पोस्ट्स

नोव्हेंबर १७, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धर्म आणि धम्म

इमेज
 बाबासाहेबांनी धर्म आणि धम्म यात काय साम्य असते हे त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात चौथ्या खंडात प्रस्तुत लिहिले आहे  बाबासाहेब म्हणत धर्म हा माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही पाहिलं बाबासाहेब धर्माची व्याख्या सांगताना म्हणतात कि धर्म म्हणजे ईश्वर पूजा चुकलेल्या आत्म्याची सुधारणा प्रार्थना विधी व यज्ञ याग इत्यादींनी देवाला प्रसन्न करणे धर्म हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतःपुरता  मर्यादित ठेवावा सार्वजनिक जीवनात त्याला अवसर नाही उलटपक्षी धम्म हा मूलतः आणि तत्वतः सामाजिक आहे धम्म म्हणजे सदाचरण जीवनाच्या क्षेत्रात माणसा - माणसातील व्यवहार उचित असणे समाज धम्माशिवाय असूच शकत  नाही अश्या पद्धतीने धर्म हा वैयक्तिक असून धम्म हा वैश्विक आहे  प्रज्ञा आणि करुणा या  धम्माच्या दोन कोनशीला आहेत प्रज्ञा म्हणजे निर्मल बुद्धी धम्मात अंधश्रद्धा खुल्या समजुती चमत्कार यांना जागा नाही करुणा म्हणजे प्राणीमात्राविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता प्रज्ञा आणि करुणा यांचे मिश्रण म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म धर्माच्या कल्पनेत वास्तुमात्रांचा आरंभाचा साक्षात्कार तसेच जग शास्वत आहे काय साग सांत आहेकाय

आजच्या समाजाची विचारसरणी

     भारता  भारता तू कशाचा महान रे आज तुझ्याच लेकीबालीचा इथे होतो रे बलात्कार कशाचा महान तू ज्या ,भूमीत  तथागत भगवान गौतम बुद्ध जन्माला आले ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्या भूमीत असे स्त्रियांवर  होणारे अत्याचार आपण आज पाहत आहोत असे का यांना रोकणारे कोणी नाही का ज्या देशात महान राष्ट्रानिर्माते होवून गेले त्या देशाची हि करुण कहाणी आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत आपल्या या देशात अश्या गोष्ठी सर्रास घडत आहेत मानवाला मनुष्की नावाची ओळख राहिली नाही माणूस  फक्त वासनाधीन  झाला आहे याला कारणी भूत आजची लोकांची विचार करण्यासाठी पद्धत  ती बदलली पाहिजे तर या देशात मैत्रीपूर्ण संबंध राहतील पण याला बदलण्यासाठी माणसाला आपल्या मानुसूचीतेला आव्हान कराव लागेल त्यासाठी या देशातील लोकांना एकच पर्याय राहतो तो म्हणजे माणसाने मैत्री करुणा अंगीकारणे आवश्यक आहे . आजच्या जीवनात माणूस स्त्री या जातीकडे एक उपभोगाची वस्तू म्हणून समजतो पण कधी हा विचार नाही करत कि हीच स्त्री कधी  कोणाची आई असते कोणाची बहिण असते कोणाची मावशी असते कोणाची बायको असते कि कोणाची मुलगी असते मग हि नाती तर प्रत्येक मा

भारतीय घटनेचे शिल्पकार

इमेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार हा बहुमान त्यांना आम जनतेने बहाल केला आहे.मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा घटना समितीला सादर केला.डॉ . आंबेडकर भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते असे भारताचे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन म्हणतात. तसेच ते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते. म्हणून संविधानसभेत हा मसुदा सादर करणे आणि आणि स्वीकृत करवून घेणे या प्रक्रियेत त्यांची भूमिका सुकाणू धारकाची होती. मसुदा समितीतील डॉ. आंबेडकरांचे एक सहयोगी श्री टी.टी. कृष्णम्माचारी, यांनी संविधान सभेतील एका भाषणात असे प्रतिपादन केले की, संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही, आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. एक किंवा दोन व्यक्ती दिल्लीपासून बऱ्याच लांब होत्या आणि त्यांची

भारतरत्न : सर्वोच्च नागरी पुरस्कार

इमेज
भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च त्याग करणार्या किंवा भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणार्या व्यक्तीस भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. आतापर्यंत समाज सेवा, कला, साहित्य, विज्ञान व तंत्रज्ञान, कारखानदारी ही क्षेत्रे व सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला गेला आहे. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरांत ‘भारतरत्न’ देण्याची सोय उपलब्ध करून घेण्यात आली. त्यानंतर १२ जणांना मरणोपरांत भारतरत्न दिले गेलेले आहे. आत्तापर्यंत ४१ जणांना ‘हा अत्युच्च सन्मानाचा भारतरत्न पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत. सुरुवातीला हा पुरस्कार म्हणजे ३५ मिमी व्यासाचे एक वर्तुळाकार सुवर्णपदक असावे अशी कल्पना होती. त्यावर एका बाजूवर मधोमध सूर्याची प्रतीमा, त्याच्या वरच्या बाजूला हिंदी भाषेत ‘भारतरत्न’ असे लिहिलेले असे व सूर्याच्या खालील बाजूस एक फुलांची माळ असावी. तसेच पदकाच्या दुसऱ्या बाजूस संबंधित राज्याचे

प्रतापगडाचा रणसंग्राम

इमेज
प्रताप घडाचा रणसंग्राम शिवरायांच्या आयुष्यातील एक भयानक प्रसंग आणि त्यामध्ये महाराजांनी मिळवलेली विजयाची पताका आणि काही घटक प्रसंगाचे वर्णन इतिहासात आहे त्याचा आढावा आपण घेवूया तो काळ इतका धामधुमीचा होता शिवरायांनी स्वराज्याची घौडदौड अगदी जोरात चालली होती गड किल्ले कब्जात घेतले जात होते तोरणा घेवून स्वराज्याचे तोरण बांधले आणि मग महाराजांनी अनेक गड किल्ले घ्यायला सुरुवात केली आणि विजापूरची आदिलशाही हादरली आदिलशाह ओरडला अरे कोण तो शिवा शहाजीचा पोरगा त्याने काय उत्पाद मांडला आहे त्याला रोखणे गरजेचे आहे शहाजीला पत्र पाठवा आणि आपल्या पुत्राला समजवण्यास सांगा अन्यथा त्याचा बिमोड करावा लागेल पण शहाजी राजे सांगतात कि माझा माझ्या मुलाशी काहीही सबंध नाही ते वेगळे राहतात आणि इकडे मनात आनंद होतो कि आपले स्वप्न पूर्णत्वाकडे जात आहे त्यांनी आपल्या पुत्राला पूर्ण पाठींबा दिला कि हे स्वराज्य व्हावे हि श्रीची इच्छा आहे आणि मग आदिलशाहने फतेह खानाला अन्ज्ञ दिली कि शिवाजीच्या  किल्ले घेवून या आणि फातेह खान स्वराज्यावर चाल करून आला  शिवरायांकडे त्यावेळी कोणतेच शास्त्र नव्हते पण मराठे हे गनिमी कावा खेळण्य

भारतरत्न पुरस्कार

इमेज
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ( १८८८ - १९७५ ) १९५४ भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकीत शिक्षणतज्ञ २ चक्रवर्ती राजगोपालचारी ( १८७८ - १९७२ ) १९५४ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शेवटचे गव्हर्नर जनरल ३ डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण ( १८८८ - १९७० ) १९५४ प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ ४ डॉ. भगवान दास ( १८६९ - १९५८ ) १९५५ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते ५ डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ( १८६१ - १९६२ ) १९५५ पहिले अभियंता 'बँक ऑफ म्हैसूर' ची स्थापना ६ जवाहरलाल नेहरू ( १८८९ - १९६४ ) १९५५ भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते ७ गोविंद वल्लभ पंत ( १८८७ - १९६१ ) १९५७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री व भारताचे दुसरे गृहमंत्री ८ डॉ. धोंडो केशव कर्वे ( १८५८ - १९६२ ) १९५८ समाजसुधारक, शिक्षणप्रसारक ९ डॉ. बिधान चंद्र रॉय ( १८८२ - १९६२ ) १९६१ पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री व वैद्यक १० पुरूषोत्तम दास टंडन ( १८८२ - १९६२ ) १९६१ भारतीय स्