पोस्ट्स

नोव्हेंबर १, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अयोध्या : बुद्धकालीन साकेत

रामायणात रामाचे राज्य हे अयोध्येत होते असे सांगितले जाते त्याचा एक भाग म्हणून अयोध्या आहे हि सरयू नदीच्या काठावर आहे असे सांगितले जाते पण याच अयोध्येला बुद्धाने भेट दिल्याचे पुरावे आहेत इसवी सन पूर्व सहाव्या शतकात आले होते आता हि अयोध्या नेमकी काय कशी झाली याची काही उदाहरणे सुद्धा आहेत इ सन पाचव्या शतकात कालिदास नावाचा कवी होवून गेला त्याने  रघुवंश नावाचे महाकाव्य लिहिले पण हा कवी या स्थानाचे नाव कधी अयोध्या तर कधी साकेत असे उल्लेख करतो त्यावेळी मात्र प्रश्न निर्माण होतो तो असा कि हे स्थान त्यावेळी बौद्धांचे प्रसिद्ध महानगर व मोठे व्यापारी केंद्र साकेत तर नसावे ?  यासाठी बौद्धांचे साकेत कसे होते हे देखील पाहू या  बुद्धपूर्व काळात भारत सोळा जनपदांमध्ये विभागाला होता ती जनपदे अशी होती  काशी कोसल अंग मगध वज्जि मल्ल चेदी वत्स क्रुरु पंचाल मत्स्य सुरसेन अस्सक अवंती गंधार आणि कम्भोज  यामध्ये अनेक शहरे आणि निगम  व गावे  होती परंतु महानगरे फक्त सहा होती ती अशी चंपा राजगृह श्रावस्ती साकेत कोशांबी आणि वाराणशी  अशी महानगरे होती याकाळात बुद्धाचे महापरी निर्वाण झाले तेव्हा आनंद याने तथागत यांन