आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतावर प्रभाव भाग : 1 सम्यक दृष्टी : म्हणजे मध्यम दृष्टिकोनातून विचार करणे मध्यम मार्गीय ज्ञानाला अथवा विचार करण्याच्या पद्धतीला सम्यक दृष्टी म्हणतात . यात कुशल अकुशल म्हणजे भल्या वाईट गोष्टीचे ज्ञान अपेक्षित आहे. हिंसा,चिरो,व्यभिचार किंवा मिथ्याचाराचा समावेश अकुशल कायिक कर्मात होतो.असत्य,चुगली,कटू वा कठोर वचन आणि व्यर्थ बडबड हे वाचिक अकुशल काम होत. अविद्या,लोभ, व्यापाद, प्रतिहिंसा आणि मिथ्यादृष्टी धारणा हि मानसिक अकुशल कर्मे होत. ह्या अकुशल कर्मांच्या विरुद्ध कृतीला कुशल हि संज्ञा होय. सम्यक दृष्टीचा मराठी संतावर झालेला परिणाम : कुशल याला संतांनी योग्य वा शुभ आणि अकुशल याला अयोग्य वा अशुभ अश्या संज्ञा वापरल्या आहेत आणि यांच्या आचारांच्या मूळ कारणांना विचारपूर्वक ओळखणे हाच अर्थ सम्यक दृष्टीत अभिप्रेत आहे . हि सम्यक दृष्टी केवळ कायिक आचारापुरातीच सीमित नसून तिचा व्याप मानसिक आणि वाचिक आचारणापर्यंत पसरला आहे . बुद्धाच्या मूलगामी विचारांची गरुडझेप जीवनाच्या प्रत्येक अंगाशी संबंधित असून काया,वाचा, आणि मने करून सदाचाराची तीत अपेक्षा आहे . म्हणून सम्यक दृष्टीम...
टिप्पण्या