पोस्ट्स

ऑक्टोबर २३, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बलात्काराच्या देशा

आपला  भारत देश या देशात स्त्री  म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता असे केवळ बोलण्यापुरते का होईना पण म्हटले जाते  अश्या या  भारत देशात काय चालले आहे याची जाणीव आहे का जनतेला तेच कळेना झालाय  देशाच्या  नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने २०१४ व २०१५ ची आकडेवारी जाहीर   केली आहे आपण आधी आकडेवारी पाहू मग आपल्या महत्वाच्या विषयाकडे लक्ष देऊ या  २0१४ साली देशात ३७ हजार ४१३ बलात्कार झाले आणि  २0१५ साली बलात्काराची संख्या ३४ हजार ६५१ इतके बलात्कार या देशात झाले आहेत  कमालीची आकडेवारी आहे नाही का आपला भारत देश सर्व अभिमानाने मिरवतात  भारतात स्त्री देवीचा दर्जा देतो म्हणून आणि त्याच देवीची इज्जत सरेआम  निलाम करतो  एकीकडे नवरात्रीत नऊ दिवस  स्त्रीशक्ती म्हणून देवींचे भक्तिभावाने पूजन करणारे याचदिवसात देखील अनेक भूतलावरील देवींचे शील हरण करण्यात मश्गूल असतात  यावर्षी तर बातमीच अशी  होती नवरात्री दरम्यान कंडोम ची अधिक विक्री  आता क कंडोम कशासाठी वापरतात हे सांगण्याची आवश्यकता नाही पण हि मानसिकता बदलत का नाही वासनेच्या आहारी गेलाय का देश पुरा यंत्रणा कोलमडून पडली आहे सरकार ची कायद्याची भींती राहिलेली

मोर्चा म्हणजे एक पब्लिक इव्हेंट

जय भीम स्पष्ट बोलतो म्हणून वाईट वाटेल पण हरकत नाही पाठीमागून नाही सरळ बोलल्याचे शल्य जास्त राहत नसते आज मोर्चा म्हणजे एक पब्लिक इव्हेंट झाला आहे मला निघणारे मोर्चे यांची काही पार्श्वभूमी असायला पाहिजे पण तसे काहीच दिसत नाही मराठयांचे मूकमोर्चे निघाले व आज हि निघतच आहेत कोपर्डी च्या भूमिकेत बदल करून आरक्षणावर येऊन थांबले त्यांच्या मागण्यासाठी त्यांनी कोणतीही चर्चा करण्याची भूमिका न घेता केवळ मोर्चेच काढून जनरेठा दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा मागणीचा आणि मोर्चाचा सबधंच समजून येत नाही कारण ते हि इतकी वर्षे सत्तेत असताना त्यांना समाज का दिसला नाही हा सर्वात मोठा प्रश्न आता मराठ्यांचे सोडा आता आपण दलितांचे अर्थात बहुजनांचे मोर्चे निघत आहेत काय कारण सांगून संविधानच्या सन्मानार्थ बहुजन समाज रस्त्यावर उताराला आहे आधी काय सन्मान करायचे समजले नाही का तुम्हाला संविधानाचा सन्मान करण्याची आठवण आज बरी आली आणि यात सामील कोण निळे झेंडे घेऊन भगवे पिवळे हिरवे असे झेंडे घेऊन सामील संविधानाच्या सन्मानासाठी आम्ही रस्त्यावर आलोय मोर्चात कसले सन्मान ठेवता तुम्ही संविधानाप्रती ते तरी सां

आणि बुद्धच महार झाले .....................

जोहार मायबाप जोहार अशी हाक कानी आली कि दारासमोर म्हणे एक माणूस असायचा हातात नागफण्याची काठी घेऊन उभा असलेला राकट बांध्याचा माणूस गावाची महारकी करण्याचे काम करायचा गावाची मेलेली ढोर हा गडी एकटाच एका हाताने उचलून न्यायचा भले भले थकायचे पण हा एकटा ओढत नेत होता पण जगणे याचे जनावराला हि लाजवील असे होते हो गावकुसाबाहेर जीवन जगायचा व गावगाडा हाकीत बसायचा एका महसूर्याच्या जन्माने यांच्या जीवनाचे सोन झाले गावकुसातून गावात आला बंगला आला गाडी आली पण जात काय सुटली नाही भीमाने महाराची महारकी सोडली बुद्धाच्या ओटीत टाकून आज महार म्हणून स्वतः मिरवतात अश्या लोकांनी खास करून इकडे लक्ष द्या का दिला बुद्ध बाबासाहेबानी बुद्धच का दिला येशू हि देऊ शकले असते कि पैगंबर हि देऊ शकले असते गुरु साहेब पण देऊ शकले असते महावीर पण देऊ शकले असते पण तुम्हाला बुद्धच का दिला याकडे आम्ही कधी वळलो आहे का तुमच्या प्रगतीसाठी तुमच्या सन्मानासाठी तुमच्या स्वातंत्र्यासाठी स्वाभिमानासाठी मोकळा श्वास घेण्यासाठी जातीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी रूढी बंधने मोडून काढण्यासाठी दिला बुद्ध स्वातंत्र्य समता बंधुत