सम्यक अजिविका : यामध्ये योग्य आणि नीतीच्या मार्गाने अर्थोपार्जन करणे अपेक्षित आहे . संसारी माणसाला उदारनिर्वाहाकरिता जो व्यापार, व्यवसाय करावा लागतो तो नितीधर्मावर आधारित असावा . तो करताना इतरांची हानी करून स्वतःचा स्वार्थ साधने बुद्धाला अमान्य आहे. बुद्धाने खालील व्यवसायांना निषिद्ध ठरवले आहे. 1} शस्त्रांचा व्यापार 2}प्राण्यांचा व्यापार 3} मदयादींचा व्यापार4} मांसविक्री5} विषाचा व्यापार याखेरीज लक्खन सुत्तात दांडी मारणे, माप कमी करणे, लाच देणे, फसवणूक करणे, कपट करणे , मानसिक त्रास देणे, वध करणे , डाका टाकणे, लूटमार करणे हे अयोग्य आहेत बुद्धाने चुकीच्या मार्गाने पैसे कमावू नये असाच संदेश दिला आहे तुमचे जीवन हे चांगले आचरण असणारे असावे सम्यक आजीविका चा मराठी संतांवर असणारा प्रभाव पाहू या वैयक्तिक व सामाजिक जीवनाच्या शुद्धीसाठी ह्याची गरज आहे . मिथ्या आजीविकेचा त्याग करून सम्यक मार्गाने उदरनिर्वाह करणे म्हणजे सम्यक आजीविका होय. यात धर्मानुसार प्रामाणिकपणे श्रम करून धनार्जन करणे अभिप्रेत आहे. केवळ घाम गाळून द्रव्योपार्जन करताना नितीबाह्य मार्गाचा अवलंब न करणे हे कटाक्ष पूर्वक सांगितले आ...
टिप्पण्या