पोस्ट्स

जानेवारी २२, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ८

सम्यक समाधी :  ह्या मध्ये माणसाच्या मनातील विकार शांत होऊन मन एककेंद्रित होणे आवश्यक  असते. कायिक क्लेशांना न जुमानता साधकाने मन एकाग्र केले पाहिजे. त्यामुळे कायम चित्तशुद्धी होते व चित्तकायशुद्धीतून प्रज्ञा प्रकाशमान होते. अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे मानवाचा स्वतःच्या मनावर ताबा मिळवणे हे होय. मानवाने मनावर नियंत्रण ठेवल्यास त्याच्या वागण्या बोलण्यावर व त्याच्या कृतीमध्ये खूप बदल  जाणवतो यालाच त्याची प्रज्ञा जागृत होणे म्हणतात हा अष्टांग मार्गातील शेवटचा मार्ग आहे कारण ज्याच्या अंगी प्रज्ञा जागृत झाली असेल तोच व्यक्ती शील करुणा अंगी धारण करून निर्वाणाकडे झुकलेला असतो म्हणून हा मार्ग  बुद्धाच्या शिकवणीत शेवटचा आहे. प्रथम हे लक्षात घ्यावे कि समाधी मार्ग बुद्धाने शेवटचा मार्ग सांगण्यामागे सुद्धा कारण आहे इतर लोकांनी समाधी  प्रथम सांगितली आहे ध्यान प्रथम सांगितले आहे पण बुद्ध मात्र ते शेवटचा मार्ग सांगतात. आता याचा संतांवर किती प्रभाव आहे तो पाहू या. बहुतांश संतांचा एकांतात बसून चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.  आणि सर्वच संतांनी यावर भर दिलेला आहे ध्यानी योगीराज बै

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ७

सम्यक स्मृती { Right Mindfulness }: अखंड जागरूकता म्हणजे सम्यक स्मृती होय. कोणतीही क्रिया करताना किंवा अनुभवताना आपण ती विशिष्ट क्रिया करीत आहोत वा वेदना अनुभवत आहोत याची क्षणोक्षणी जाणीव ठेवणे हा अर्थ सम्यक स्मृतीत अभिप्रेत आहे . कायानुपश्यना, वेदनापश्यना व धर्मानुपश्यना यांचे संकल्पित रूप म्हणजे सम्यक स्मृती होय. या चार हि विचारांची जाणीव स्मृतीद्वारे ठेवावी लागते. व अखंड जागरूक राहावे लागते. ह्यांची भावना आचरण करणे म्हणजेच आत्मशरण आणि अनन्यशरण होऊन वागणे होय. भारतीय अध्यात्म साधनेत स्मृतीचे अनन्य साधारण महत्व हे बौद्ध धम्मात च आहे . मराठी संतांना सम्यक स्मृती, स्मरण ह्यांचा वारसा त्यातूनच लाभला आहे . बौद्ध धम्मात ज्यांना पंचेंद्रिये म्हणून ओळखल्या जाते , त्या श्रद्धा , वीर्य,स्मृती ,समाधी,आणि प्रज्ञा. यांचा अभ्यास योगसूत्रातून अत्यावश्यक समजला जातो. थोडक्यात सम्यक स्मृती म्हणजे काय हे आपण पाहिले आहे. आता स्मृती म्हणजे माणसाची स्मरणशक्ती असा सरळ अर्थ येतो पण वरती तुम्हाला काही वेगळेच वाचायला मिळाले असेल मग , इथे द्विधा अवस्था निर्माण होते अरे हे काही वेगळेच तर सांगत नाहीत ना ? तर म