जन्मासाठी एकही प्रार्थना नाही उलट मुलीच्या जन्माबाबत शोक व्यक्त केलेला आहे मुलगी होवू नये म्हणून मुलाला गर्भात जपून ठेवण्याच्या अर्थाच्या प्रार्थना आपणास अथर्ववेदात {८/६/२५,६/११/३} आढळतात यजुर्वेदचा पोटग्रंथ असलेला शतप्रथ  ब्राह्मण यामध्ये {५/३/२/२} पुत्र नसलेल्या स्त्रीची निंदा करून तिला अभागिन म्हटले आहे या ग्रंथानुसार स्त्रिया शुद्र कुत्रे गाई मध्ये असत्य पाप व काळोख वसतो यजुर्वेद सांगतो कि स्त्रिया ह्या अबला व संपत्तीत वाटा मिळवण्यास अपात्र असतात आणि त्या दृष्ट माणसापेक्षाही नीच बोलतात { तैतरीया संहिता , ६/५/८/२} ऋग्वेदानुसार {८/३३/१७} स्त्रीचे मन डवने कठीण असते ती अल्प मती  असते स्त्रीयाबरोबर मैत्री होऊ शकत नाही त्यांची ...

शिवरायांचे संदेश वहन

छत्रपती शिवराय यांच्या काळी दूरध्वनी भ्रमणध्वनी किंवा मोबाईल  फोन वैगरे काही नव्हते तरीही या जाणत्या राजाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर खूप चांगल्या प्रकारची संदेश वहनाची यंत्रणा एकदम उत्कृष्ट दर्जाची बनवण्यात यश मिळवले होते आजही जगातील सर्वात वेगवान आणि जलद समजल्या जाणऱ्या दोनच शक्ती शास्त्रज्ञाना माहित आहेत एक ध्वनी आणि दुसरा प्रकाश आज सर्वात वेगाने उडणारे विमान ध्वनीच्या गतीने मोजले जाते विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या जन्मापूर्वी डोळसपणे याच उपयोग स्वराज्यासाठी करणारा जनता राजा म्हणून शिवराय आपल्या समोर येतात आपणाला शिवरायांची संदेश वहनाची यंत्रणा समजून घेण्यासाठी स्वराज्यातील एका प्रसंगाचे वर्णन आपण पाहूया छत्रपती शिवरायांच्या लढाया या दिवसा हि होत आणि रात्री हि होत त्यामुळे रात्री आणि दिवसा संदेश वहनाची यंत्रणा विचार करून चालवली जात होती एका किल्ल्यावरून दुसऱ्या  किल्ल्यावर संदेश देण्याची महाराजांनी अमलात आणलेली यंत्रणा थक्क करून सोडणारी आहे त्यावेळी सर्वात वेगवान वाहन म्हणजे घोडेस्वारी परतू या संपर्कात विशिष्ट मर्यादा येतात उदा. शत्रूने घोडा अडविल्यास किंवा किल्ल्य...

विद्रोही कविता

आण्णा हजारे यांच्या उपोषणानंतर एक विद्रोही कवी काय म्हणतो पहा हजारे तुम्ही केल उपोषण शाही मंचावर काय सबंध सामान्य जनतेच्या प्रश्नांचा जिथे लोक मारतात उपाशी तिथे गरज काय लोकपालचि आता झाले कि पांढरे केस मग आय कशाला घालायची दिल्हीत झाला बलात्कार पण मुलगी निघाली सवर्नाचि कोण म्हणे निर्भया कोण म्हणे दामिनी नेली तिला उपचारासाठी वारी त्या परदेशाची हत्याकांड झाल खैरलांजीच तिथे दिली बातमी प्रियांकाच्या शरीराचे तोडले लचके ते नीच नराधमि चार दिवस सडत होती प्रेत दया नाही आली त्यांची कारण लेक होती ती जयभीम वाल्याची आता झाले कि पांढरे केस मग आय कशाला घालायची इथे मारल्या जातात आमच्या बहिणी दिवसा आणि  रात्री तरीही आमची लोक गुलामी करत आहेत होवून त्यांची कुत्री होता एकीवर बलात्कार सारे मेणबत्त्या घेवून आले रस्त्यावर इथे भर दिवसा आमच्या आया बहिणीची इज्जत मांडतात हे चव्हाट्यावर तेव्हा कुठे जाते अस्मिता या देशाची आता झाले कि पांढरे केस मग आय कशाला घालायची एक बलात्कार होता कशी मिर्ची  लागली आमची बहिण मृत्युच्या दारात आम्ही सोडली तेव्हाच आला असता रस्त्यावर जेव्हा झाली खैरलांजी ...