पोस्ट्स

मार्च २, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जागतिक महिला दिन व आजची महिलांची मनस्थिती

भारतामध्ये जेवढी स्त्रियांची अवनती झाली, तेवढी कोणत्याही देशात झाली नाही. स्त्रियांना या देशात अत्यंत हिन व पुरुषांपेक्षा दुय्यम स्थान देण्यात आले. स्त्रियांच्या या अवनतीस ब्राम्हणवादी व्यवस्था कारणीभूत आहे. स्त्रियांना परंपरागत गुलामगिरीतून काढून तिला स्वातंत्र्य देण्याचे व तिचे उध्दार करण्याचे कार्य भगवान बुध्द, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी केले आहे. त्यांनी जे  स्त्री मुक्तीसाठी कार्य केले त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. काळ जसजसा पुढे सरकेल, येणारी पिढी प्राचिन भारतातील गुलाम स्त्री व आधुनिक भारतातील स्वतंत्र्य स्त्री यांचा तुलनात्मक अभ्यास करेल, तेव्हा संपुर्ण देश फुले-आंबेडकरांच्या स्त्री मुक्तीच्या कार्यापुढे झुकल्याशिवाय राहणार नाही. प्राचिन भारतातील मनुस्मृतीचे कायदे व प्रथा स्त्रियांसाठी कसे जाचक होते व हे अन्यायी कायदे फुले-आंबेडकरांनी कसे बदलविले ते पुढिल आलेखावरुन दिसून येईल. १. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-१८ व २-२६ नुसार  स्त्रियांना वेदाभ्यास व विद्या संपादन करण्याचा अधिकार नाकारण्यात आला. एवढेच नव्हे तर आपस्तंभ धर

धम्माची भूक

सहा डिसेंबर ५६ साली बहुजनाची झोप उडाली वाली दिनांचा सोडूनी गेला जनता सारी पोरकी झाली चैत्यभूमीच्या त्या जागेवर जनता म्हणे थांबा धम्माची दीक्षा द्या बाबा तुम्ही धम्माची दीक्षा द्या बाबा ।।धृ ।। बाबासाहेब वदले होते येईन मी मुंबईला धम्माची दीक्षा देईन म्हणाले तुम्हला तारीख हि निश्चित केली होती त्यांनी त्या समयाला पण क्रूर काळाने बघा कसा हा घात आमचा केला चैत्यभूमीच्या त्या जागेवर जनता म्हणे थांबा धम्माची दीक्षा द्या बाबा तुम्ही धम्माची दीक्षा द्या बाबा   ।। १ ।। १६ डिसेंबर तारीख होती मुंबईच्या धर्मांतराची पण बातमी आली दिल्लीवरून बाबांच्या महापरीनिर्वाणाची जनता हि झाली अबोल करूण कहाणी त्यांची बाबांसाठी धावुनी गर्दी ती चैत्यभूमीवरची चैत्यभूमीच्या त्या जागेवर जनता म्हणे थांबा धम्माची दीक्षा द्या बाबा तुम्ही धम्माची दीक्षा द्या बाबा        ।। २ ।।  अंत्ययात्रा हि बाबांची चालली सोबत  लोटला जनसागर कोटी कोटी आसवांचा पूर आला दादरच्या भूमीवर झिजला चंदनापरी कोटी कोटी उपकार आम्हावर भीम पहिला मी तेव्हा चंदनाच्या चितेवर चैत्यभूमीच्या त्या जागेवर जनता म्हणे थांबा धम्माची दीक्षा द्

अशोकचक्रातील आरा व त्यांचे महत्व

इमेज
शोध अशोक चक्रातील चोवीस आरयाचा भारताच्या तिरंग्यात अशोक चक्र आपण पाहतो आणि त्या अशोक चक्रात चोवीसच आरया  आहेत आता त्या आरया  चोवीसच का ह्यामागचा शोध  घेणे आवश्यक आहे आणि त्या आरया चा अर्थ काय हे पाहणे आवश्यक आहे बाबासाहेबांनी अगदी जाणीवपूर्वक त्याचा शोध घेतला बाबासाहेबांचा त्याबाबतच संशोधन मी फक्त इथे मांडत आहे ते माझ वैयक्तित मत नाही आणि असा कोणता विचारही नाही कारण आज आपल्याला बरेच विचारवंत दिसतात जे बाबासाहेबांचे विचार स्वताच्या नावावर लावतात कारण या जगात असा कोणता विचार बाबासाहेबांनी केला नाही असे मला अजिबात वाटत नाही म्हणून मी  नेहमी बाबासाहेबांच्या विचाराची मांडणी करण्याचा प्रयत्न करतो कारण मी कोणी प्रगल्भ ज्ञानी नाही एक बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून आहे ज्याने फक्त बाबासाहेबांचा विचार आपल्या मनात कोरला आहे ह्याव्यतिरिक्त  काही नाही माझ्या बद्दल सांगायचं तर एक साधारण घरातील एक सामान्य मुलगा ज्याच शिक्षणही जास्त नाही जेमतेम बारावी पर्यंतच आहे पण बाबासाहेब आणि त्यांचे विचार हे माझ्या जीवनच सत्य आहे आणि ते कोणी नाकारू शकत नाही   आता आपण बाबासाहेब प्रेरित अशोक चक्र

पुनर्जन्म कशाचा होतो

पुनर्जन्म कशाचा होतो  जेव्हा कि पुनर्जन्म घडवून आणणारी आत्मा नावाची कोणतीही गोष्ट नाही अस्तित्वात असल्याचे सिद्ध होत नाही त्या अत्त्या आत्म्याचा पुनर्जन्म होतो हा ईश्वरवादी धर्माचा सिद्धांत मान्य करण्यासारखा नाही म्हणून भगवान बुद्धाने ईश्वर आत्मा परमात्मा या गोष्टी नाकारल्या आहेत म्हणून पुनर्जन्म कोणाचा आणि कशाचा होतो या दोन प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे लागते हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे म्हणून आपण प्रथम पुनर्जन्म कशाचा होतो यावर विचार करू भगवान बुद्धाच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे चार घटक पदार्थ आहेत पृथ्वी जल तेज आणि वायू हे होत प्रश्न असा आहे कि मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या चार भौतिक घटकांचे काय होते मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय काही म्हणतात होय काही म्हणतात होय पण तथागत बुद्ध म्हणतात नाही ते घटक पदार्थ आकाशात तरंगणाऱ्या त्याच पदार्थाच्या समूहाला मिळतात तेव्हा विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली म्हणजे च्युतीचीत्त अंदाणु आणि शुक्राणू मिळाल्यावर नवा जन्म होतो या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या घटक कुणीतरी एका विशिष्ट मृत शरीर