पोस्ट्स

डिसेंबर २८, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विद्यार्थ्यानो , तुम्ही घाणीत पडलेली रत्ने आहात .

बाबासाहेब यांचे मुंबई अस्पृश्य विद्यार्थी संमेलन मधील भाषण काय होते, याचा थोडा भाग पाहू या हे संमेलन १०, ११, व १२ डिसेंबर १९३८ ला मुंबई इथे पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष बाबासाहेब होते आणि त्यांचे भाषण पहा .   बाबासाहेब यांचे भाषण सुरु होते '' आज मुंबई मध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांचे संमेलन घडवून आणले आहे आणि ते सर्व परीने यशस्वी झाले आहे. या कार्यक्रमाबद्दल तुमचे व ज्या विद्यार्थ्यांनी हे संमेलन पार पाडण्यात भाग घेतला आहे त्यांचे मी अभिनंदन करतो. मी शनिवारी व रविवारी नाशिकला होतो . प्रवासातील दगदगीमुळे माझी प्रकृती बिघडली आहे . माझ्यात काही त्राण नाही व भाषण करण्याची ताकद नाही मी इतके सांगू इच्छितो कि आजच्या प्रसंगी हजर राहता आले याबद्दल मला आनंद व धन्यता  वाटते. अशाप्रकारची संमेलने फार होतात . त्याप्रसंगी कोणी अध्यक्ष आल - मी नेहमी पाहतो त्याने भाषण केले कि त्यात बिद्यार्थ्याना एक टोमणा मारलेला असतो . तुम्ही शिकून काय करणार ? सरकारी नोकरी ? त्यांना देश सेवा करण्याचा उपदेश करण्यात येतो . पण यात काही हशील नाही . विद्यार्थ्यासंबंधी मो जो काही विचार केला आहे त्यावरून मी असे