बौद्ध धम्माबाबत विसंगती निर्माण करणाऱ्या तुकाराम चिंचीकर याच्या लेखाला चोख उत्तर

बौद्ध धम्माबाबत विसंगती निर्माण करणाऱ्या तुकाराम चिंचीकर याच्या लेखाला चोख उत्तर आपल्या शैलीत 
खालील प्रमाणे पहिला आक्षेपाचं खंडण
बुद्धाने हिॅदु धर्म सोडून मी नवीन धर्म संस्थापत आहे असं एकही वाक्य मला कुठेही आढळलं नाही. तो मुळात जन्माने हिॅदुच होता व मेलाही हिॅदुच म्हणूनच की काय राहुल सांस्कृत्यायन ह्या बौद्ध पंडिताने देखील असं स्पष्ट म्हटलं की बौद्ध श्रमण व ब्राह्मण हे एकत्र राहत व त्यांना दोघांना जर कोणती उपाधी द्यायची तर ती फक्त आणि फक्त हिॅदुच असेल. ह्याबबातीत उपराष्ट्रपती व एक विद्वान डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णनांचं एक वाक्य फार महत्वाचे आहे. ते त्यांच्या भारत सरकारनेच प्रकाशित केलेल्या बुद्धधर्मावरच्या २५०० वर्षाच्या इतिहासकथन करणार्या एका ग्रंथात म्हणतात

बुद्धाने कोणताही नवा धर्म संस्थापिला नाही ! तो हिॅदुच म्हणून जगला व मेला.
भारत सरकारने प्रकाशित केलेला हा ग्रंथ 👇
Buddha did not feel that he was announcing a new religion. He was born, grew up and died up a Hindu. He was restating with a new emphasis the ancient ideals of Indo-aryan civilization.  अर्थ - बुद्धाला आपण नवा धर्म संस्थापित आहोत असं कुठेही वाटलं नाही. तो हिॅदु म्हणूनच जन्माला आला, वाढला व मेलाही हिॅदु म्हणूनच. त्याने इण्डो-आर्यन संस्कृतीची प्राचीन तत्वे नव्या उत्साहात पुनरुज्जीवित केली.
Dr Radhakrishnan in his Foreward to "2500 years of Buddhism", page no.68
Govt. Of India, Publication Division
ह्याचा अर्थ काय? स्पष्ट आहे. 
आता काहीजण आक्षेप घेतील तर आम्ही एकच प्रश्न विचारतो की त्यांनी बुद्धाने नवीन धर्म संस्थापिल्याचे एकतरी वाक्य आणून दाखवावं.
उत्तर : बुद्धाने नव्या धर्माची निर्मिती केली नाही असे अनेकांना वाटते लोक म्हणतात बुद्धाने असे कुठे म्हटलेच नाही पण बुद्धाने ज्ञानप्राप्ती नंतर पहिले प्रवचन सारनाथ इथे दिले तेव्हा धम्मचक्र प्रवर्तन म्हणून सुरुवात केली ती हिंदू धर्माच्या नावाने नसून बुद्ध धम्म नि संघाच्या नावाने केलेली आहे आणि हिंदू धर्मात या तिन्ही गोष्टींचा साधा संबंध हि नाही तरी देखील खंडन करणाऱ्या ला अक्कल आहे कि नाही हे माहित नाही पण त्याने हा केलेला बुद्धीचे प्रदर्शन पाहून त्याची अक्कल नक्कीच घुडघ्यात असावी असेच दिसतंय कारण बुद्धाने हिंदू धर्माची तत्वे आणि धम्माची तत्वे वेगळीच आहेत त्यावर शेवटी आपण पाहणार आहोतच  बुद्धाने बौद्ध धम्म स्थापन केला नाही असे म्हणणे म्हणजे मूर्खपणा याच आहे बुद्धाने बुद्ध धम्म संघ निर्माण करून बौद्ध धम्माची निर्मिती केलेली कदाचित यांच्या अभ्यासात नसल्याने यांची हि गडबड आहे राधा क्रिष्णन व बापट यांनी आणलेला हा ग्रंथ १९५६ चा आहे तरी बाबासाहेब यांचा लिहलेला बुद्ध आणि धम्म  हा ग्रंथ वाचण्याची नितांत आवश्यकता होती याना बुद्धाच्या इतिहासात कोणी कशी भेसळ  केली हे सांगायला नको चिकित्सक वृत्तीने ते स्वीकारणे आवश्यक होते पण तुकाराम चिंचीकर यांचा बौद्धिक दिवाळखोरी इथे स्पष्ट दिसतेय 
आणि महत्वाचे म्हणजे बुद्ध धम्माची पायाभरणी एवढी मजबूत आहे  कि वैदिकांना तो संपवता आला नाही  
आता बौद्ध धम्माची निर्मिती झालीच नाही म्हणणाऱ्याच्या बुद्धीची किंवा येते जर निर्मिती झाली नाही तर बुद्धाने दिलेले तत्वज्ञान हे हिंदू धर्माचे असेल तर हिंदू त्यांचे धर्मग्रंथ  फेकून देणार का बुद्ध तत्वज्ञान स्वीकारणार का  हा तुकाराम चिंचीकर सारख्या बालबुद्धी असणाऱ्या  लोकांनी जनतेला सांगावे 
बुद्ध धम्माची निर्मिती झाली हे जगाने बुद्ध स्वीकारून दाखवून दिलंय  ज्यांची जगात गिणतीच नाही अश्या लोकांनी बुद्ध हिंदू म्हणून जगला आणि हिंदू म्हणून मेला असे म्हणावे हेच मूर्खपणाचे वाटते कारण बुद्धाने जगाला दिलेले तत्वज्ञान व बुद्धाचे सिद्धांत हिंदू धर्माच्या विचाराणा छेद देणारे आहेत तरी देखील असे वक्तव्य काळे जाणे हे मूर्खपणाची लक्षणेच वाटतात 
दुसर्या आक्षेपांचे खंडण 
म्हणे बुद्धाने व जैनांनी वैदिक धर्माच्या विषमतवादी धोरणांस कंटाळून वेगळा धर्म संस्थापून फार मोठी वेगळी सामाजिक क्रांती केली.
हा विचार किती तथ्यहीन व तर्कदृष्ट व वास्तवांस सोडून आहे हे आता पाहु.
बुद्ध हा स्वत:च विषमता वादी अर्थात वर्णश्रेष्ठत्वाचा अभिमानी होता - हे घ्या पुरावे
न बोधिसत्ता हीनकुलेषु उपद्यन्ते
म्हणजे बौधिसत्व हे हीन कुळात कधीच जन्म घेत नाही.
ह्याचा अर्थ काय? ह्याला वर्णवर्चस्वाचा अभिमानच म्हणणार ना??? बुद्धाच्या शाक्य कुळात भावा बहिणींची लग्ने होत होती ! स्वत: बुद्ध अंबष्ठसुतात अंबष्ठ ब्राह्नणाला सांगतो की "आम्ही क्षत्रिय वंशाचे शुद्धत्व राखण्यासाठी बहिणींशी लग्न करतो !"
गौतम बुद्ध हा कुळाचे वंशाचे शुद्धत्व राखणारा आहे म्हणजेच तो जातीवादी होता ! अशा जातीवादी बुद्धाला आंबेडकर शरण का गेले हेच कळत नाही. हे बुद्धाचे रिडल्स आंबेडकरांना का दिसले नाही???
गौतमाचा पुर्वज औक्काक राजा ! त्याच्या मुलामुलींनी भाऊ बहीण असून आपसांत लग्न केली ! म्हणजेच वंशाचे व कुळाचे शुद्धत्व राखले ! ह्यावरून बुद्धाने फार मोठी सामाजिक क्रांती केली ह्याचा पुरावा काय???
थोडक्यात आंबेडकरांचा बुद्ध हा मुळ बुद्धापेक्षा वेगळा आहे
हे तत्कालीन महाबोधी मासिकाने व बौद्ध पंडितांनी वेळोवेळी आंबेडकरांच्या धम्मांतराबद्दल मांडलेले मत आहे. आंबेडकरांनी श्रीरामाला शिव्या घातल्या पण स्वत: बुद्ध हा श्रीरामचंद्राबद्दल काय म्हणतो ते पहा
जातककथा स्पष्ट सांगते की बुद्ध हा रामाचाच अवतार आहे ! दशरथ जातक सांगते की स्वत: गौतम बुद्ध म्हणतात की, " शुद्धोधन म्हणजे दशरथ, कौसल्या म्हणजे महामाया, सीता म्हणजे यशोधरा व राम म्हणजे मी स्वत: गौतम !
उत्तर बुद्धांनंतर झालेली भेसळ शोधण्यासाठी बाबासाहेब यांनी दोन महत्वाच्या कसोट्या बुद्धवचन शोधण्यासाठी सांगितलेली आहे एक जी गोष्ट मनुष्याच्या कल्याणला पोषक नाही ते बुद्धवचन होऊ शकत नाही व दुसरी जी गोष्ट बुद्धीच्या व तर्काच्या कसोटीवर बसत नाही ती गोष्ट बुद्ध वचन नाही त्यामुळे आंबटसुत्तात आलेले बुद्धाचे वचन हे बुद्धाचे स्वतःचे नसून  ब्राह्मण भिक्षु नि केलेला आगाऊपणा आहे हा मुळात बुद्धाने आपल्या वंश कुळ वैगरे या गोष्टींना धम्मात कवडीचे स्थान दिलेले नाही त्यामुळे बुद्ध असली विधाने करून वर्णव्यवस्थचेचे समर्थन करणारे अजिबात ठरत नाही  शिवाय औक्कक राजाचे दिलेलं पुरावे ऐतिहासिक नाहीत शिवाय बोधिसत्व हि संकल्पना बुद्धाची नसून ब्राह्मण भिक्षु नि टाकलेली भर आहे बुद्धाच्या शिकवणीत वंशाभिमान कुळाभिमान सापडत नाही सर्व मनुष्यप्राणी सामान सांगणारा बुद्ध असले विधाने करणे शक्य नाही हे बुद्धी आणि तर्काच्या कसोटीवर बसत नाही त्यामुळे ते बुधवचन होत नाही  याचा आधार घेऊन बुद्ध वर्ण व्यवस्थेचे समर्थन करत होते असले पांचट विनोद करणे हे यांच्या बालबुद्धीचे प्रदर्शन आहे स्वतःची बुद्धी कुठे हि न वापरता केवळ दाखल देऊन जून ते सोन म्हणून स्वीकार केला जातो बुद्धाचे तत्वज्ञान नव्या बदलला स्वीकारणारे आहे जुन्याला धरून ठेवणारे नाही त्यामुळे ह्या मुळात यांनी आक्षेपाचे दिलेले उत्तरं पूर्णपणे चुकीचे आहे आता थोडे वर्णव्यवस्था कशी होती व बुद्ध शिकवण कशी होते हे पाहणे आवश्यक आहे वर्ण व्यवस्थेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे चार वर्ण ते हि नंतर च्या काळात सुरवातीला तिन च वर्ण होते पुढे चौथा वर्ण आला बुद्धाने   विषमतेच्या विरोधात जाऊन धम्म निर्माण केला बुद्धाला शास्वत सत्य शोधायचे होते ते शोधले म्हणून दुसरा कल्याणकारी मार्ग दिला बुद्धाने स्वतःला विशेष वेगळे स्थानं दिलेले नाही ना स्वतःला मुक्तिदाता ना कुणी ईश्वर  असे संबोधन लावले बुद्ध सरळ आणि सोप्या भाषेत सांगून गेला  मी फक्त मार्गदाता आहे मी माझा अनुभव तुमच्या पुढे ठेवतोय मला जो मार्ग सापडला त्या मार्गाने तुम्ही माझ्या जागी येऊन बसू शकता   बुद्धकाळी बुद्धाला राजाश्रय मिळाला त्यामुळे बुद्धाने लोकभाषेत आपला मार्ग सांगितल्याने सर्वसामान्य माणसाला हि ते तत्वज्ञान समजले त्यामुळे लोकांनी वैदिक सनातनी लोकांचा मार्ग सोडून बुद्धाच्या सम्यक मार्गाचा अवलंब केला त्यामुळे ब्राह्मणांची रोजीरोटी बंद झाली अनेक ब्राह्मण संघात केवळ बुद्ध बदनाम करण्यासाठीच आले होते काही ब्राह्मण बुद्धासारखे उच्चतम ज्ञानाच्या भुकेपोटी आले होते त्यांनी स्वतःला अर्हत पदापर्यंत जाण्याची मजल मारलि पण जे केवळ भिक्षा मिळावी म्हणून आले होते त्यांना मात्र ते करता आलेले नाही म्हणून धम्मातून पुढे सम्राट अशोकाने हजारो ब्राह्मणांना हाकलून दिले होते हे का  घडले हे वेगळे सांगण्याची गरज नाही त्यामुळेबुद्धाचा धम्म हा वैदिकांच्या चुकीच्या रितीरिवाजामुळे चुकीच्या प्रथांमुळे पुढे आला बुद्धाला शाश्वत जीवन जगण्याचा मार्ग शोधावा लागला बाकी वैदिकांची विषमता हा वेगळा विषय होईल  त्यावर वेगळेच लिखाण हवे  तूर्तास खंडन करणाऱ्या तुकाराम चिंचीकर यांचा अभ्यास इथे कमी पडतोय कारण त्यांना धम्म का निर्माण झाला हेच माहित नाही


तिसर्या आक्षेपाला उत्तर
म्हणे अस्पृश्यता ही वैदिक धर्मप्रणितच होती व ती बुद्धांनी व जैनांनी नष्ट करून फार मोठे उपकार केले.
एकतर ह्या सिद्धांताला एकही तत्कालीन पुरावा नाहीये. जो बुद्ध स्वत: वंशश्रेष्ठत्व राखतो, तो अस्पृश्यता नष्ट करीलच कसा??? व अस्पृश्यता त्याच्या आधी होती ह्याचा एकही पुरावा नाहीये. आता खालील पुरावे घ्या.
जातीव्यवस्था नि अस्पृश्यता हिॅदुस्थानात कशी आली ह्यासंदर्भात अनेकांनी अनेक तर्कवितर्क करून वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. 
पण आंबेडकर व महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या मतानुसार हिॅदुस्थानात ह्या कुप्रथा ह्या बौद्ध व जैनकाळातच निर्माण झाल्या !
आंबेडकरांनी तर पहिल्या खंडात (इंग्रजी) स्पष्ट सांगितलंय की अस्पृश्यता किॅवा जातीव्यवस्था ही ब्राह्नणांनी निर्माण केली असा जो आपला समज आहे तो चुकीचा आहे. वस्तुत: ही गोष्ट त्यांच्या क्षमतेबाहेरची आहे असं ते म्हणतात ( Brahmins are to be blamed for many things but as far as creation of untouchability is concerned, such creation of Untouchability or Casteism was a work beyond the mettle of the Brahmins.)
महर्षी विठ्ठल रामजी शिॅदेंनी तर "अस्पृश्यतेचा प्रश्न" ह्या त्यांच्या निबंधात तर स्पष्ट पुराव्यासहित प्रतिपादन केलंय की बौद्धांनी व जैनांनीच नंतरह्या कुप्रथा निर्माण केल्या.
अस्पृश्यता ही वेदप्रणीत नाहीच नाही.
त्यामुळे आधी हे सर्व होते व बुद्धाने येऊन हे सर्व झुगारून देऊन फार मोठी समाजिक क्रांती केली हा तथ्यहीन सिद्धांत आहे. थोडक्यात बुद्धाने सामाजिक क्रांती केली हे केवळ थोतांड असून खरं तर त्यानेच जातीव्यवस्था निर्माण केली असा आरोप करायलाही जागा आहे. कारण तो वंशश्रेष्ठत्वाचा अभिमानी आहे. 
आता ह्याबाबतीत डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन पुन्हा त्यांच्या  "Indian Philosophy" ह्या त्यांच्या द्विखंडात्मक ग्रंथात ते म्हणतात. की बुद्धाने व जैनांनी कोणतीही सामाजिक क्रांती केलीच नाही ! घ्या पुरावे ' 👇

The Myth of Buddha's Social revolution
Actually Buddha did not create any kind of social revolution. 
"We cannot say that Buddha abolished caste, for the religion of buddha is an aristocratic one. We cannot say that Buddha effected any Social revolution. Even Birth in a Bramhin family, Buddha allows it to be a reward for the merit.
The still very prevalent notion that Buddhism and Jainism were reformatory movements, and that more especially they represented the revolt against the tyranny of caste, is quite erroneous. 
Buddha was not social reformer."
अर्थ - आपण असं नाही म्हणु शकत की बुद्धाने ज्ञातीव्यवस्था नष्ट केली, कारण बुद्धाचा पंथ हा स्वत:च वंशाभिमानी आहे. त्यामुळे बुद्धाने फार मोठी सामाजिक क्रांती केली असं आपण म्हणूच शकत नाही. कारण बुद्ध हा ब्राह्नण कुलात जन्म घेणं हेदेखील एक गुणश्रेष्ठत्वाचे प्रतीक मानतो. 
बुद्ध व जैन चळवळी ह्या ज्ञातीव्यवस्थेच्या छळाविरुद्ध झालेल्या आहेत ही आजपर्यंत असलेली समजूतच पूर्ण चुकीची आहे. कारण बुद्धाने कोणतीही सामाजिक क्रांती केली नाही. 
Dr Radhakrishnan - Indian Philosophy Volume 1  - pg no. 437-441

अर्थात इथे एक गोष्ट जाता जाता सांगायला हवी की आंबेडकरांनी ह्या संदर्भात अनेक कोलांट्या उड्या मारल्या आहेत. प्रसिद्ध अभ्यासक शेषराव मोरे सरांचं पण हेच मत आहे की बुद्धाला श्रेष्ठ ठरविण्यासाठी आंबेडकरांनी फार फिरवफिरवी केली आहे. असो तो स्वतंत्र विषय कधीतरी लिहु.

उत्तर : लिखाणकर्त्याचे अज्ञान पहा किती आहे अस्पृश्यता हि वैद्यकांनी आणली नसून बौद्धांनी आणली  असे विधान करून स्वतःची ज्ञानाची पातळी किती आहे हे दाखवून दिले आहे इथे आमचा धर्म  श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा अट्टहास आता वर्णव्यवस्था बुद्धाने आणलेली नाही राधाकृष्णन याचा अभ्यास धम्मावर किती होता हे सांगायची गरज नाही त्यामुळे अश्या पांचट विद्वानांची उदाहरणे देऊन आम्ही कसे श्रेष्ठ सांगण्याचा हा अट्टहास आहे आता वैद्यकांची अस्पृश्यता बुद्धाच्या माथी मारण्याचे काम चालू आहे ज्याला कुठला हि ठोस पुरावा नाही  बुद्धाचे आंबटसुत्तातील संदर्भ देऊन केले जाणारे विधान हे  बुद्धाच्या शिकवणीशी कावडीच्या हि संबंध न जुळणारा आहे  तरी देखील तेच तेच सांगणायचा प्रयत्न केला जातोय 
आता वारणा व्यवस्था हि सनातनीवैदिक लोकांनी आणली त्यात शूद्र वर्ण हा सेवा करण्यासाठी ठेवला ब्राह्मणांचा शूद्रांना नियम कसे घालून दिलेत ते हि पाहू या मनूने काय काय काय बंधने घातली आहेत ती 
शूद्राचे धन चोरण्याचा ब्राह्मण लोकांना  पूर्ण सवलत आहे वैदिक ब्राह्मण धर्म ग्रंथांनी ज्या लोकांना नीच शुद्र केल अश्या लोकांच्या घरी धन धान्य चोरावे  त्यासाठी आपल्या बलाचा वापर करून त्यांच्याकडून ते धन काढून घ्यावे आणि आपला यज्ञ पूर्ण करावा
पहा श्लोक ' आहरेत्रिनि व दवे वा कामं शुद्रस्यवैश्मन: ।
न हि शुद्रस्य यज्ञसु कश्चिद वतास्ति परिग्रह ।। '' मनुस्मृती ११/१२
 आता बघा ना ज्या ब्राह्मण लोक देवाला देव पदावरून काढून टाकू शकतात जे लोक  कोणालाही शाप देवून त्याचे जीवन दुख मय करू शकतात ते लोक धन तयार करण्यात असमर्थ दिसतात,म्हणून त्यांना  शूद्रांच्या घरून त्यांना धान्य संपती चोरावी लागते यातून काय साध्य होत कि यांच्यात अशी कोणती शक्ती नाही केवळ घाबरवून ठेवले आहे लोकांना यांनी
यापुढे गेल्यावर मनुस्मृती काय भयानक अधिकार देते कि ब्राह्मण कोणत्याही श्री शी मैथुन करू शकतो त्याचे तर त्यांना १०० टक्के आरक्षण दिलाय मनुस्मृती अध्याय ८  मध्ये श्लोक ३५९ काय सांगतोय कि ब्राह्मणाने परस्त्रीगमन करावे पनं इतर कोणत्याही वर्णातील व्यक्ती परस्त्रीगमन करेल  तर त्याला मृत्युदंड द्यावा पहा श्लोक
''अब्राह्मणाः संग्रहने प्राणांत दण्डमर्हति ।
चातुर्वर्णामपि  वर्णना दारा रक्षतमा सदा ।। मनुस्मृती ८/३५९
यात काय सांगितले आहे कि ब्राह्मण नसेल त्याला कोणत्याही स्त्री शी मैथुन करता येणार नाही म्हणजे काय ब्राह्मण असेल तो करू शकतो त्यामुळे काय इतर लोकांना आपल्या पत्नीचे रक्षण करणे शक्य नाही कारण ब्राह्मणा च्या शापवाणी ची भीती मग कोणताच बलाढ्य राजा सुद्धा त्यांना शिक्षा करण्यात असमर्थ असतो त्यामुळे ब्राह्मणांना सर्व कुरणे मोकळी आहेत
शूद्रांना सप्तबंदी मध्ये बांधून ठेवले त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही  धन संपत्तीचा अधिकार नाही बोलण्याचा अधिकार नाही कि जगण्याचा अधिकार नाही त्यांनी फक्त सेवाच करावी हे कुणाची निर्मिती बुद्धाची का आता बुद्धाचे तत्वज्ञान काय सांगते सर्व प्राणिमात्र एक आहेत समानता सांगणारा बुद्धाचा धम्म त्यात अस्पृश्यता सापडत नाही तरी वंशाभिमानी म्हणून बुद्ध लोकांपुढे घेऊन जाण्याचा केविलवाणा प्रयत्न बुद्धाची शिकवण पाहून कोलमडून पडतो त्यामुळे बुद्ध जगामध्ये जाण्यामागे एकमेव कारण बुद्धाची शिकवण जगभरात सर्व बौद्धांना एकच शिकवण आहे त्याचा इतिहास वेगळा असला तरी मुख्य शिकवण मात्र एकच आहे हे कदाचित खंडन करणाऱ्याला माहित नसावे
एवढेच काय खंडन करणाऱ्याला बौद्ध साहित्य किती आहे हेच माहित नसणार तर तो खंडन काय करणार हि असली बालिश विधानेच करणार कि बुद्धाने अस्पृश्यता आणली म्हणून

चौथ्या आक्षेपाचं खंडण
पाश्चिमात्य इतिहासकारांनी विशेषत: ब्रिटीशांनी अठराव्या, एकोणिसाव्या व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस जे काही भारताबद्दल इतिहासलेखन केलं, त्यात भारताचा इतिहास हा दीड ते दोन सहस्त्र वर्षांनी पुढे आणण्याचं एक घोर पातक त्यांनी केलं. बुद्धाचा काळच ह्या लोकांनी १५०० ते १८०० वर्षे पुढे आणला ! त्यामुळे आदि शंकराचार्यांचा काळही तेराशे वर्षे अकारण पुढे आला जो आज चुकीचा असा इ स ७८८ ते ८२० असा मानला जातो !
पण पु ना ओक व इतिहासभूषण श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णी ह्या दोन सत्यनिष्ठ व प्रथितयश इतिहासकारांनी मात्र ह्या थोतांडांना उघड्यावर पाडुन वास्तव मांडलं. पण लोक त्यांना मानायला तयारच नाहीत कारण डोक्यावर अजुनही मार्क्सवादाचा पगडा आहे. ओकांच्याही पुढे जाऊन कुलकर्णींनी त्यांच्या भीष्म नावाने प्रकाशित केलेल्या अष्टादश खंडात्मक इतिहासविवेचनातून हिॅदुस्थानचा इतिहास हा संदर्भासहित व पुराव्यासहित मांडला. त्यात त्यांनी बुद्धाचा व आदि शंकराचार्यांचा काळही हे दोघेही वास्तव स्वरुपात कित्येक वर्षे मागे नेले.
शंकराचार्यांचे जन्मवर्ष सामान्यत: इ स ७८८ धरण्याच येते जे चुक असून एकही शंकराचार्यांची गादी किॅवा पीठाधीशांचे संदर्भ हे मानत नाहीत. विशेष म्हणजे ह्या सर्व पीठाधीशांकडे ज्या काही आचार्यांच्या जन्मतिथ्या आहेत, त्यात सर्वत्र त्यांची जन्मवर्ष हे ई. सन पूर्वीचंच आहे
संदर्भ - भारतीय इतिहास संशोधनातील घोडचुका - पु ना ओक
म्हणूनच आचार्यांचा काळ १२९७ वर्षे मागे म्हणजेच इस पूर्व ५०९ हाच योग्य जन्मकाल आहे !
हे इतिहासभूषण श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णींचे मत ग्राह्य व योग्य व वस्तुनिष्ठतेस धरून आहे.
आता हे पाश्चिमात्यांनी असं का केलं?
साहजिकय की पाश्चिमात्यांना त्यांच्या येशु ख्रिस्तांच्या अवतरणपूर्वी सर्व जग हे अंधारातच आहे असं वाटत होतं. त्यामुळे त्या अट्टाहासापायीच त्यांनी भारतीय इतिहासलेखन करताना ह्या दोन महापुरुषांवर हा अन्याय केला. आणि इतकंच नव्हे तर ह्याच इतिहासकारांनी अनेक ठिकाणी त्यांच्या प्रसिद्ध "फोडा आणि राज्य करा"
ह्या नीतीसाठीच हे केलं हे उघड आहे. बुद्धाला व जैनांना वेगळा पाडलं की आपोआप हिंदुसमाज विभाजित होतो हे षडयंत्र होतं. असो.
उत्तर : लिखाणकर्ता अज्ञानी आहे हे वरतीच आपण पाहिलेय पण एवढा मूर्ख असेल असे वाटले नव्हते इथे याने बुद्धाचा कालखंड काय काल्पनिक मानून दोन हजार वर्षे अडीच हजार वर्षे लिहलेला नाही बुद्धाच्या ऐतिहासिक खुणा मिळाल्या आहेत इसवी सनापूर्वीच्या शंकराचार्यांचे अस्तित्व सिद्ध करणारे ऐतिहासिक पुरावे द्यावेत यांनी ते देणार नाहीत कारण ते सापडत नाही जे नव्हतेच ते सापडणार कुठून मुळात शन्कराचार्य  याचे अस्तित्वच सहाव्या शतकात उदयास आलेले आहे बुद्ध धम्माची गच्छन्ति झाल्यावर त्याच्या आधी बौद्धांनी १२०० वर्षे अखंड अस्तित्त्व राखून ठ्वले होते नंतर पुढे बौद्ध धम्माच्या जागा वैदिकांनी कपटाने गिळंकृत केल्या पण त्यामुळे बुद्धाचे अस्तित्व मिटवता आलेले नाही आज अनेक उत्खननात बुद्धाचे अस्तित्व सापडत असून विविध ठिकाणी लेण्यामधून बुद्धाचे शिलालेख सापडत आहेत त्यामधून बुद्धाचा कालखंड पुढे आलाय काल्पनिक कुणी हि  इतिहास लेखन केलेलं नाही बुद्धाचे ऐतिहासिकत्व सिद्ध करून  बुद्धांबाबत लिहले गेले आहे १९ व्य शकतात पण हे कळण्यासाठी चिंचीकर किती भारतात फिरले आहेत हे महत्वाचे आहे  घरात बसून गीता लागावी एवढे सोपं ऐतिहासिक लिखाणावर लिहणे नसत तेव्हा त्यासाठी भारतभर फिरायला हवे होते या देशात बुद्ध किती व  आपल्या धर्माचे अस्तित्व किती हे पाहायन्याची गरज आहे वैदिकांची संस्कृती भाषा ह्याचा मेल भारतीय संस्कृतीशी जुडत नाही तरी देखील आमचं आमचं करत बसण्याचा हा मूर्खपणा आहे चिंचीकर सारख्या बालबुद्धी असलेल्या व्यक्तीच्या ह्या विधानाला कशाचा हि अर्थ नाही अभ्यास विरहित अशी विधाने आहेत  यासाठी भारत भर भ्रमण करून इतिहास शोधावा त्यांनी बुद्धाचा कालखंड जन्माचे ऐतिहासिक पुरावे सापडलेले आहेत तसे शंकराचार्य व हिंदू धर्माचे पुरावे सिद्ध करून मत मांडावे त्यांनी

पाचव्या आक्षेपाच खंडण
बुद्ध हा यज्ञ व वेद विरोधी होता असा एक खोडसाळ प्रचार केला जातो, जो कितपत सत्य आहे आता आपण पाहु. खरंतर ह्यासाठी एक स्वतंत्र ग्रंथनिर्मिती करता येईल असा हा विषय आहे. तरीही थोडक्यात पाहु.
त्रिपीटककारांनी स्पष्टपणे बुद्धाचा वेद व यज्ञावरचा विश्वास प्रकट केलाय.
बुद्ध स्वत:स वेदगु व वेदांतगु म्हणतो
(संदर्भ - कल्लनिद्गेश्य २.४.१८ व २.४.२८,
 महानिद्देस्स १.९.८१ व १.१५.१८२, सिघनिक्काय)
सम्युत्त निकाय हे पाच वेदांचा उल्लेख करतो. आता पाचवा वेद म्हणजे महाभारत किॅवा इतिहास असेल हे स्पष्ट आहे. कारण महाभारताला पंचम वेद म्हणण्याची परंपरा आहे.
टिन्नम् वेदनम् परगु असं शैल ब्राह्मण मझ्झिम निकाय मध्ये स्पष्ट म्हणतो. इथे वेदनम् हा शब्द स्पष्ट आहे.
उज्जय सुत्त, सम्युत्त निकाय व सहावग्गसुत्त हे ३.९ मध्ये स्पष्टपणे बुद्धाच्या दृष्टिकोनातुन खरा यज्ञ कोणता व खोटा कोणता हे स्पष्ट करतं.
"एतम् यन्नं महाफ्फलो, एतं यजेत मेधावी, एतं हि यजमानसेवा सेयं होति " असे उल्लेख स्पष्ट आहेत.
 अग्निहोत्राचा उल्लेख
अंगुत्तरनिकाय, सम्युक्त निकाय, मझ्झिमनिकाय ह्यामध्ये अग्निहोत्र करा असा उल्लेख निषाद व रथाकारास आहे.
गौतम बुद्ध हा यज्ञ च्या ऐवजी "यन्न" हा पालीभाषेतला शब्द वापरतो फक्त एवढाच फरक.   अनेक ठिकाणी बुद्धाने यज्ञसंस्थेचे कौतुक केल्याची उदाहरणे आहेत व ती विश्वासार्ह आहेत. अगदी धम्मपदाची किंवा सुत्तनिपात किंवा तत्सम ग्रंथांची उदाहरणे नक्कीच अभ्यसनीय आहेत. त्यामुळे बुद्धाला यज्ञद्वेष्टा ठरविणं अशक्य आहे. ह्याविषयांवर स्वतंत्रपणे मी लेख लिहीनच तूर्तास तरी एवढंच सांगतो की जिज्ञासुंनी श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णी लिखित "Dharma and Vedic Foundations" हा ग्रंथाच्या शेवटचा भाग वाचावा ज्यात म्हणजे  VIII Chapter हा Buddha's love for Cow and yajnya" असा विषय आहे जो पृष्ठ क्रमांक ३४७ ते ३५६ वर विस्तारलेला आहे.

बुद्धाने यज्ञ कसा करायचा याचा एक विचार सांगितलं आहे म्हणून यज्ञ च करा असे म्हटलेले नाही त्रिपिटक हा बौद्धांचा भेसळयुक्त असा ग्रंथ आहेत बुद्ध वचन शोधण्याची कसोटी वरती दिलेली आहे शेवटी जेव्हा सिद्धांत देणार आहे ते वाचून बुद्धाने काय काय सांगितले आहे ते वाचून ठरवावे कि आम्ही कोणत्या गोष्टी स्वीकारतो शिवाय वरील संदर्भ हे भले हि जुने असले तरी बुद्धाच्या धम्माशी विसंगत आहेत बुद्ध जुन्या गोष्टीला जास्त महत्व देत नाही हे सुत्त वैगरे चे लिखाण बुद्धाच्या नंतर शेकडो वर्षांनी झालेले आहे तेव्हा ते कितपत सत्य असेल हे चिकित्सक होऊन स्वीकारावे असे बौद्ध धम्माचे मत आहे अनेक गोष्टींमध्ये शिकवण व त्रिपिटकात असणारा उल्लेख यांचा मेल बसत नाही त्यामुळे आम्हाला कसोटीवर पारखून स्वीकारावे लागते
बौद्ध धम्म हा हिंदू धर्मासारखे ग्रंथप्रामाण्यवादी नाही कि ग्रंथात लिहलय तेच खर आहे म्हणून बौद्ध लोक सर्व गोष्टीचा चौकस पणे अभ्यास करून मत मांडतात व तेच विचार स्वीकारतात जे स्वतःच्या बुद्धीला पटतील
आता हे चिंचिकर याना कळणे कठीण कारण त्यांचा धर्म त्यांना बुद्धिस्वतंत्र देत नाही त्यामुळे त्यांना तो अधिकार नाही त्यामुळे ते इथे हि तीच चूक करत आहेत


सहाव्या आक्षेपाचं खंडण
बुद्धाला ब्राह्नणद्वेष्टा ठरविणार्यांनी खालील गोष्टी पहाव्यात.
आपला धम्म म्हणजे ब्राह्मणधर्मच आहे हे त्रिपिटकात शेकडो वेळा सांगितलेलं आहे.
१) संयुकातनिकाय-महावग्ग
"भिख्खू हो! ब्राह्मण्य म्हणजे काय आणि ब्राह्मणफल म्हणजे काय ते तुम्हास उपदेशितो."
२) खुद्दकनिकाय- उद्दालकजातक.
(नर कशाने) ब्राह्मण होतो , कसा केवली होतो. ' असा प्रश्न आहे. त्याचे उत्तर ' अग्निचयन करणारा , जलसिंचन करणारा , यज्ञासाठी यूप उभारणारा असा ब्राह्मण क्षेमी होतो आणि तो धर्माच्या ठायी प्रतिष्ठित समजावा (ध्म्मे ठित)
३) थेरगाथा- सुनीतथेर.
तपाने, ब्रह्मचर्याने , संयमाने , दमाने , ह्याने (माणूस) ब्राह्मण होतो. हेच उत्तम ब्राह्मण्य.
४) खुद्दकनिकाय मोरजातक.
जे ब्राह्मण सर्वधर्माच्या बाबतीत वेदज्ञ (वेदगू) असतात त्यांना मी नमितो , ते माझे रक्षण करोत .
५) अपण्णकजातक -
त्याचे शरीर ब्रह्मतेजाने झळकत होते. ब्रह्मस्वराने त्याने धर्म कथा सांगितली.
६) खुद्दकनिकाय - महावग्ग - अजपालकथा.
जो ब्राह्मण पापवृत्ती सोडून , निरहंकारी होवून ,संयत होवून ब्रह्मचर्य आचरितो (असा) वेदज्ञान (वेदांतगू) ब्राह्मण त्यानेच 'ब्रह्म ' वाद सांगावा.
७) खुद्दकनिकाय- महावग्ग बोधिकथा -
जेंव्हा प्रयत्नशील , ध्यानी ब्राह्मणासाठी प्रकटतात अस्तित्वधर्म (गौतमाला बोधी प्राप्त झाल्यानंतर त्याच्या मुखातून   उमटलेल्या पहिल्या काही उद्गारात ' ब्राह्मणाचा ' उल्लेख आहे.) आणि हा श्लोक तीन वेळा पुनरुक्त आहे.
८) अंगुत्तरनिकाय -
परीव्राजकांनो! ही चार ब्राह्मणसत्ये , ती मी स्वत: जाणून , साक्षात पाहून उपदेशिली.
९) धम्मपदामध्ये एक संपूर्ण प्रकरण (वग्ग)
ब्राह्मणस्तुतिमय आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने ते प्रकाशित केलंय. संकेतस्थळांवर ते आहे.
मनुलाही हेवा वाटेल अशा शब्दात गौतमाने ब्राह्मणांचा आणि ब्राह्मण्याचा गौरव केला आहे. ह्या प्रकरणात एक्केचाळीस श्लोक आहेत. त्यातील अनेक श्लोकात ' तमहं ब्रुमि ब्राह्मणं' ' त्यास मी म्हणे ब्राह्मण ' हे पालुपद येते. गौतमबुद्धाला प्रिय असलेला हा ब्राह्मणम्हणजे भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञ , गुणातीत ,भक्त, योगी , संन्यासी , कर्मयोगी , सात्विक वगैरे. ह्या संपूर्ण ब्राह्मणवग्गांच निरुपण स्वतंत्र शोधलेखाचा विषय आहे.ह्या आदर्श ब्राह्मणाला गौतमाने स्नातक , वृषभ (नेता) प्रवर , वीर ,महर्षी , अर्हत , सुगत आणि बुद्धसुद्धा ह्या संज्ञा वापरून गौरविले आहे. ह्या सर्व संज्ञा तीपिटक-ग्रंथात अनेकवार बुद्धाला स्वत:ला लावलेल्या आढळतात.
धम्मपदातील ३८९ वा श्लोक नोंद घेण्यासारखा आहे.
'ब्राह्मणांचे वाईट करू नका , आपल्यावर हल्ला करणाऱ्यावरही ब्राह्मणाने धावून जाऊ नये. जो ब्राह्मणावर प्रहार करील त्याचा धिक्कार असो. '
१०) खुद्दकनिकाय- भूरिदत्तजातक.
ब्राह्मण १) अध्ययन करणारा.
            २) भिक्षचर्य आचरणारा.
            ३) आहुताग्नी असतो. ह्या तीन गोष्टींमुळे ब्राह्मण हा अवध्य ठरतो.
११) खुद्दक- निमिजातक.
जे अत्यंत पापी लोक श्रमणाला किंवा ब्राह्मणाला इजा करतात किंवा आणतात, ते भीषणकर्मे लोक पाप प्रसवून,  खाली डोके (अश्या अवस्थेत) (उकळत्या) लोहकुंभीत पडतात.
१२) मजिझ्म- जे धम्म श्रमणकरणीय ,ब्राह्मणकरणीय , ते स्वीकारून आम्ही आचरु.
१३) मजिझ्म - ह्या भिक्खुला , अरे भिक्खु हो! श्रमण म्हणतात, ब्राह्मण म्हणतात.
चांगल्या अर्थाने गौतमाला ब्राह्मण्याने झपाटलेलं होतं. ( obsessed) आता आजच्या बुद्धिस्टांना हे पटणार आहे काय?
की ह्यालाही बामणी कावा म्हणूनच तुम्ही ठोकरणार आहात??? स्वत:च्या सोयीनुसार???
हे वाचल्यावर बुद्ध हा मनुपेक्षा ब्राह्नणवादी जास्ती आहे हे का लक्षात येत नाही लोकांच्या???

उत्तर : बुद्धाने ब्राह्मण मंडळींना जे चुकीच्या मार्गाने आम्ही म्हणजे श्रेष्ठ या भावनेत होते अश्या लोकांना सुधारणा करण्यासाठी केलेली उदाहरणे आहेत ती बुद्धाने ब्राह्मणांना ब्राह्मण कसा चांगला असावा हे सांगण्याचा प्रयत्न केलाय नाही कि ब्राह्मणवादाचे समर्थन केले आहे  परंतु एवढे वरील विधाने बुद्धाची  नाहीत त्रिपिटकात हि ब्राह्मणांनी स्वतः टाकलेली विधाने आहेत  बुद्ध ब्राह्मणांना एवढे महत्व दिले असते तर धम्मात ब्राह्मणांचा वेगळा संघ ठेवला असता पण तसे बुद्धाने केलेलं नाही बुद्धाने धम्म हा एक महासागर म्हणून सर्वाना समाविष्ट केले बाकी इतिहास लिहिणाऱ्यांनी काय काय घुसडू शकतात हे तीनशे चारशे वर्षांपूर्वीचा संभाजी राजांचा इतिहास लिहिणाऱ्या मुले कळते त्यामुळे त्रिपिटकात असणारी हि विधाने बुद्धाने म्हटल्याचे जास्त पुरावे नाहीत
तेव्हा धम्मपद लिहणाऱ्यांनी केलेल्या बऱ्याच चुका आहेत


सातव्या आक्षेपाचं खंडण
बुद्धाने यज्ञातील पशुहिॅसेस विरोध केला व यज्ञ बंद पाडले असा एक खोटा सिद्धांत मांडला जातो, जो थोतांड आहे. कारण वर आपण पाहिलेच आहे की बुद्ध हा यज्ञसंस्थेचा किती स्तुतीपाठक होता. जो वेदांना मानतो तो यज्ञाला मानणार हे जगजाहीर आहे.
फक्त प्रश्न आहे यज्ञातील मांसाहाराचा किंवा पशुहत्येचा
त्याबाबतीतही केवळ गृह्यसुत्रांचा संदर्भ देऊन काही लोकांनी गोहत्या वेदप्रणीतच आहे असा सोयीचा निष्कर्ष काढला आहे व तोच मुळात तर्कहीन व आधारहीन आहे. खरंतर ह्यावर आम्ही स्वतंत्रपणे ग्रंथनिर्मिती करतच आहोत व त्यात ह्याबद्दल पूर्ण भूमिका मांडूच. तूर्तास तरी एक सांगणं आवश्यक आहे की जर बुद्ध हा मांसांच्या विरोधात होता तर मग तो स्वत: मांस खात होता हे का? त्याचा मृत्यु डुकराच्या मांसखाल्याने झाला असा एक प्रचार आहे व अनेक बौद्ध इतिहासकार हे मानतात पण हे व्यक्तिश: मला पटत नाही. त्यावर मी स्वतंत्रपणे कधीतरी लिहीनच. पण तूर्तास तरी हे सांगु इच्छितो की त्याकाळी वेदांना न जाणणार्या वामपंथी लोकांनी कदाचित यज्ञात प्राणीहत्या सुरु केलीही असेल व बुद्धाने ती बंद केली असेल. पण म्हणुन तो यज्ञद्वेष्टा होता हे मात्र चुकीचं आहे हे वेगळं सांगायला नको.
उत्तर : बुद्धाची शिकवण आणि हिंदू धर्माची शिकवण खूप फरक आहे बुद्धाने दिलेला मार्ग हा हिंदू धर्मच्या शिकवणीशी जुळणार नाही तरी देखील बुद्ध वेद मानत होते वैगरे म्हणून खुळचट गोष्टी करण्यास काही अर्थ नाही हा तुमच्या बुद्धीचा नीचांक दाखवतो आहे बाकी बुद्धाने मांस खाण्यास बंदी केलेलीच नाही बुद्धाने असे कुठे म्हटलेले नाही बुद्धाने जीवहिंसा करू नका त्यात हिंसेचे अनेक प्रकार आहेत त्यावर हि वेगळे लिखाण होईल  पण धम्माचा काही एक अभ्यास नसताना केलेलं हे विधाने आहेत कुण्या तरी अर्धवट लेखकाणे मांडलेले वक्तव्य इथे मांडण्याचा प्रयत्न आहे मूळचे त्रिपिटक अभ्यासण्यासाठी कमीत कमी  दोन वर्षाचा कालखंड लागतो ते नुसते वाचन करण्यास या महाशयांनी कसे मांडलाय हे कसे समजणार सारांश वाचुन मत मांडलेले हे अर्धवट विचारवंत आहेत असेच दिसतंय बाकी धम्माची शिकवण बुद्ध सिद्धांत  खाली मांडणार च आहे


आठव्या आक्षेपाचं खंडण
बुद्धाने सर्वांस समान अधिकार दिले व ब्राह्नणशाही नष्ट केली हा आक्षेप किती तथ्यहीन आहे ते पाहु. एकतर बुद्ध हा वंशश्रेष्ठत्व राखतो त्यामुळे तो समरसता आणतो व सर्वांना समान लेखतो ही गोष्टच चुकीची आहे. दुसरं असं की त्याने सर्वांना समान अधिकार दिले हेही खोटं आहे कारण ते अधिकार हिॅदुधर्मात सर्वांना आधीपासूनच होते. मुळात हा अधिकारवादच नंतरच्या काळात निर्माण झालाय. जर तसं नसतं तर मग बुद्धाने उच्यकुळातच जन्म घेणं का पसंत केलं असतं???
जर सर्व समान आहेत, हे बुद्धाचे मत असतं तर मग हे का घडतं??
उत्तर : बुद्ध वंशश्रेष्ठत्व मानतो याला वरती म्हटल्या प्रमाणे संबंध जुळत नाही एक उदाहरण जे सत्य नाही तेच धरून बुद्ध वंशाभिमान मानतो असे विधान करून  बुद्ध उच्च कुळात जन्म घेतो हे सर्व बौद्ध धम्मात आलेल्या तथाकथित ब्राह्मणी बुद्धीच्या लोकांनी केलेली मांडणी आहे याला धम्म तत्वज्ञान छेद देतो कुठे  धम्मात ह्या असल्या विधानांना जागा नाही इतिहास व तत्वज्ञान यात फरक असतो इतिहास लिहिणाऱ्यांनी तो लिहताना केलेल्या चुका ह्या वर्तमानात कसोटीवर पारखून स्वीकाराव्या लागतात आणि बुद्धाने ब्राह्मणांचे व वैदिकांची व्यवस्था खिळखिळी करून टाकली होते हे सिद्ध होते आज भारतात कुठे हि   उत्खनन केल्यास बुद्धशिवाय काहीच सापडत नाही याला कारण काय तर  हेच आहे  भारतभर बुद्ध शिकवण रुजली होती आज हि फोफावते आहे पण हे लिखाणकर्त्याला माहित नाही अभ्यास नाही एवढेच म्हणावे लागेल बाकी जवळपास हजरो वर्षे एकाच तत्वज्ञानाची जगात ख्याती होते हे कशामुळे हे देखील समजून घेणे आवश्यक आहे बाकी बुद्ध कसा चमत्कारी केला वैगरे याची सविस्तर माहिती मी या आधी सविस्तर केलेली आहे त्याची लिंक शेवटी दिली जाईल च

मुळात वैदिक धर्म हा समता प्रणितच आहे
ज्यांनी वेदांचा सखोल अभ्यास केला असेल त्यांना हे माहिती असेल की वेदांतले अनेक ऋषी हे ब्राह्नण नाहीयेत. कारण जन्माने मनुष्य शुद्र म्हणजे संस्कारहीन असून तो कर्मामे ब्राह्मण बनतो हा वेदप्रणित हिॅदुधर्माचा अकाट्य सिद्धांत आहे. हाँ ही गोष्ट खरी की लोकांनी हे विसरून जाऊन नंतरच्या काळात जन्माधिष्ठित व्यवस्था निर्माण केली असेल पण त्याचा दोष वेदांना द्यायचा संबंधच कुठे येतो??? हा कुठला न्याय??
उत्तर : वेदामध्ये समता आहेत हाच एक जोक आहे वेद काय आहेत त्यात लिहलंय हेच ज्यांना माहिती नाही तेच म्हणत आहेत कि वेदामध्ये समता आहेत वेद ज्यांनी लिहले त्यांची नाव काय काय आहेत हे हि  या लोकांना माहिती नाही तरी देखील वेदाचे लिखाण करणाऱ्यांची माहिती घेऊ या इथे
जरा
वैदिक धर्म हिंदू धर्मानुसार विश्वाची उत्पत्ती
प्राचीन भारतीय संस्कृती चा  इ सन पूर्व २५००ते ३००० पर्यंतचा आहे
आणि इराणी राजा इंद्र याने सिंधू संस्कृती नष्ट केल्याचा उल्लेख ऋग्वेदात सापडतो याचा  अर्थ असा होतो कि  वेद हे सिंधू संस्कृती नंतर लिहिले आहे म्हणजे वेद हे अतिप्राचीन म्हणणाऱ्या लोकांचा इथे मूर्खपणा सिद्ध होतो  आता वेद हे ईश्वरनिर्मित नसल्याच स्वतः वेदाच म्हणत आहेत  वेद चार प्रकारचे आहेत ते ईश्वराने  याची ११  वेगवेगळी करणे आहेत आणि विश्वाची निर्मिती हिदेखील वेगवेगळी आहे  आता हे वेगवेगळ्या लोकांनी रचले आहे म्हणून त्यांची करणे वेगळी आहेत प्रथम आपण वेद कोणापासून उत्पन्न झाले हे पाहूया
त्यात ११ ताळमेळ हीन कारणे आहेत
१} पुरुषांच्या बलिदानातून वेद निर्माण झाले आहेत
२} स्कंध किंवा स्तंभावर आधारित चार वेदांची निर्मिती झाली
३} वेदाची उत्पत्ती त्याच्या {पुरुषाच्या } केस आणि मुखातून झाली
४} वेदाच्या उत्पत्तीस कारण इंद्राची प्रेरणा शक्ती
५} वेद काळापासून उत्पन्न झाले
६} वेद अग्नी वायू व सूर्यापासून निर्माण झाले
७} वेद प्रजापती ने जलापासून निर्माण केले
८} वेद ब्रह्माचा श्वास मात्र आहे
९} वेद मानसरुपी समुद्रातून देवानी खोदून  काढले
१०} वेद प्रजापतीच्या दाढीच्या केसापासून उत्पन्न झाले
११} वेद वाणीच्या संतती पासून उत्पन्न झाले
आता समजेल कि हि अकरा कारणे  का कारण वेद हे ११ जनानी  लिहिले आहेत आता कोण आहेत हे लेखक
१अंगिरा   २ बृहस्पती ३ भारद्वाज  ४ विद्यथि  ५ नर ऋषी ६ संकृती ऋषी ७ गौरविती ८ रन्तिदेव ९ विश्वामित्र १० अत्री ऋषी ११ कण्व
हे प्रमुख लेखक आहेत आणि वेदांचे आहेत त्यात गौतम विशिष्ट जमदग्नी गृत्समद    यापैकी ऋग्वेदात १० मंडळ आहेत आणि  निरनिराळ्या ऋषींनी रचले आहेत म्हणून वेदाची निरनिराळी कारणे  पाहायला मिळतात
आता वेदानंतर  यांचे धार्मिक ग्रंथ काय आहेत तर ब्रह्माने म्हणजे श्रुती या श्रुतीमध्ये १६ मुख्य श्रुती आहेत आणि या श्रुती मध्ये ब्राह्मणाला अधिकार प्रदान केले आहेत इतकेच काय ब्राह्मणाला दक्षिणा नाही दिली तर व्यक्तीचा आत्मा मुक्त होत नाही   आणि वर्णव्यवस्था चार माजली इमारत जिला पायर्याच नाही लिफ्ट नसलेली इमारत  तसेच यात माणसाच्या विचारला स्वतंत्र नाही
आता आपण महाभारत पुराण  पाहूया महाभारत आणि १८ पुराने हि व्यासाने  लिहिली आणि श्रीमदभगवत प्रथम स्कंद अध्या ७  श्लोक ६  मध्ये लिहिलंय कि अज्ञानी लोकांच्या कल्याणा करिता  भागवत संहितेला ज्याच्या श्रवणाने नानाप्रकारचे अरिष्ट दूर होतील  पहा श्लोक
'' अनर्थोपशमं साक्षाद भक्तियोगमधोक्षजे ।
लोकस्या  जाणतः विदवाश्चक्रे सात्वत संहीताम '' ।।
आता विचार केला तर हे वेद पुराने असे काही वाचण्याचे अधिकार शूद्रांना नव्हता त्यामुळे त्यांच्या कल्याणसाठी कसा काय  होवू शकतो एक मात्र होत कि अडाणी ब्राह्मणांना त्यांच्या कल्याणसाठी ते होत
आणि व्यासांनी पुराणात  अश्लीलता का  तेच समजत नाही त्यांच्या कथेतील सारे  अश्लीलतेचे समर्थन करताना दिसते तरीही ते महान दाखवण्याचा प्रयत्न केविलवाणा वाटतो
आता त्यांनी अश्लीलता का आणली त्याला काही उत्तरे आहेत  यापैक
१ व्यास हे ऋषी पराशर आणि धीवर कन्या सत्यवती यांच्या व्याभिचारातून  जन्माला आलेले त्यामुळे आई वडिलांवरील राग म्हणून तस केल असेल
२ पुराणांचे प्रवचन विशेषतः शुद्र स्त्रियांना ऐकवण्याचे धर्मग्रंथांचे आदेश म्हणजे या अश्लील कथा ऐकून स्त्रियांमध्ये अश्लीलता निर्माण व्हावी हा हेतू आशु शकतो कारण कोणत्याही स्त्रीशी कुठही मैथुन  करण्याचा अधिकार मनुस्मृती श्लोक ८-३५९ पहा ब्राह्मनांशिवाय जर इतर कोणत्याही वर्णाने परस्त्री गमन केले तर त्याला प्राण दंड दिला जावा कारण चारही वर्णात  स्त्री रक्षण करणाऱ्या योग्य आहे पहा श्लोक
'' अब्राह्मण: संग्रहने प्राणांत दंडमर्हति ।
चतुर्णामपि वर्णानां दारा रक्ष्यतमा सदा ।।  मनुस्मृती ८-३५९
ब्राह्मणांना परस्त्री गमन करण्याचा  भेटल्यावर कोणत्याही स्त्रीचे लज्जा रक्षण करणे कोणालाही  शक्य नव्हते विशेषकरून पुराणांचे पठन हे मठामध्ये केले जायचे आणि म्हणूनच मठातून स्त्रियांच्या शीलाचे हरण व्हयाचे  हे आपल्याला अनेक प्रसार माध्यमातून पाहायला मिळते
अश्लीलता वाढवण्यासाठी कृष्णाच्या मथुरेत कोणती सोय केली होती हे वराह  पुराणात श्लोक ६६-६१ मध्ये पहावयास मिळते मथुरेत राहणारे लोक परस्त्रीशी मैथुन करणारे आहेत ते सर्व मनुष्य नसून देवता आहेत पहा श्लोक
'' पर दार रता ये च ये नरा अजितेंद्रियाः ।
मरी वासिन: सर्व ते देवा न मानताः ।। वराह  पुराण  ६६-६१
मध्यंतरी मथुरेत कृष्ण मंदिरातील  केशवानंद  महाराजाने १५०० तरुणींचे शील हरण केल्याची बातमी प्रकाशित झाली होती आता तारीख आठवत नाही पण बातमी खरी आहे आणि याचे कारण मथुरेत परस्त्रीशी मैथ्युन हे ईश्वर करतात असे सांगून भोळ्या लोकांना फसवले जाते
आणि स्त्रिया जास्त जातात अश्या ठिकाणी आणि प्रसाद म्हणून आपले शील भ्रष्ट करून येतात किती दुर्दैवी गोष्ट आहे नाही का
आता रामायण आणि गीता
यामध्ये मुल रामायण हे वाल्मिकीने लिहिले आहे वाल्मिकी रामायणात ७ कांड व श्लोक २४००० आहेत मागाहून त्यात उत्तर कांड घुसडले आहे आणि जवळ जवळ ४० लेखकांनी रामायण लिहिले आहे त्यामुळे मुल रामायण यात थोडाफार बदल झाल आहे
आणि दुसरी गीता यात कुरुक्षेत्रावर कृष्णाने अर्जुनला उपदेश दिला त्याचे वर्णन महाभारत २५ ते ४२ अध्यायापर्यंत आहे पण गीता हि कुरुक्षेत्रावर सांगितली नसून कुण्या अर्धवट लेखकाने  लिहिले आहे
याबद्दल विशेष भागात पाही नंतर  आता वैदिक ऋषींच्या समस्या पाहून घेवूया
वैदिक ऋषी यांच्या समस्या होत्या
१ जग उत्पन्न कशे झाले ?
२ वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली ?
३ त्यांचे ऐक्य व अस्तित्व कां  आहे ?
४ निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली ?
जग कशापासून निर्माण झाले व कुठे जाणार आहे ?
या समस्यांचा उलगडा करण्यासाठी ऋषींचे विचारमंथन झाले आणि त्यांना कल्पनांचा आधार घ्यावा लागला
त्यांनी कल्पिलेल्या  देव देवता
१ प्राचीन भारताच्या प्रगत सिंधू संस्कृतीमध्ये  देवदेवतांची कल्पना केली होती असे म्हणता येत नाही कारण तेथे सापडलेले शिवलिंग नसून प्राण्यांच्या उत्पत्तीचे  प्रतिक लिंग आणि पिंड आहे इराणी लोक भारतात आले तेव्हा त्यानाही कुणी चमत्कारिक शक्ती असावी अशी कल्पना देखील  नव्हती कारण पर्शिया देशात राजालाच देव म्हणत असत
२ सभोवारच्या निसर्गातील विविध घटकांचा आर्यांच्या मनावर ठसा उमटत होता सृष्टीत जे जे विस्मयकारक कुतुहलोत्पादक असे आढळले त्याच्याकडे त्यांची मने ओढल्या गेली याच चांगल उदाहरण कसे हे ते पाहूया
कल्पित देवाना मानव रूप दिले
आता यांनी कल्पिलेल्या देवन सगुण साकार रुपात दाखवण्यासाठी  कोणाचे तरी रूप द्यावे लागणर मग यांनी काय केल जलचर प्राणी जनावरे आणि पक्षी आणि मानव यांना डोळ्यासमोर ठेवले त्यातही सर्वात सुंदर मानव म्हणून कल्पिलेल्या देवाना त्यांनी मानवरूप दिले आहे आता पुराणात जे १० अवतार आहेत त्यापैकी पहिले चार अवतार हे जनावरे आणि व जलचर प्राणी यांचे आहेत तर पाचाव बुटका वामन सदर केला वरील अवतार जनतेवर कोणताच प्रभाव पाडत  नाही म्हणून पाचाव अवतार मनुष्याच्या रुपात आणला इतकेच काय बुद्धाने स्वताला मानवाचा पुत्र म्हणूनहीअग्नी पुराणात विष्णूचा नववा अवतार म्हणून दाखवण्यात आले पण नंतर बुद्धाचे तत्व स्वीकारने काही हिंदू धर्माला पालने शक्य नाही कारण बुद्ध स्वीकारला तर 33 कोटि देवांची पलटन घरातून बाहेर टाकावि लागणार कारण बुद्धाने ईश्वर ह्या काल्पनिक  प्राण्याला नाकारले होते आणि बुद्ध स्विकारावा कसा हां महत्वाचा प्रश्न पुराण निर्मित्या कड़े पडला आणि शेवटी बुद्धाला रामायण मधे शिव्या देण्यात आल्या
आता यापुढे यांचा कल्की अवतार होणार आहे असे सांगण्यात येते हां अवतार घोड्यावर बसलेला असल्याचे सांगितले जाते
आता या ब्राह्मणांनी कश्या देवता तयार केल्या त्या [पाहूया
१ पृथ्वी देवता : सभोवतालची विस्तृत भूमी पाहून ते तिच्याकडे आकर्षित झाले आणि  त्याला नाव देवून टाकले पृथ्वी देवता
द्यौ  देवता : डोक्यावर पसरलेले विस्तृत आकाश पाहून त्यांनी त्या आकाशाचा कोणताच थांग लागेना  म्हणून त्याला  द्यौ देवता नाव देवून टाकले
वात देवता : स्पर्शाने कळणारा वारा दिसतो कसा हे समजेना म्हणून त्यांनी त्याला देवता करून टाकले  त्यांच्या बुद्धीच्या बाहेर असणाऱ्या गोष्टीना त्यांनी देवता बनवून टाकले त्याच प्रमाणे वात यांनी वायू देवता बनविली
अग्नी देवता : अनेक कार्यात मानवाला उपयोगी पडणारा अग्नी कसा निर्माण झाला ह्याचा शोध मानवाने च लावला पण तो कसा असतो याचा या ऋषींना थांग लागेना  म्हणून त्याला देवता करून टाकले
पर्जन्य देवता : त्यावेळी पावूस कसा पडतो याचे ज्ञान यांना नव्हते त्यामुळे त्यांना समजेना कि नक्की हा पावूस कसा काय पडतो आज आपल्याला माहित झाले कि पाण्यचे वाफेत रुपांतर होवून वाफेचे बाष्पीभवन होवून त्याचे ढगात रुपांतर होते आणि मग त्यापासून पाऊस पडतो पण त्यावेळी याबाबत हे ऋषी अज्ञानी असल्याने त्यांनी पावसाला देखील देवता केले
सूर्यदेवता : सूर्याला सुद्धा यांनी असेच अज्ञानातून देवता केल  आहे विशेष म्हणजे आज आपल्याला माहित आहे कि हायड्रोजन पासून हेलियम च्या निर्मितीतून प्रकाश निर्माण होतो आणि सूर्याच्या अंतरंगात हि प्रक्रिया होत असल्याने सूर्य उष्णता निर्माण करत असतो या माहितीपासून हे ऋषी अज्ञानी असल्याने त्यांना सूर्याला देवता करण्यावाचून काहीच पर्याय नव्हता
तसेच यांनी तीन लोक हि तयार केले स्वर्ग पातळ पृथ्वी  आणि यांच्या देवता सुद्धा त्याच आहेत ज्या या लोकात वावरनारे तारे आणि ग्रह आहे यांना आपल्या आकाशगंगा यांच्याव्यतिरिक्त इतर आकाशगंगेचे ज्ञान नव्हते त्यामुळे त्यांनी केवळ नाव ग्रह त्यांना देव केले  असे यांनी नैसर्गिक वस्तूंना देव केले ज्याचे त्यांना आकलन झाले नाही
आत यांचे देवता सुरापान आणि मांसाहार करताना भेटतात सर्रास पाहायला भेटतात आता यांच्या पुराव्यासाठी  आपण काही श्लोक पाहूया
यासाठी प्रथम हिंदू धर्माचा कायदा काय सांगतो आहे ते पहा
श्वावीधं शल्यंक गोधां  खडगकूर्मशर्शास्तथा ।
भक्षाणु पंचनखेष्वाहुरनुष्ट्रांश्चैकतोदतः  ।। मनुस्मृती ५/१८
मनुस्मृती अध्याय ५/१८ मध्ये माणू म्हणतो कि मांस भक्षण करण्यात दोष नाही मद्यपान करण्यात दोष नाही

हि थोडक्यातच लिहलय सविस्तर लिहिल्यास पूर्णपणे सनातनी वैदिकांचे खरे स्वरूप बाहेर येईल एवढ्यावर कळते काय समता आहे ती 



सगळी उपनिषदे ही क्षत्रियांनी रचलीयेत. काही तर स्त्रियांनी रचली असताना बुद्धाने स्त्रियांवर फार मोठे उपकार केले हा डांगोरा पिटण्यात काय हशील???
मुळात बुद्दाच्या नंतर त्याच्या संघातच किती स्वैराचार माजला हे जिज्ञासुंनी अभ्यासावे व खरेतर ते जगजाहीर आहे. तरीही लोक हे हेतुपुरस्सर विसरून वैदिक हिॅदु धर्माला शिव्या घालतात व बुद्धाला फार मोठा समाजसुधारक मानतात व बंडखोर मानतात, हे अज्ञानाचेच लक्षण नव्हे काय???

उत्तर : उपनिषदे क्षत्रियांनी लिहली हाच जोक मारण्यासारखा आहे मुळात क्षत्रियांना कार्य काय होते त्यांना लिहणे हे कार्यच नव्हते तर ते उपनिषदे लिहितील का बर ते स्त्रियांनी लिहली असे विधान करून काय फायदा मुळात ज्यांच्या स्त्रियांना अधिकारच नव्हते कोणते स्त्री कशी पाप योनीत जन्माला आलेली आहे हे धर्म ग्रंथ तुमचे सांगतच आहेत तरी देखील हे विद्वान म्हणत आहेत उपनिषदे स्त्रियांनी लिहली तर त्याचे अस्तित्व सिद्ध करून दाखवा
तेव्हाच मानता येईल अहो तसे गीता हि कृष्णाने सांगितली म्हटले जाते पण ती कृष्णाने सांगितल्याचे ऐतिहासिकत्व सिद्ध होतच नाही  तसेच हे विधान आहे


पाश्चिमात्यांनी केलेली इतिहासमीमांसा
फोडा आणि राज्य करा ह्या नीतीचा अवलंब करून पाश्चिमात्यांनी हेतुपुरस्सर इतिहासाची मीमांसा करताना
buddhism and Brahminism
किंवा
buddhism and Hinduism
किंवा
Hinduism and Brahminism असा हेतुपुरस्सर बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला जो किती चुकीचा होता हे माझ्या वरील समग्र विवेचनावरून लक्षात येईल. तेंव्हा एतद्देशीयांनी तर ह्या असल्या भूलथापांना बळी पडून आपला घात करून घेऊ नये व बुद्धाला विनाकारण वेगळा समजू नये.
उत्तर : एकूण  लढा हा असाच आहे बुद्ध विरोध ब्राह्मण वैदिक मंडळी कारण बुद्धाचा सारे सिद्धांत हे वैदिकांचे अस्तित्व खिळखिळे करणारे आहेत सविस्तर पाहू आपण

आता महत्वाची शंका व त्याचं उत्तर
जर हे सर्व खरं असेल तर कुमारील भट्ट व आदि शंकराचार्यांसारख्यांनी आपलं अख्खं आयुष्य ह्या बौद्ध व जैन मत खंडणासाठी व वैदिक धर्म पुनर्संस्थापनेसाठी का खर्चिलं???
ह्याचं उत्तर
बुद्धाच्या नंतरच्या काळात त्यांच्या अनुयायांनी बुद्धाच्या संदेशाचा चुकीचाच प्रचार केला. जो आजही केला जातो हे वरील माझ्या सविस्तर विवेचनावरून लक्षात येईल. त्यामुळे मुळचा बौद्ध पंथ जो वैदिकच होता, त्याला अनुयायांनी अकारण वैदिकद्वेष्टा बनविलं व त्यानंतर हिॅदुस्थानात वेदद्वेष सुरु झाला. व खोट्या बौद्धमतांचं प्रसार व्हायला लागला. त्यामुळेच ह्या खोट्या बौद्धमताचे खंडण करण्यासाठीच कुमारील भट्ट व आदि शंकराचार्यांनी जीवाचं रान केलं हा इतिहास आहे. आणि त्यामुळेच खोटं बौद्ध नष्ट करून खर्या बुद्धमताचा प्रचार त्यांनी केला म्हणूनच की काय शंकराचार्यांना "प्रच्छन्न बुद्ध" ही संज्ञा प्राप्त झाली.
आणि त्यातही शंकराचार्यांच्या वेळी हिॅदुस्थानात नक्की बौद्ध मत किती अस्तित्वात होतं हाही एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. इतिहासभूषण श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णींनी हा विषय स्वतंत्रपणे मांडलाय जिज्ञासूंनी तो अभ्यासावा.

उत्तर : प्रच्छन्न बुद्ध याचा अर्थ काय होतो हेच लिखाणकर्त्याला समजलेला नाही प्रच्छन्न बुद्ध म्हणजे बुद्धाचा स्वीकार करणारा होत नसून बुद्धाचे  अस्तित्व नष्ट करणार्याचा प्रयत्न कारण व्यक्ती म्हटले जाते हे ज्याला समजले नाहीत त्याला अक्कल किती असावी हे   तुम्हाला समजलेच असेल
शन्कराचार्याची दमछाक का झाली हे एकदा सविस्तर  अभ्यासावे बुद्धीच्या जोरावर त्याने जिंकलेले नाही बौद्ध कत्तली झाल्या इस्लमि शासकांनी बौद्धांची विद्यापीठ बौद्ध मठांची बेचिराख करून टाकली व त्यांनतर अस्तित्वहीन असलेल्या जागा पकडून आम्ही बौद्धांना हरवले असले पांचट विनोद केले गेले बौद्ध विद्वानांच्या हत्या करण्यात आल्या  हे का झाले याची बरीच करणे आहेत
असो

नवव्या आक्षेपाचं खंडण
बुद्ध डुकराचे मांस खाऊन मेले नाहीतच हे माझं स्पष्ट मत आहे.
खरंतर हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे कारण ह्यात अनेक संस्कृत विषयांचा अभ्यास असल्याने मी स्वतंत्रपणे केंव्हातरी माझी भूमिका मांडेनच. तूर्तास तरी एवढंच सांगु इच्छितो की वैदिक संस्कृत व आताची लौकिक संस्कृत ह्यात फरक आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. तो न कळल्यामुळेच बुद्धाच्या मृत्युचा संबंध "सूकरं मद्दवं खादयित्वा" ह्यातल्या सूकरं मद्दवं ह्या शब्दावरून डुकरांचं मांस असा सोयीस्कर अर्थ लोक काढतात जो चुकीचा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. ह्यावर मी स्वतंत्र पणे कधीतरी लिहीन. माझ्याकडे पुरावे आहेत. तूर्तास तरी मला बुद्धावरचा हा आरोप मान्य नाहीये.
उत्तर : बुद्धाचा मृत्यू विषाने व डुकराच्या मांस खाण्याने  झालेला नाही वयाच्या ८० व्या वर्षी महापरिनिर्वाण झालेले आहे  त्यामुळे कोणता हि बुद्ध असले आरोप स्वीकारत नाहीत किंवा  त्याला जास्त महतव देत नाहीत महापरिनिर्वाण बुद्धाचे झाले हे  सर्वसृत आहे त्यामुळे याचा जास्त काही महत्वाचे आहे असे वाटत नाही



तर सुज्ञ वाचक हो वरील बऱ्याच गोष्टीचे आपण विश्लेषण केलेलं आहे आता सविस्तर धम्माचे सिद्धांत अभ्यासू या

प्रथम बुद्धाने जगाला काय सांगितले ?
बुद्ध म्हणतात हे जग नश्वर आहे आणि या सृष्टीचा कोणी वाली नाही  हि सृष्टी परिवर्तनातून घडली आहे  बुद्धाला सम्यक संबोधि प्राप्त झाल्यावर त्याला  ह्या जगात केवळ दुःख आहे अन मग त्यांनी त्या दुःखावर उपायही शोधला तथागतांनी जगाला चार आर्यसत्य सांगितली अन त्या आर्यसत्याचा अभ्यास केला तर बुद्धाचा धम्म हा एकमेव असा धम्म आहे जो चिरंतर टिकणारा आहे कारण उद्या या विज्ञानाने सिद्ध केल कि देव नावाची कोणतीच संकल्पना अस्तित्वात नाही तर इतर सार्या धर्माचा डोलारा गडगडून  जाईल पण बुद्ध धम्म मात्र आहे त्याच जागी राहील कारण बुद्ध ईश्वराचे अस्तित्व नाकारतो आता बुद्धाने ईश्वराला नाकारले पण आज बुध्द धम्मात ईश्वर आणले जातात पुनर्जन्म सांगितले जातात पण बुद्धाने पुनर्जन्म कोणाचा होतो हे सांगितले असताना त्यावर लोक दुर्लक्ष करताना दिसतात आज बुद्ध धम्मात अनेक अवतार कल्पना आली आहे पण बौध्द धम्म कित समाजाला आहे हे पाहणे आवश्यक आहे
१} ज्याला प्रतीत्य समुत्पाद समजला त्याला बौद्ध धम्म समजला
अ } भगवान बुद्धाचा धम्म विज्ञानवादी आहे
१ जगातील फक्त बौध्द धम्म वगळता बाकी सारे धर्म अंधश्रद्धेवर आधारित आहेत एकमेव भगवान बुद्धानेच आपल्या स्वयंसिद्ध ज्ञानाच्या बळावर जगाला अंध श्रद्धेतून काढणारा असा विज्ञानवादी बौद्ध धम्म सांगितला तथागतांचा जन्म इतर धर्माच्या धर्मसंस्थापकाप्रमाणे जनतेला अंध श्रद्धेत बुडवून ठेवण्यासाठी नव्हताच तर तो जनतेला सत्याचा प्रकाश दाखवण्यासाठी होता तो त्यांनी पूर्णपणे सत्यात उतरवला म्हणूनच इतिहासतज्ञांनी ऐतहासिक युग भगवान बुद्धाच्या जन्मापासून मानले आहे भगवान बुद्धाच्या जन्माअगोदरचा काळ हा ऐतिहासिक युगात मनाला जात नाही  २ भगवान बुद्धाने आपल्या धम्म उपदेशाच्या माध्यमातून जगाला ब्रह्मांडाची उत्पत्ती ते प्राणी उत्पत्ती पर्यंत संपूर्ण उपदेश निसर्गनियमांशी जुळणारे सांगितले सिद्धार्थाने सम्यक संबोधि प्राप्त करण्यासाठी एका पिंपळाचे झाड पाहून त्याखाली त्यांनी संबोधि प्राप्त करण्याचे योजिले कारण पिंपळ हा २४ तास प्राणवायू सोडत असतो यावरून बुद्धाचा विज्ञानवादी दृष्टीकोन दिसून येतो  ३ ज्यावेळी बुद्धाना सम्यक संबोधि प्राप्त झाली तेव्हा त्यांना ब्रह्मांडाची प्राण्याची उत्पत्ती कशी झाली असाव याचा बोध झाला त्यावर त्यांनी चिंतन करून प्रतीत्य समुत्पाद  सिद्धांताला जन्मास घातले  ४ भगवान बुद्धांनी सांगतलेल्या तत्वज्ञानात प्रतीत्य समुत्पाद  सिद्धांत हे मुख्य आणि एकमेव सूत्र आहे महापरीनिब्बान सुत्त  {दिघनिकाय २२} महाहत्थिपदोपद {मज्जिम निकाय १९-२}या सूत्रात सांगितला आहे प्रतीत्य समुत्पाद  हे सूत्र भगवंतांच्या प्रवचनात विविध गोष्टींचे स्पष्टीकरण करते भगवन बुद्धांनी हा प्रतीत्य समुत्पाद  सिद्धांत मांडला नसता तर आज जगाला सृष्टीची निर्मिती कशी झाली हे समजले नसते भगवंत म्हणतात ज्याला हा सिद्धांत समजला त्याला माझा धम्म समाजाला आणि ज्याला  हा सिद्धांत समाजाला नाही त्याला माझा धम्म समजणार नाही ५ प्रतीत्य समुत्पाद सिद्धांताचे ज्ञान बौद्ध धम्माच्या अभिधम्म पिटकामधील पट्ठाण ग्रंथात अतिशय सविस्तरपणे समजावून सांगण्यात आले आहे हा ग्रंथ संक्षिप्त करूनही आज सहा हजार पुष्टांचा  आहे यात हेतू निर्मितीचे २४ प्रत्यत सांगितले गेलेत कोणत्याही हेतूपासून उत्पत्तीच्या प्रक्रियेला सुरुवात होते जर हेतू पासून उत्पन्न धम्माची {कार्याची } उत्पत्ती आणि निरोधला समजने निर्वाणाला समजणे आणि बौद्ध धम्माच्या मुल सिद्धांताला समजणे त्याची व्याख्या समजून घेण्यासाठी या ग्रंथाचे अध्यायन अत्यावश्यक होवून बसते ब्रह्मांडाच्या निर्मितीचा सूत्रबद्ध वैज्ञानिक लेखाजोखा म्हणजे हा ग्रंथ आहे  ६ पट्ठाण नामक प्रकरणाचा जो उपदेश भगवंतानी दिला आहे तो परिपूर्ण अशी देशना आहे   पट्ठाण हि महत्वपूर्ण बुद्ध तत्त्वज्ञानाची खरी कसोटी आहे
याच्या अभ्यासाने नित्य नित्यवाद आणि नित्य पदार्थांचे विद्वान या नित्यवादाचि साथ सोडतात भगवन बुद्धाच्या धम्मात आत्मा ईश्वर किंवा परमात्म्यासाठी कोणतेही अन कुठलेही स्थान राखून ठेवलेले नाही तरीही बुद्ध पुनर्जन्म सांगतात ते कोणाचा कुशल कर्माचा हा जन्म काही मनुष्याच्या दुसर्या जन्मात होतो असे नाही मनुष्याच्या त्याच  जन्मात होत असतो भगवन बुद्धाच्या या ग्रंथाचा अभ्यास करून जगाला सापेक्षवाद  सिद्धांत सांगणारे वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाइन म्हणतात  आधुनिक विज्ञान युगाला धर्माची गरज उरणार नाही पण जगात जर कोणता धर्म टिकणार असेल तर तो बौद्ध धम्म आहे कारण एकमेव हाच धम्म आहे जो विज्ञानाच्या कसोटींवर  पूर्णपणे उतरतो
भगवान तथागताने मानसिक आणि भौतिक जगात   जरी कोणत्याही निर्माण   कर्त्याला पाहिल नाही पण  पहिला कोणत्याही ऋतूधरी वरुणस पहिले नाही पण  स्वतः  ऋतूच्या नियमाना अवश्य पाहिले  १० प्रतीत्य समुत्पाद  हा तो सखोल आणि सगळ्या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा एकमेव सिद्धांत आहेहा कोरा मनगढंत दार्शनिक सिद्धांत नाही ह सम्यक सम्बुद्धाची प्रत्यक्ष अनुभूती आहे हा कोरा दार्शनिक सिद्धांत असता तर तथागताला उपदेश करायची काहीच गरज नव्हती पण तथागत करुणेचे महासागर आहेत म्हणून त्यांना इतर दार्शानिकांच्या समकोटीचे बनण्याची गरज नव्हती  ११ भगवान बुद्धाच्या रूपाने मानवतेला आधार मिळालेला आहे प्रतीत्य समुत्पाद सिद्धांताच्या रूपाने तथागताच्या करुणेचा ज्ञानमय परिणाम जगाला दिसून आला सत्व जग दुःखाच्या चक्रात चक्रिभुत झालेले तथागताने पहिले संपूर्ण जगात शोक रडणे दुःख आणि उदासीन जरा आणि मरण त्यांनी आपल्या बुद्ध नेत्राने पहिले या सर्व दुःखाचे मुल कारण आहे जन्म जन्माचे कारण भव भवाचे  कारण उपादान उपादानाचे कारण तृष्णा तृष्णेचे कारण वेदना वेदनेचे कारण स्पर्श स्पर्शाचे कारण सळायतन  सलायतनचे कारण नामरूप नामरूपाचे कारण विज्ञान विज्ञानाचे कारण संस्कार संस्काराचे कारण अविद्या आहे   १२ अविद्या आणि तृष्णेच्या संचालित भवचक्रात सापडलेल्या प्राण्यांना आरंभाची  जाणीव होत नाही पण हे निश्चित आहे कि आवागमनाच्या चक्राला अविद्याच गतिमान करते पण संस्काराचा निरोध केला तर मत्र्न संस्काराचा निरोध होईलच संस्काराचा निरोध केला तर विज्ञानाचा निरोध होईल विज्ञानाच्या निरोध केला तर नामरूपाचा निरोध होईल नामरूपाच्या निरोधने सलायतनचा निरोध होईल सलायतनाच्या निरोधने स्पर्शाचा निरोध होईल स्पर्शाच्या निरोधने वेदनेचा निरोध होईल वेदनेच्या निरोधने तृष्णेचा निरोध होईल तृष्णेच्या निरोधने उपादानाचा निरोध होईल उपादानाच्या निरोधने भवाचा  निरोध होईल भवाच्या निरोधने जातीचा निरोध होईल जातीचा निरोध झाला तर म्हातारपण मृत्यू शोक रडणे दुःख मानसिक कष्ट आणि दुःख समूहाचाच निरोध होईल हे तथागतांचे प्रतीत्य समुत्पाद  उद्गार आहेत दुःखाचे आवागमन आणि अत्संगमता सहेतुपुर्वक दाखविण्यासाठीच तथागताने करुणापुर्वक उपदेश दिला   १३ अभिधम्मात लोभ द्वेष मोह आणि त्याच्या विरुद्ध अलोभ अद्वेश आणि अमोह ह्या पदार्थाचे मुल कारण हेतू म्हणतात ह्यातून पहिले तन हे कर्मविपाकाच्या दृष्टीने अकुशल आहेत आणि दुसरे तीन हे कर्मविपाकाच्या दृष्टीने कुशल आहेत ह्या ज्या काही कुशल आणि अकुशल अवस्था मानसिक किंवा भौतीक जगात असतात त्यांचे मुल आधार किंवा अकुशल धम्मच  आहेत त्यांचे मुल आधार किंवा हेतूची उपस्तिथि किंवा अनुपस्थिती निर्भर करते १४ एकंदर मानवी जीवनाच्या उगमाचा  विचार केला तर अविद्या किंवा अज्ञान आणि यापासून उदभावणारी तृष्णा हीच दुःखाची मुल करणे आहेत अविद्याचा नाश करण्यासाठी भगवानने अष्टांग मार्गाचा उपदेश केलेला आहे तो म्हणजे सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मात सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी हाच तो अष्टांग मार्ग आहे
२} सम्यक दृष्टीमुळे प्रतीत्य समुत्पाद  सिद्धांत समजतो
१ सम्यक दृष्टीने अविद्यच अज्ञांचा नाश होतो भगवंताच्या आर्य अष्टांगिक मार्गातील सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी होय अविद्येचा नाश हाच सम्यक दृष्टीचा मुल हेतू आहे हि मिथ्या दृष्टीने अगदी उलट असते दुःखाचे अतित्व आणि दुःख निरोधाचा मार्ग हि उदात्त तत्वे न समजने  म्हणजे अविद्या होय स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टी प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहेत सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मात सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती अन सम्यक समाधी हा अष्टांग मार्ग उपयोगाचा आहे   २ प्रतीत्य समुत्पाद  हा ब्रह्मांड उत्पत्तीचा सिद्धांत पूर्णपणे समजून घेण्यासाठी सम्यक दृष्टी किती आवश्यक आहे हे आपल्याला लक्षात येईल सम्यक दृष्टी प्राप्त करण्यासाठी मिथ्या दृष्टीचा नाश करणे आवश्यक आहे मिथ्या दृष्टीचा नाश  करण्यासाठी मिथ्या गोष्टीच्या त्याग करणे आवश्यक आहे
३} दैवी चमत्कृती वर विश्वास ठेवणे म्हणजे मिथ्या दृष्टी
१ एखादी आकस्मित आणि आश्चर्यकारक गोष्ट घडली कि मिथ्या दृष्टी असलेली व्यक्ती त्या गोष्टीचा सबंध ईश्वरीय चमत्काराशि जोडतो यावर भगवान बुद्धाने म्हटले आहे कि प्रत्येक घटनेला कारण असते एवढेच नव्हे मटार प्रत्येक कारण हेदेखील प्राकृतिक कारणांचा परिणाम आहे  २ मनुष्य हा काळ प्रकृती आकस्मिकता ईश्वर दैव आणि अनिर्वाय आवश्यकता यांच्या हातातील बाहुले आहे काय  ३ जर मनुष्य स्वतंत्र नाही तर मानवच्या अतित्वचे प्रयोजन काय तो जर दैवी चमत्कृती वर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय  ४ मनुष्य जर आपल्या बुद्धीचा उपयोग स्वतंत्रपणे करीत करीत असेल तर प्रत्येक घटनेला मानवी किंवा प्राकृतिक कारण असले पाहिजे ज्या घटनेचा दैवी चमत्कृत उगम असणे शक्य नाही असा विचार तो  करील { ज्याच्या अस्तित्वाबद्दल शंका आहे तर दैव नशीब भाग्य कुठले }  ५ कदाचित हे संभवनीय आहे कि घटनेचे वास्तविक वास्तविक कारण सापडत नसेल परंतु माणूस बुद्धिमान असेल तर कधीतरी एके दिवशी ते कारण त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही  ६ दैवी  चमत्कृती च्या खंडन करण्यामुळे माणूस बुद्धिवादी बनतो तो सत्याचा शोध लावण्यासाठी कटिबद्ध होतो  ७ माणसाच्या शोध करण्याच्या प्रवृत्तीने आड भ्रामक समजुती येतात त्याचे उगमस्थान नष्ट केले पाहिजे तर दैवी चमत्कृती वर विश्वास ठेवणार नाही ८ यालाच भगवान बुद्धाचा कम्म सिद्धांत अथवा हेतुवाद म्हणतात हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे तो बुद्धिवाद शिकवतो आणि  बुद्ध धम्म बुद्धी वादापेक्षा वेगळा नाही दैवी चमत्कृती वर विश्वास हा सम्यक दृष्टीला निब्बाण  प्राप्त करण्याचा मार्गातील अडथळा आहे
३} ईश्वरावर विश्वास म्हणजे मिथ्या दृष्टी होय
१ ब्राह्मणी धर्मात जग हे ईश्वराने निर्माण केल्याचे म्हटले आहे याच काल्पनिक ईश्वराला प्रजापती महाब्रह्मा इत्यादी काल्पनिक नावे दिलेली आहेत  २ हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला ब्राह्मणी धर्म ग्रंथात उत्तर नाही   ३  जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्या तथाकथित ईश्वराचे वर्णन सर्व शक्तिमान सर्वव्यापक आणि सर्वज्ञ असे करतात   ४ भगवान बुद्धाने ईश्वराच्या अस्तित्वाचा अजिबात स्वीकार केलेला नाही त्याचे कारण असे   अ } ईश्वराला कोणी पहिले नाही लोक फक्त ईश्वराबद्दल बोलतात ईश्वर अज्ञात असून अदृश्य आहे असे ते मानतात कारण त्यांना प्रवचनामधुन अन कथांमधून ते सांगण्यात आले आहे
ब } कोणी हि असे सिद्ध करू शकलात नाहीत कि ईश्वराने हे जग निर्माण केले आहे आणि हे जग रचले आहे हे जग रचले नसून विकास पावले आहे
क } भगवान बुद्ध म्हणतात कि ईश्वराधीन धर्म कल्पनेवर आधारित आहे म्हणून ते धर्म काहीच उपयोगाचे नाहीत यामुळे भ्रामक समजुती निर्माण होतात
ड } भगवान बुद्धाने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला आहे कारण ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत सत्यावर आधारलेला नाही
इ } हा विचार भगवान बुद्धाने वशिष्ट आणि भारतद्वाज या दोन ब्राह्मणा बरोबर झालेल्या संभाषण  मधून मांडलेला आहे
ई } भगवान बुद्ध वशिष्ट ला म्हणाले वासेष्ट या तीन हि वेद जाणणाऱ्या ब्राह्मनापैकी  एकाने तरी ब्रह्माचे साक्षात दर्शन घेतले आहे काय त्यावर वशिष्ट हि नाही म्हणून उत्तर देतात 
तथागत बुद्धांनी काही महत्वाच्या प्रश्न उपस्थित केलबुद्ध वाशिष्टाला  विचारतात कि प्रथम जन्मास येणारा प्राणी म्हणतो कि मी ब्रह्म आहे विजेता आहे सर्व जाणणारा आहे सर्वाधिकारी आहे मालक आहे निर्माता आहे रचयता आहे मीच माझा स्वामी आहे आणि जे हयात आहे आणि पुढे होणारे आहेत त्यांचा मी पिता आहे माझ्यापासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत याचा अर्थ असा कि जे प्राणी आज आहेत आणि भविष्यात अजे प्राणी होणार आहेत त्यांचा पिता ब्रह्म आहे का आणि  तुझे म्हणणे असे आहे  का कि पूज्य विजेता अपरभुत जे आहेत यांचा जनक ज्याच्यामुळे सार्याची उत्पत्ती झाले  आहे असा जो ब्रह्म तो स्थायी आहे सतत राहणारा आहे नित्य आहे अपरिवर्तन शील आहे तो अनंतकाळ टिकणारा आहे तर मग त्या ब्रह्माने निर्माण केलेलं आम्ही इहलोकी येवून अस्थायी अनित्य आणि परिवर्तनशील अल्पजीवी  मरणधर्मी कसे झालो ?
तथागत म्हणतात कि जर ईश्वर शिवस्वरूप आहे तर माणसे  खुनी चोर व्यभिचारी खोटे बोलणारी निंदक बकवास  करणारी लोभी द्वेषी विकृत अश का होतात यांचे कारणही ईश्वराच असलापाहिजे शिवस्वरूप ईश्वर आपल्या लेकरांना दुर्गुणी का होवू देतो जर कुणी महान सृष्टीकर्ता असेल आणि न्यायी दयाळू असेल तर मग जगात इतका अन्याय  का फैलावतो ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवतालचे किळसवाणे दृश्ये दृष्टीस नाही का पडत ब्रह्म आपली रचना का सुधारत नाही जिला मर्यादा नाही अशी त्याची शक्ती व्यापक असेल तर  त्याचे हात कल्याणकारी काम करण्यासाठी का सरसावत नाही त्याने निर्माण केलेली पृथ्वी आज दुःखात क आहे  तो सर्वाना सुख  का देत नाही अफरातफरी चोरी अज्ञान का फैलावतो सत्यावर असत्य का मात करते सत्य आणि न्याय पराभूत का होतात मश्यपते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा तुमचा ब्रह्मा अन्यायी ठरतो भगवान बुद्ध धार्मिक क्रया करण्याच्या विरोधी होते ते याच्याविरोधात असल्याचे कारण म्हणजे क्रियाकलाप भरमक समजुतीचे भांडारच असते भ्रामक समजुती ह्या अष्टांग मार्गातील जे महत्वाचे तत्व संम दिठ्ठी  हिच्या त्या शत्रू आहेत 
४ } ईश्वरावर विश्वास ठेवणे हि भयानक गोष्ट आहे
१ ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना ह्यांच्या उत्पादक आहे पूजा आणि प्रार्थना यांच्या आवश्यकतेमधून पुरोहितपद निर्माण होते कारण पुरोहित हा असा दृष्ट बुद्धी आहे कि तो सर्व प्रकारच्या खुल्या समजुती निर्माण  करतो आणि त्यामुळे सम्यक दृष्टी चा विकास होणे अशक्य होते  २ भगवान बुद्धाजवल ईश्वराच्या अस्तित्वाला मारक असा विचार होता तो निःसंदेह देवावरील विश्वासाने खंडन करणारा आहे हा विचार प्रतीत्य समुत्पाद या सिद्धांतात अंतर्भूत आहे  ३ ह्या महत्वाच्या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्वाचा नाही त्याचप्रमाणे ईश्वराने हि सृष्टी बनवली  किंवा नाही हाही  मुख्य प्रश्न नाही खरा प्रश्न आहे निर्मात्याने सृष्टी निर्माण केली कशी   ४ महत्वाचा प्रश्न असा कि सृष्टी ईश्वराने भवपासून  निर्माण केली कि अभव पासून केली   ५ काहीतरी हे काहीच नाही मधून उत्पन्न केले  गेले यावर विश्वास ठेवता येत नाही  ६ तथाकथित ईश्वराने काहीतरी  हे काही नाही मधून निर्माण केले असे म्हटले तर ज्या काहीतरी मधून जे नवे निर्माण केले ते निर्मितीपुर्वीच अस्तित्वात असले पाहिजे म्हणून ईश्वराला त्याच्या पूर्वीच अस्तित्वात असलेल्या काही तरी चा निर्माता म्हणता येत नाही  ७ जर ईश्वराने काही वस्तू निर्माण केले असेल तर ईश्वर निर्माता अथवा आदिकारण म्हणता येणार नाही {जशे ब्रह्मा अस्तित्वात येण्याच्या पूर्वी तो संपूर्ण पाण्याने भरलेल्या ब्रह्मांडातील अंड्यात होता आणि एक हजार वर्षाने इतर देवता बरोबर अंडे फोडून बाहेर आला असा वैदिक ब्राह्मण धर्माचा सिद्धांत आहे पण ब्रह्मांड भरून पाणी आणि त्यातील अंडे या गोष्टी अगोदरच अस्तित्वात होत्या म्हणून ब्रह्मा सृष्टी निर्मितीचे कारण अशुच शकत नाही } ८ ईश्वर हा संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे हा विश्वास तर्कदुष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे ती मिथ्यादृष्टी आहे हा विश्वास केवळ असल्याचा विश्वास ठरतो
५} आत्म्यावरील विश्वास  हा अधर्म आहे
१ भगवान बुद्धाने म्हटले आहे कि आत्म्यावर आधारलेला धर्म हा कल्पनेवर आधारलेला धर्म आहे  २ आत्म्याला कोणीही पहिले नाही किंवा त्याच्याशी कुणी संभाषण केले नाही आत्मा हि गोष्टी अज्ञात आणि अदृश्य आहे  ३ जी गोष्ट वास्तव आहे ती आत्मा नसून मन आहे मन हे आत्म्यापासून वेगळे आहे तथागत म्हणतात कि आत्म्यावर विश्वास ठेवणे काहीच उपयोगाचे नाही म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म आपल्या उपयोगाचा नाही   ४ असा धर्म केवळ भ्रामक समजुतीचा जनक ठरतो   ५ भगवान बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवीत नाहीत आत्म्या सबंधी त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद म्हणतात  ६ आत्म्याच्या बाबतीत भगवन बुद्धाचे असे मत होते कि देवाच्या अस्तित्वावरील विश्वास सम्यक दृष्टीला जेवढा बाधक आहे तेवढाच आत्म्यावरील विश्वास बाधक आहे  ७ देवाच्या अस्तित्वावरील विश्वास ज्याप्रमाणे भ्रामक समजुती निर्माण करतो त्याच प्रमाणे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतीनं कारणीभूत होतो तथागतांच्या मते आत्म्याचा अस्तित्वावरील विश्वास हा देवाच्या वरील विश्वासापेक्षा भयंकर आहे कारण त्यामुळे पुरोहित वर्ग निर्माण होतो भ्रामक होतो भ्रामक समजुतीचे पेव फुटतात एवढेच नव्हे तर तो पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्युपर्यंत सत्ता गाजवण्याचा अधिकारच बहाल करतो  ८ आत्म्याविरुद्ध भगवान बुद्धाने अगदी खास अशी खंडन कारक विचारसरणी मांडली  आहे भगवान बुधाने आत्म्याला वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या सिद्धांता विरुद्ध आपला नामरूप सिद्धांत मांडला  ९ नामरूप हि प्राण्याच्या सामुहिक संज्ञा  आहे १० भगवान बुद्धाच्या मतानुसार प्राणी काही भौतिक तत्वे आणि मानसिक तत्वे यांच्या मिश्रणाचा परिणाम आहे या भौतिक तत्वांना स्कंध म्हणतात  ११ रुपस्कंध हे प्राधान्याने पृथ्वी जल वायू आणि तेज या चार तत्वांचा परिणाम आहे हे स्कंध रूप अथवा शरीराचे घटक आहेत १२ रूपस्कंधा शिवाय नामस्कंध हि एक गोष्ट आहे तेही प्राण्याच्या रचनेचे घटक आहेत या नामस्कंधाला विज्ञान किंवा चेतना असे म्हणतात या नामस्कंधात तीन मानसिक तत्वे आहेत ती म्हणजे वेदना { सहा इंद्रियांच्या त्यांच्या त्यांच्या विषयाशी संपर्क झाल्यामुळे होणारी अनुभूती } संज्ञा  आणि संस्कार  चेतना या तीन नामस्कंधात समाविष्ट केले जाते आधुनिक मानसशास्त्रज्ञ कदाचित असे म्हणेल कि विज्ञान हाच मानसिक क्रियांचा मुल स्त्रोत आहे विज्ञान कोणत्याही प्राण्यांचा केंद्रबिंदू आहे
१३ पृथ्वी जल तेज आणि वायू या चार तत्वांच्या मिश्रणातून विज्ञान उत्पन्न होते या सिद्धांतावर आक्षेप घेणाऱ्या तथागत बुद्धाने स्पष्टपणे उत्तर दले आहे कि जेथे  शरीर अथवा रूप काया आहे तेथे त्याच्यासह नामकाया हि राहत असते
१४ यावर आधुनिक विज्ञानातील  एक उदाहरण देत येईल जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे त्याच्यासह आकर्षण क्षेत्र हि असतेच हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण झाले हे कोणालाही माहित नाही परंतु ते नेहमी विद्युत क्षेत्राबरोबर असते
१५ शरीर आणि विज्ञान यांच्यात याच प्रकारचा सबंध आहे असे म्हणता येते
१६ जेव्हा विज्ञानाचा { चित्त आणि चेतना } उदय होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो म्हणून विज्ञान हे मानव जीवनातील मुख्य वस्तू आहे
१७ यावरून स्पष्ट होते कि प्राणी  जेवढी क्रिया करतो ती सर्व विज्ञानाच्या द्वारा अथवा त्याचा परिणाम म्हणून करतो
१८ भगवान बुद्ध आत्मा मानणार्यांना असा प्रश्न करायचे कि आत्म्याने करावयाचे कोणते कार्य आहे ? आत्म्याची म्हणून जी कार्ये मानली जातात ती सर्व विज्ञानाद्वारे च होत असतात
१९ आत्मा मानणाऱ्या च्या धर्मग्रंथात असे म्हटले आहे कि पुरुषाच्या शुक्राणू आणि स्त्रीचे अंडानु यांच्या संयोगाने स्त्रीच्या गर्भाशयात शरीर निर्माण होते आणि नंतर बाहेरून गर्भाशयात आत्मा प्रवेश करतो हा अत्मावाद्यांचा सिद्धांत बुद्धी संगत  तर्क संगत  आणि विज्ञान संगत  आहे का ? भगवान बुद्धाने हा सिद्धांत अमान्य केला आहे
२० भगवान बुद्ध म्हणतात कि नुसत्या स्त्री पुरुषाच्या मिलनाने शरीर निर्माण होत नाही तर त्याबरोबर तिसरी घटना घडते त्याला च्युतिचित्त { deceased  conciousness } असे म्हटले जाते 
२१ मृत्युच्या वेळी शरीर जे चित्त सोडते तेच च्युती चित्त होय आणि हे सूक्ष्म कानाच्या रुपात  असते आणि हे चित्त शरीर संपादन करण्यासाठी तरंगाच्या रुपात फिरत असते जे खालीवर फिरत असते त्यालाच विज्ञान असे म्हणतात आणि हे च्युतिचित्त  कोणत्याही प्राण्याचे असू शकते  त्यामुळे काही लोकांचा गैरसमज होवू  हे चित्त आहे तर त्यालाच आत्मा  कशावरून म्हणत नसेल तर त्यांसाठी आत्मा हि  विधान  फक्त मानव प्राण्यासाठी आहे कोणत्याही प्राण्यासाठी नाही
२२ भगवान बुद्ध म्हणतात कि च्युतिचित्त हे ;देखील तृष्णा युक्त असते  शुक्राणू अंडानु आणि च्युतिचित्त कार्यरत होते या तृष्णे मुले च्युतीचीत्ताचा शुक्राणू आणि अंडानु यांच्याबरोबर संयोग होतो म्हणजे शरीराची निर्मिती होते त्याच वेळी त्या शरीरात चेतना निर्माण होते आणि या गोष्टी एकाच वेळी घडून येतात आणि त्यावेळी या च्युतीचीत्ताचा  अंत होतो या सार्या प्रक्रियेला निषेचन {fertilization }म्हणतात
२३  याला बीजाचे उदाहरण देत येत माती आणि पाणी यांच्या सहयोगाने बीज अंकुरले जाते त्याचे रोपटे बनते पण बीज मारून जाते म्हणजेच बीज पाणी आणि माती या तिन्हीच्या संयोगानेच निषेचन  बनतो जसे अंकुराला जन्म देवून बीज मारून जाते त्याच प्रमाणे शुक्राणू आणि अंडाणु आणि च्युतिचित्त यांच्या एकत्र येण्याने जीव निर्माण होतो आणि बीजाप्रमाणे नंतर च्युतिचित्त मरून  जाते च्युतिचित्तचे कामही बीजाप्रमाणे संपून जाते
जीवन विज्ञानाचे वरील विश्लेषण  अडीच हजार वर्षापूर्वी करून सांगणारे भगवन बुद्ध वैज्ञानिक विचारांचे आद्य जनक आणि जगातील पहिला वैज्ञानिक या नामाभिधानास सूर्याप्रमाणे शोभून दिसतात
२४ ब्रह्मांड निर्मिती आणि जीव निर्मितीचेच ज्ञान भगवान बुद्धाच्या प्रतीत्य समुत्पाद  या जगप्रसिद्ध सिद्धांतात काठोकाठ भरलेले आहे प्रतीत्य म्हणजे कारण असल्यामुळेच समुत्पाद  म्हणजे कार्य उत्पन्न होते म्हणजेच कारणामुळेच कार्य ब घडून येते यालाच कार्यकारणभाव असेही म्हणतात कारण आणि कार्याची अशीच शृंखला असते उर्जा आणि सोबत असलेली चेतना हे मुल कारण असल्यामुळेच ब्रह्मांड आणि जीवसृष्टी  अस्तित्वात आली भगवान बुद्ध उर्जेला अनंत आणि चेतनेला जाणीव असे म्हणतात उर्जा अमर असलेले अविनाशी तत्व आहे ऊर्जेपासून जशी ब्रह्मांडाची उत्पत्ती होवून त्याचा विकासझाला आहे तसेच ब्रह्मांडामधील प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती झाली सृष्टीत  कारणाशिवाय काहीच घडू शकत नाही निर्माण होणार्या प्रत्येक कार्याला कारण प्रत्यय किंवा हेतू असतोच हेतू जर नष्ट झाला तर उत्पत्ती हि नष्ट  होताना वाटते पण जगात [पूर्णपणे काहीच नष्ट होत नाही तर एवढेच म्हणता येते कि ते अनित्य आणि परिवर्तनशील आहे  कोणत्याही उत्पत्तीत कोणत्याही तथाकथित ईश्वराचा सहभाग दाखविणे एक  कल्पना आहे ऋग्वेद ईश्वराचे अस्तित्व नाकारतो हे  घ्यावे 
२५ प्रतीत्य समुत्पाद  म्हणजे प्रत्येक उत्पत्तीचा सिद्धांत होय अभिधम्म पिटकाच्या पट्ठाण या अजूनही सहा हजार पृष्ठे पृष्ठे  ग्रंथात भगवान बुद्धाचा सूक्ष्म आणि सविस्तरपणे  सांगितलेला समुत्पाद  सिद्धांत हा बुद्धाला जगातील पहिला वैज्ञानिक म्हणून गौरविन्यास परिपूर्ण आहे
आता आपण जर हा सिद्धांत पाहिल्यावर मग आता ईश्वराचे अस्तित्व मानायचे का आपण  बुद्धाच्या सिद्धांतानुसार जर चालायचे म्हटले तर आम्हाला प्रथम प्रतीत्य समुत्पाद  हा सिद्धांत  तरच आपण सारे बुद्ध तत्वज्ञान जणू शकतो आणि बाबासाहेबांनी नेमका हाच सिद्धांत गृहीत धरून जगासमोर खरा बुद्ध मांडला 

भगवान बुद्धाचा कर्म{कम्म } सिद्धांत
१}चांगल्या कर्मासाठी नैतिकतेची आवश्यकता
१ वैदिक धर्मातील सर्वश्रेष्ठ आणि सर्वात जुना ग्रंथ ऋग्वेद नैतिकतेबद्दल काहीच सांगण्यात आलेले नाही पण अनैतिकता मात्र ओसंडून वाहत आहे ज्या धर्मग्रंथात नैतिक आचरणाच्या कथा किंवा उदाहरणे नसतील नैतिकते विषयी मार्गदर्शन नसेल तर धर्मातील जनतेने कोणाकडे पाहायचे / ऋग्वेदात नैतिकतेचा अभाव असला तरी दारू पिणे गुरढोरा चे येथेच्छ मांस खाणे कोणत्याही स्त्रीशी संभोग करणे याबाबतीत मात्र ऋग्वेदरुपी महासागर तुडुंब भरला आहे
२ म्हणूनच वेदविशयि आपले मत व्यक्त करताना भगवान बुद्धाने म्हटले आहे मानवाच्या नैतिक उत्थानाकरिता  वेद कुचकामी आहेत वेद हे ओसाड वाळवंट  आणि पथहिन जंगल आहे
३ अनैतिकतेच्या संबंधाने विष्णू देवतेचे नाव सर्वात वर आहे विष्णूने बहुजन राजा बळी चे राज्य कपटाने बळकावून त्याचा वध केला मुलनिवाशी राजा जालंधर रूप घेवून जालंधर पत्नी तारा चे सतीत्व नष्ट केले शिवाने मोहिनीच्या मागे लागून वीर्य स्खलन केले ब्रह्माने मुलीशी अनैतिक कर्म केल्यामुळे महात्मा ज्योतीबांच्या नजरेत तो बेटीचोद  ठरला गौतम ऋषीचे रूप घेवून इंद्राने ऋषीपत्नी अहिल्येशि व्यभिचार केला गुरु बृहस्पतीचा शिष्य चंद्राने गुरुपत्नी तारा चे अपहरण करून तिला बुध नावाचा पुत्र करून दिला सूर्य राजाने कुंतीला कुमारी माता बनवून कर्णास जन्माला घातले
४ वादिक धर्माचा महापुरुष कृष्णाने नग्न पने अंघोळी करीत असलेल्या गोपींची वस्त्रे चोरली त्यांना कपाळावर ओंजळ बांधून व वाकून स्वतःला  नमस्कार करण्यास भाग पाडले  आणि नंतरच त्यांची वस्त्रे दिली {भागवत १०-२२-१९} आजच्या   सिनेमातील नंगानाचाला लाजवणारी कृष्णाची गोपिसोबत यमुना नदीत रासलीला आहे
असे अनेक प्रकारचे सबंध आणि कर्म वैदिक धर्म ग्रंथात आहेत
२ हिंदू आणि बौद्ध कर्म सिद्धांत एक नाहीत
१ वैदिक ब्राह्मणी धर्माचा कर्म सिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर  आधारलेला आहे उलटपक्षी बौद्ध धम्म आत्म्याचे अस्तित्वच मानत नाही त्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नः वैदिक कर्म सिद्धांत हा आत्म्याच्या जन्मजन्मावर आधारलेला आहे
२आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे वैदिक धर्म मानीत असल्यामुळे कर्म हे जन्माजन्मांतरी चालूच असते
३ बौद्ध धम्मात आत्माच मनात नसल्यामुळे जन्माजन्मांतरीचा नियम बौद्ध कर्म सिद्धांतास लागू होत नाही
४ देहाव्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर वैदिक धर्म आधारलेला आहे देह मृत झाला तरी आत्मा मरत  नाही आत्मा देहातून निघून जातो हि वैदिक धर्माची विधाने बौद्ध सिद्धांताला लागू नाहीत ५ कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो असे वैदिक धर्म मानतो जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून जातो त्यावेळी त्याच्या आत्म्यावर अनेक संस्कार झालेले असतात
६ या संस्कारामुळे पुढील जन्मी त्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असते हिंदूंचा हा सिद्धांत आत्मा न मानणाऱ्या बौद्ध कर्म सिद्धांताशी विसंगत आहे म्हणून दोन्ही धर्माचे कर्म सिद्धांत हे एकाच आहेत असे मानणे  चूक आहे यापासून आत्मा न मानणार्यांनी सावध असावे
३}बुद्धाचा कर्मसिद्धांत गत  जन्माशी सबंधित नाही
१ आत्मा आणि ईश्वर कोणीही कधीही पाहिलेले नाही त्यांचे अस्तित्व कोणीही छातीठोकपणे सिद्ध करू शकत नाही गतजन्मी कोणी चांगली कर्मे केलीत आणि कोणी वाईट कर्मे केलीत हे कोणीही सांगू शकत नाही मह गतजन्मी च्या कृत्यावरून चांगला वाईट जन्म मिळतो यावर विश्वास कसा ठेवायचा कुणला स्वर्ग मिळाला आणि कोणाला नरक मिळाला हा सर्व काल्पनिक प्रकार आहे कारण वर आकाशात पृथ्विलोकांशी सबंध येणारा कोणताच लोक नाही स्वर्ग नरक या पर्शिया देशाच्या इंद्र आणि यम राजांच्या राज्ये आहेत आणि ती जमिनीवरील राज्ये आहेत याला श्रीमदभागवत देखील साक्षी आहे मुल निवाशि भारतीयांना मूर्ख बनवण्यासाठी विदेशी आर्य ब्राह्मण लोकांनी तसे खोटे खोटेच ग्रंथात लिहून ठेवलाय
२ भगवान बुद्धाने जो कर्म सिद्धांत सांगितला आहे त्यात कराल तसेभराल असे म्हटले आहे असे सांगणारा महामानव बुद्ध पहिला महापुरुष आहे
३  भगवन बुद्धाचा कर्म सिद्धांत हा कर्म आणि त्याचा वर्तमान जीवनावर होणारा परिणाम या पुरताच मर्यादित आहे पूर्व जन्माचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर बुद्धाचा विश्वास नव्हता
४ जन्म हा मत्यपित्या मुळे होतो म्हणूनच बालकाच्या जन्माला जो वारसा लाभतो तो त्याच्या आईवडिलांकडून च मिळतो असे तथागत मानतात
५ माणसाची स्थिती अनुवांशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालीच्या परस्थितीवर अधिक अवलंबून असते बुद्धाला चांगल्या आणि वाईट कर्माचा सबंध फक्त वर्तमान काळाच्या कर्माशी सांगायचा आहे
४} कर्म म्हणजे काय
१ कर्म म्हणजे सामान्य अर्थाने कार्य क्रिया किंवा आचरण होय शरीराने वचनाने  आणि मनाने हेतुपूर्वक केलेले कोणतेही कार्य म्हणजे कर्म होय सर्व प्रकारचे कर्म चांगले किंवा वाईट कर्माच्या अंतर्गत येतात कर्म आणि पुनर्जन्म एकमेकांशी सबंधित आहेत कर्म आणि पुनर्जन्म बौद्ध धम्माचे मौलिक सिद्धांत आहेत
२ बौद्ध धम्मात कर्म एका अशा मानशिक प्रवृत्तीला म्हणतात जी कार्य उत्पन्न करते भगवान बुद्धांच्या शब्दात सांगयचे म्हणजे चेतना किंवा चैतसिक कार्य हेच कर्म आहे अन्य कर्मे हि क्रिया समजल्या जातात
३ बौद्ध धम्मात प्रत्येक कार्य आणि क्रियेला कर्म म्हटले जात नाही परंतु चेतन आणि चेतनाकृतलाच कर्म म्हटले जाते त्याचेच कर्मपथ असते त्याच फळ कर्मफळ असते आणि भाव असते चेतना मानस कर्म आहे आणि चेतनेद्वरे जे उत्पन्न होते ते चैतसिक कर्म होय याच कर्मामुळे जगात विविधता निर्माण होतात
४ विश्वातील सर्व घटना कारण शिवाय घडत नाही वैदिक धर्मात याला भाग्य किंवा भाग्यवाद म्हणतात बौद्ध धम्मात  याला भावाची शृंखला किंवा कार्यकारण भाव म्हणतात यात केवळ कर्माबद्दल च स्पष्टीकरण करण्यात  आले नसून एकीकडे आनंदमय आणि दुसरीकडे दुःखमय फळ का देतो हेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे याच कार्यकारण सिद्धांताची माहिती भिख्खू अश्वजीत कडून ऐकून सारीपुत्त  आणि मोदगल्यायन अतिशय प्रफुल्लीत आणि रोमांचित झाले
५ समस्त कर्माचा हेतू किंवा कारण असते सदाचरण शीलाचे पालन करून उत्पन्न झालेल्या कार्याला कुशल कर्म म्हटले जाते दुराचरण आणि शीलाच्या उल्लंघनाचे उत्पन्न होणार्या कार्याला अकुशल  कर्म म्हटले जाते जगातील कुणालाही कारणाशिवाय काहीच होत नाही ते तसेच होते जसे कि कारण त्यांना बनविते जगात आढळून येणारी असमानता विचित्रता वैगरे लोक वैचीत्रताचे सर्व कर्मामुळे असते
६ बौद्ध धाम्मानुसार असमानतेचे कारण कर्म आहे दुसर्याशब्दात आम्ही म्हणू शकतो कि भूतकाळात आपल्याकडून केल्या गेलेल्या कर्माचे फळ वर्तमान काळात प्राप्त करतो आपण आपल्या सुख किंवा दुःखासाठी स्वतःच उत्तरदायी आहोत आपण आपला नरक स्वतःच बनवतो आपण चांगल्या किंवा वाईट कर्माचे स्वतः निर्माते आहोत
५ आधुनिक युगात स्वर्गलोक आणि नरकलोक याचा अर्थ
१ वैदिक धर्मग्रंथ यात स्वर्ग आणि नरक या कलपनिक गोष्टींचे वर्णन आहे हे वर्णन साडेतीन हजार वर्षापूर्वी भारतात आल्यावर इराणी आर्यांनी लिहून  ठेवले आहे स्वर्गलोक आणि नरकलोक हि  पूर्वीची पर्शिया देशातील राजांची राज्ये होती त्यांचीच आधुनिक नवे म्हणजे इराण इराक जीप्त तुर्कस्थान वैगरे आहेत { यासाठी पहा पर्शियाचा इतिहास भाग १ आणि  कितने खरे हमारे आदर्श }
२ यमलोकात व नरकलोकात जाण्याचा मार्ग वाळवंटातून असल्याचे वर्णन आहे स्वर्गलोक व नरकलोक आणि यमलोक जर आकाशात असते तर ते आधुनिक युगातील वाहनांना दिसले असते बरे आकाशात जाताना वाळवंटातून जावे लगणार नाही आकाशात वळवंत कोणते येणार ? म्हणजे भागवतातील वाळवंटी मार्ग हा इराणकडे  जाणारा होता हे लक्षात येते  लोकांना मूर्ख बनवण्यासाठी हे खोटे लिहिले होते हे मान्य करावे लागते त्यासाठी वाळवंटी मार्ग हा सत्याचा पुरावा आहे स्वर्ग नरकाच्या नादी लागून बहुजनांनी ब्राह्मण पुरोहित वर्गाकडून यज्ञ पूजा अर्चा दानधर्म अश्या गोष्टी मोक्षप्राप्तीसाठी करीत राहावी यामुळे ब्राह्मण पुरोहित यांचा  फायदाच  फायदाच आणि बहुजनांचे आर्थिक नुकसान सतत होत राहावे व त्यांनी कफल्लक बनावे हा विदेशी  आर्यांचा कुटील डाव लक्षात घेणे आवश्यक आहे
३ यातून मार्ग काढायचा आपण नरक लोकच अर्थ असा करायचा कि नरक लोक या विश्वात  असा आकाशात नाही स्वर्ग आणि नरक या चे निर्माते आपणच आहोत जेव्हा कोणी व्यक्ती विपरीत परिस्थितीमुळे  उत्पन्न होवून दुःखमय  जीवन व्यतीत करीत असेल किंवा अविद्येमुळे त्याला चांगल्या वाईट कर्माचे  ज्ञान होत नाही आणि  तो वाईट कर्मे करण्यात मग्न होतो आणि दुर्दशेला जातो तर तशा स्थितीला नरक समजावे
४ दुसरी बाजू अशी कि कोणीव्यक्ती अनुकूल परिस्थितीमध्ये उत्पन्न होवून सुखाने भरलेल्या जीवनाचा आनंद घेतो किंवा जेव्हा त्याला प्रज्ञा प्राप्त होते म्हणजेच सम्यक दृष्टी प्राप्त होते तेव्हा तो सदाचाराने वागतो शीलाचा आस्वाद घेतो तेव्हा कुशल कर्म करतो ज्यामुळे त्याला स्वतःला सुख प्राप्त होते आणि जो कोणी त्याच्या संपर्कात येतो त्यालाही ती व्यक्ती चांगले मार्गदर्शन करून सुखी बनविते  आणि अश्या स्थितीला स्वर्ग समजायचा हि बुद्धाची शिकवण होती बुद्धाचा स्वर्ग हा काही कोठे आकाशात किंवा कोठे पाताळात नाही तो माणसाच्या चांगल्या परिस्थितीला म्हटले आहे तरीही स्वर्ग हि कल्पना बौद्ध धम्मात मनात नाही स्वर्गाची जी कल्पना वैदिक लोकांनी मंडळी होती ती म्हणजे जिथे सुखाचा भाग ते स्वर्ग असा त्याचा अर्थ आहे
५ प्रतिकूल परिस्थतीत जन्म घेवूनही आपल्या साहसावर व कर्तुत्वावर विश्वास ठेवून आणि नीतीपूर्ण आचरण ठेवून बुद्धिमान मनुष्य अनुकूल परिस्थती निर्माण करू  शकतो त्याचप्रमाणे अनुकूल परिस्थितीत जन्म घेवूनही अनितीपूर्ण  आचरण करून मनुष्य अधोगतीस जावू  शकतो पण बौद्ध धम्मात मतानुसार मनुष्य दैव नशीब वैगरे च्या आधारावर नसतो  जर माणसाचे भाग्य देव नशीब वैगरे ईश्वराने निश्चित केले असते तर मानवाला ते कशानेही बदलत आले नसते असा अर्थ आहे तर मग ईश्वरावर विश्वास ठेवणारे लोक ईश्वराच्या मंदिरात जावून पूजा अर्चा का करतात ईश्वराने त्यांच्या कपाळावर लिहिलेले असेल तेच भोगावे लागणार ना पण भगवान बुद्ध म्हणतात कि मनुष्य आपले दृष्ट कर्म शुद्ध आचरणाने शीलाचा अंगीकार करून बदलवून टाकतो जसे डाकू अंगुलीमाल तथागताला शरण आला आणि अर्हत पदाला  पोहचला
६ भगवान बुद्ध म्हणतात कि शीलाच्या आणि शुद्ध आचरणाच्या मार्गाने मनुष्य  आपले भविष्याचा निर्माता बनू शकतो किंवा अशुद्ध आचरणाने मनुष्य आपल्याकरीत नरक म्हणजे दुःखमय जग निर्माण करू शकतो यातनामय जीवन हा या ठिकाणी नरक शब्दाची व्याप्ती बौद्ध धम्मात आहे हेच विचार आणि कार्य कर्म नावाच्या संज्ञा  बनतात या जगात आपल्या विचारण  काळात एक जीवनातून दुसर्या जीवनात आपण श्रेष्टता किंवा हीनता प्रदान करतो
७ जेव्हा  काही विपरीत होते तर संकट अपयश किंवा वाईट वेळेचा सामना करावा लागतो अश्या  स्थितीत एक प्रज्ञावान बौद्ध हेच समजतो कि तो कपात आहे जे त्याने पेरले आहे परंतु जेव्हा तो स्वतःला भाग्याच्या भरवश्यावर सोडण्यापेक्षा तो करुनरुपि मुलांना उपटून फेकण्यासाठी कठोर प्रयत्न करतो आणि त्याऐवजी शील आचरणाचे बीज पेरतो तेव्हा भविष्य त्याच्या हातात असते
६}कर्म आणि त्याचा परिणाम
१ मनाने  वाणीने आणि कायेने स्वतः इच्छेनुसार केले गेलेले कार्य हेच कर्म आहे मग कुशल असो व अकुशल असो जर ती कार्ये नकळत केलेली असतील तर  कार्ये  कर्माच्या अंतर्गत येत नाहीत परंतु त्याचे फळ कर्त्याला भोगावेच लागणार जरी त्याचा प्रभाव नगण्य असला तरी सर्व कर्माचे प्रधान चित्त आहे चित्त हेच आपली वाणी व कार्याला स्वरूप प्रदान करते
२ जेव्हा चित्त असंतुलित असते वाणी असंतुलित असते आणि शारीरिक क्रिया असंतुलितअसते तेव्हा आपले विचार हि असंतुलित असतात पण जेव्हा आपले चित्त संतुलित वाणी संतुलित असते आणि  शारीरिक क्रिया संतुलित असते तेव्हा विचारही संतुलीतच असतात
३ कारण आणि त्याचा प्रभाव यांचा नियम हाच कर्मसिद्धांत आहे कर्म क्रिया आहे त्याचा विपाक हेच त्याची प्रतिक्रिया आहे जसे प्रत्येक प्रण्यासोबत त्याची सावली असते तसेच प्राण्याद्वारे केलेल्या कर्माचे सोबतच त्याचा परिणाम देखील असतो जमिनीत पेरलेल बीज कर्म आहे आणि त्या बीजापासून बनलेला वृक्ष चे फळ हा त्याचा परिणाम आहे
४ कर्म चांगले अथवा वाईट असेही असेल तसेच त्याचा विपाक असतो सयुंक्त निकाय प्रमाणे जसे बीज पेरले तसेच त्याचे फळ कापावे लागते जर मित्र चांगले  बीज पेरेल किंवा चांगले रोपटे लावले गेले तर त्याची चांगली फळे मिळतील प्राणीमात्रांना मिळणाऱ्या सुखाचे किंवा दुःखाचे हेच कारण आहे त्यात कोण्या चमत्कारीत शक्तीचा सबंध नसतो
५ भगवान बुद्धांनी म्हटले आहे कि पापकर्म आपणच करतो आणि माणूस अशुद्ध होतो म्हणून तो स्वताला पापकर्म करण्यापासून दूर ठेवू शकतो आपणही आपली शुद्धी कर्तु शकतो पाप किंवा पुण्य ह्या दोन्ही गोष्टी स्वतःवरच अवलंबून आहेत कोणी दुसरा शुद्र करून देत नाही
६ मुख्य कर्म तीन प्रकारची असतात १ तत्काळ फळ देणारे कर्म आणि २ कालांतराने फळ देणारे फळ ३ अनिश्चित काळाने फळ देणारे कर्म
तत्काळ फळ देणारे  कर्म
एक शिकारी शिकारीसाठी जंगलाकडे जात असताना विरुद्ध दिशेने येताना त्याला एक भिख्खू दिसला तो भिक्षेसाठी गावाकडे जात होता त्याला  त्या दिवशी शिकार्याला शिकार मिळाली नाही म्हणून तो रिकाम्या हाताने गावाकडे जात असताना तोच भिख्खू उलट येताना दिसला त्याने आपला राग भिक्खुवर काढण्यासाठी त्याला अपशब्दाने  बोलू लागला भिक्खुने आपण  निर्दोष आहे असे सांगूनही तो त्याला मारण्यासाठी त्याने कुत्रे भिक्षु च्या अंगावर सोडले भिक्षूला कोणताच उपाय   न दिसल्याने ते झाडावर चढले म्हणून तो  शिकारी देखील झाडावर चढला तो तिक्ष्ण बाणाने भिक्खु च्या पायाला टोचु  लागला त्यामुळे भिक्षु च्या शरीराची हालचाल  जलद  झाली आणि परिणाम असा झाला कि त्यांच्या अंगावरील भगवे वस्त्र हे शिकार्यावर पडले कुत्र्याला वाटले  भिक्षु च आहे म्हणून त्याने मालकाची चिरफाड करून टाकले त्यात त्या मालकाचा मृत्यू झाला याला त्याच्या कर्माचे फळ तत्काळ  मिळाले असे म्हणत  येईल
केलेले कर्म कोठे राहते : या संदर्भात पहिले असता सतत बदल होत असणाऱ्या शरीरात कर्म साठवून ठेवण्यासाठी कोठेच जागा नाही ते मनाच्या माध्यमातून  साठवले जाते  कारण मनुष्य हा नेहमी मनाच्या माध्यमातून चांगले वाईट कर्म कोणते हे जणू शकतो या वर नागसेन राजा मिलिंद ला उत्तर देताना सांगतात कि हे  राजन या अनित्य चेतेनेत किंवा शरीराच्या कोणत्याच भागात कर्माला ठेवण्यासाठी स्थान  नाही  परंतु चित्त आणि  चार महाभूत यांच्यावर निर्भर राहून वेळ येताच ती कर्मे दिसू लागतात जसे अम्रावृक्षाच्या आत काही आंबे नसतात परंतु आंब्याच्या वृक्षावर निर्भर राहून हंगाम येताच चेतनेने आंबे तयार होतात
कधी कधी मनुष्य असे काही पापकर्म करुन बसतो त्याचा परिणाम दुःख निर्माण होते तसेच काही लोक रस तृष्णेत लिप्त  राहतात आणि पापकर्म करून जातात  त्याचे फळ ते  हळू हळू भोगत असतात  पापकर्म आणि पुण्यकर्म याबाबत तथागत बुद्धांचा उपदेश पाहू या
पापकर्म काय आहे लोभ करणे हेच पापाचे मुल कारण आहे  त्यातून द्वेष आणि क्रोध निर्माण होतो हे पापाचे कारण ठरते तसेच यामुळे मिठ्यादृष्टी ठेवली जाते जे पापाचे कारण आहे त्यामुळे लोभ हा अधर्माकडे नेणारा आहे आणि जिथे अधर्म आहे तिथे पाप आहे आणि जिथे पाप आहे तिथे  दुःख आहे
आता पुण्यकर्म बाबत तथागत आपल्या भिक्षु संघाला सांगतात भिख्खुनो सदाचरण हे पुण्याचे मुल कारण आहे सदाचरण असल्यास मनुष्य लोभाच्या आहारी जात नाही म्हणजे  पुण्याचे मुल  कारण आहे लोभ नसणे द्वेष नसणे मोह नसणे त्याच प्रमाणे हे भिख्खुनो जो दुःखाला जाणतो तो दुःख समुद्याला जाणतो दुःख निवारण्याच्या मार्गाला जाणतो तो दुःख निरोधाकडे जाणाऱ्या मार्गाला जाणतो तो  या ज्ञानामुळे सांयक दृष्टी प्राप्त केलेला असतो भगवान बुद्धाने स्रावास्तीमध्ये अनाथपिंडक जेतवन इथे भिक्षुंना संबोधित हि  गाथा म्हटली आहे
, यस्स पावं  कतं कम्मं विधिय्यती
सो मं लोकं प्रभासेति अबभा मुत्तो व नद्रीमा ।। धम्मपद १७३
अर्थ : जो व्यक्ती केलेल्या पापकर्मिला पुण्याने झाकून टाकतो तो मेघापासून मोकळ्या झालेल्या चंद्राप्रमाणे या लोकाला प्रकाशित करतो
याचप्रमाणे पुण्याकर्माचा प्रकाश पापकर्माच्या अंधाराला आपल्या तेजाने नष्ट करतो आणि त्यावेळी त्याच्या जीवनात प्रकशाच  प्रकाश असतो याच परिस्थितीला आनंदाची स्थिती म्हणतात  यात आपल्याला उदाहरणे द्यायची झाली तर सम्राट अशोक आहे आम्रपाली आहे यांनी आपल्या पुर्व कर्माला आपल्या नवीन कर्माने नष्ट करून टाकले 
अश्या प्रकारे तथागत बुद्धाचा हा सिद्धांत मावळ आशादायी आहे बाकी हिंदू धर्मानुसार  यात पूर्वकर्म जर वाईट असेल तर ते वाईट  कर्म आपल्याला नष्ट करता  येत नाही किंवा त्या  व्यक्तीला त्या अवस्थेतून उठण्याची काहीच सोय नसते मात्र बुद्ध इथे हा  अधिकार्त देतात ते म्हणतात कि जो मनुष्य जर एखाद्या वाईट अवस्थेत आहेत त्याला त्या अवस्थेतून उठण्याचा पूर्ण  अधिकार आहे हाच फरक आहे हिंदू धर्म आणि बौद्ध  धम्मात 
एक उदाहरण आहे एका शीलवान भिक्षु ला गावकऱ्यांच्या सहाय्याने एका टेकडीवर राहण्यासाठी झोपडी बांधून  दिली गेली आणि काही  दिवसांनी एक साधू तिथे राहायला लोकांनी त्या साधूला भिक्षु कडे पाठवले तो साधू त्या  भिक्षु    कडे आल्यावर त्यांनी त्याला राहायला दिले पण हा साधू त्या भिक्षुवर जलु लागले व त्यातून त्याने ती झोपडी जाळून टाकले रात्री झोपताना थंडीने तो साधू कुडकुड करू लागला पण त्याची कंबल त्या झोपडीत जळाल्याने तो थंडीत राहिला त्यावेळी त्या भिक्षूने त्याला आपले चीवर दिले ते पाहून साधूला आपल्या कर्माची लाज वाटली त्याने पश्चाताप झाला त्याने स्वतःला दंड देण्यासाठी भिक्षु  ला विनवू लागला  तेव्हा त्या साधूला तो प्रज्ञावान भिखू म्हणाला धम्मबन्धु   या अनित्य आणि क्षण क्षण बदलणाऱ्या जगात आपले स्वताचे काय असू शकते त्या अग्नीच्या सोबत पश्चातापामुळे तुझ्या मनात निर्माण झालेली दुष्प्रवृत्ती जाळून  गेली  आपल्या  मधील चांगल्या कर्माने मनुष्य दुसर्या वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा बदल करू शकेल
आता सर्व कर्माचे मुल हे मन आहे  हे तथागत बुद्धाने सांगितले आहे मन हे मूळ  आहे असे सांगणारे तथागत बुद्ध हे जगातील पहिले मनोवैज्ञानिक आहेत
आता या  वरील सिद्धाता नुसार तथागत बुद्धाच्या धम्माला जे दैवतीकरण दिले जाते याचा नेमका अर्थ  कसा लावायचा हेच समाजाने शक्य नाही  आज बुद्ध  विकृत झालेला पाहून असे मनात येत कि काय बौद्ध धम्म दैव वादाकडे जातो का?
सर्व आपण विस्तृत पहिले आहे तरी हि बुद्ध धम्म दैववाद जवळ करतो आहे का हा महत्वाचा आजचा मुद्धा आहे वास्तविक पाहता बाबासाहेब यांचा बुद्ध जवळचा वाटतो हे नाकारता येत नाही बाबसाहेब यांनी बुद्धाचा पुनर्जन्म चा सिद्धांत काय आहे ते सांगितले आहे ते हि  पाहूया पुनर्जन्म नक्की कोणाचा होतो 
पुनर्जन्म कशाचा होतो

पुनर्जन्म कशाचा होतो जेव्हा कि पुनर्जन्म घडवून आणणारी आत्मा नावाची कोणतीही गोष्ट नाही अस्तित्वात असल्याचे सिद्ध होत नाही त्या अत्त्या आत्म्याचा पुनर्जन्म होतो हा ईश्वरवादी धर्माचा सिद्धांत मान्य करण्यासारखा नाही म्हणून भगवान बुद्धाने ईश्वर आत्मा परमात्मा या गोष्टी नाकारल्या आहेत म्हणून पुनर्जन्म कोणाचा आणि कशाचा होतो या दोन प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे लागते हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे म्हणून आपण प्रथम पुनर्जन्म कशाचा होतो यावर विचार करू
भगवान बुद्धाच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे चार घटक पदार्थ आहेत पृथ्वी जल तेज आणि वायू हे होत प्रश्न असा आहे कि मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या चार भौतिक घटकांचे काय होते मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय काही म्हणतात होय काही म्हणतात होय पण तथागत बुद्ध म्हणतात नाही ते घटक पदार्थ आकाशात तरंगणाऱ्या त्याच पदार्थाच्या समूहाला मिळतात तेव्हा विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली म्हणजे च्युतीचीत्त अंदाणु आणि शुक्राणू मिळाल्यावर नवा जन्म होतो
या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या घटक कुणीतरी एका विशिष्ट मृत शरीरातील आशु शकतील येथे एक गोष्ट लक्षात ठेवले पाहिजे कि शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक सदैव जगत असतात म्हणजेच चेतना जल उष्णता आणि विज्ञान या गोष्टी मृत शरीराला सोडून जातात मृत शरीरातील काया वाचा आणि मन यांच्या क्रिया थांबलेल्या असतात उष्णता म्हणजे उर्जा म्हणजेच शरीर उर्जा निर्माण करणे थांबवते
विज्ञान म्हणजे उर्जेचा कधीही नाश होत नाही मृत्युनंतर सर्व नाश पावते मागे काहीच उरत नाही हि विचारसरणी भौतिक शास्त्राच्या विरुद्ध आहे उर्जेचे सातत्य आहे अविनाशी आहे उर्जेसोबत विज्ञान असते
पुनर्जन्म कोणाचा होतो
या बाबतीत सर्वात बिकट प्रश्न आहे कि पुनर्जन्म कोणाचा होतो एकदा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो काय ? मृताच्या पुनर्जन्मावर बुद्धाचा विश्वास नव्हता मृत मनुष्याचे सर्व भौतिक घटक त्याच प्रमाणात तेवढ्याच संखेने एकत्र आले आणि त्यांनी नवा देह धारण केला तर त्याच मृत मनुष्याचा पुनर्जन्म झाला असे म्हणता येईल पण तेवढ्याच संखेने घटक पुन्हा एकत्र येणे हि दुर्मिळ गोष्ट आहे
जसा नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्यांच्या भिन्न भिन्न भौतिक अंशांच्या मिश्रणातून बनला असेल तर त्याला पुनर्जन्म म्हणता येत नाही आणि ते शक्य नाही परतू तो एकाच मनुष्याचा पुनर्जन्म आशु शकत नाही आणि आता हे भौतिक घटक फक्त मानवाचेच असू शकतील असे नाही जेवढे सजीव प्राणी असो वा वनस्पती त्यांच्यातही हे गुणधर्म असतात त्यामुळे मानवाचा पुनर्जन्म शक्य नाही बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात बाबासाहेब म्हणतात कि पित्याच्या शुक्राणू आईचे अंडानु यांच्या संयोगाने विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली कि एक नवा जन्मं होतो
पुनर्जन्म च्युतीचीत्ताचा होतो आत्मा वा मनुष्याचा नाही
च्युतीचीत्त म्हणजे decceased conciousness होय प्राण्याच्या मृत्युच्या वेळी शरीर एक सूक्ष्म कण बाहेर सोडते त्यालाच च्युतीचीत्त म्हणतात हे च्युतीचीत्त आस्त्रवाणी { ऋणात्मक चैतसिक स्थितीज उर्जा }युक्त असते आस्त्रावाचा अनुरूप हे च्युतीचीत्त जीव लोकात भ्रमण करून नवे शरीर धारण करण्याच्या स्थळी चैतसिक तरंगाच्या रुपात पोहचते तेथे नराचे शुक्राणू आणि मादीचे अंडानु यांच्याशी संपर्क करून नवीन रूप धारण करते
प्राणी शरीर शोडते वेळी सूक्ष्म कणाच्या रूपाने च्युतीचीत्त जे बाहेर पडते ते मृताच्या संचय केलेल्या कर्मविपाकाच्या परिणाम होय अंडानु आणि शुक्राणू च्या संयोगाने वेळी उपस्तीत असणारे च्युतीचीत्त तरंग रूप धारण करते त्याला गंधर्व चित्त म्हणतात हे गंधर्व चित्त जायगोटशी संपर्क केल्यावर निषेचन होते निषेचनाचेवेली संयोग करणाऱ्या गंधर्व चित्ताला संधी चित्त म्हणतात नवा जन्म देवून च्युतीचीत्त मरून जाते जशे बीजातून अंकुर बाहेर पडले कि बीज तसेच च्युतीचीत्तचे आहे
च्युतीचीत्ताच्या संयोगाने नवीन जन्म होतो तो च्युतीत्ताच्या पुनर्जन्म आहे मृत मनुष्याचा नाही नवीन येणाऱ्या बालकाचा तो जन्म आहे पुनर्जन्म नाही निषेचन हाच पुनर्जन्म आहे असे जगातील पहिले वैज्ञानिक भगवान बुद्ध म्हणतात यालाच भव म्हणतात भगवंताच्या ज्ञानाच्या वैज्ञानिक अनुसरण चित्त शुक्राणू अंडानु चा संयोग मिलन एकात्मता संयोजन यालाच निषेचन म्हटले जाते न कि अंडानु शुक्राणूच्या संयोगाला प्रत्येक सजीवाचे चित्त हे दुसर्यापेक्षा वेगळे असते म्हणून हे मान्य करावेच लागते कि प्रत्येक चित्ताचा आधार जीन आहेत
जीन आपल्या काही कर्म फळाचे वाहक आहेत विशेष प्रकारचे जीन चित्तासोबत संयोग करतात जीन माणसाच्या बर्याच गुणांचा आधार आहेत परंतु अमिरी गरिबी आणि उच्च नीचतेचा आधार नाहीत म्हणून कर्म या गोष्ट्शी कोणताही सबंध ठेवत नाही काही बिमार्या मात्र माणसाच्या कर्मफलाच परिणाम असतात
या मध्ये आपण पहिले कि कसा  सजीवाचा पुनर्जन्म तथागत बुद्धाना मान्य होता हे पहिले आता कोण अजून काही म्हणतील वरील एकच सिद्धांत तथागत बुद्धालादैववादा पासून बाजूला करतो तो म्हणजे प्रतीत्य सामुत्पद सिद्धांत जगात बुद्धाच्या अनेक सिद्धांत आहेत त्यातील आपण ठराविक घेतले एकच सिद्धांत  बाकीच्या सर्व सिद्धांताचे मूळ  आहे म्हणून तथागत बुद्धाच्या या धम्माचे विकृतीकरण  थांबवले पाहिजे  बाबासाहेब यांचा हाच हेतू होता कि कैसे हि करून धम्म तरला पाहिजे  भारतातून बौद्ध धम्म हद्दपार झाल त्याचे कारण धम्मात आलेली दैव वादी कल्पना जिने बुद्धाला विकृत केल इतर देशांनी जरी स्वीकारला तरी बुद्धाचा मार्ग नाही बदलत आला त्यांनी अनेक पर्यंत  केलेपण त्रिशरण नाही बदलू शकले पंचशीला नाही बदलू शाळे  पारमिता नाही बदलू शकले बुद्धाचा बुद्ध होण्याचा मार्ग  नाही बदलू शकले कारण ते शास्वत सत्य आहे जे इतरांच्या बदलाने बदलत नसते बाकीचे बदलले कारण त्यांचे सत्य नव्हते कारण जे बुद्धाने सांगितले ते आज प्रकृतीच्या सहाय्याने दिसत आहे आज विज्ञान सुद्धा सांगत आहे  काही महाभाग म्हतैल कि विज्ञान कधी निर्माण झाले आहे जे बुद्धाचा सत्य सांगू शकतील पनं ते महाभाग बाबासाहेब यांच्या इतके ज्ञानी नाहीत हे समजावून घ्यावे जगात बुद्धानंतर ज्ञानी मनुष्य म्हणून बाबासाहेब आहेत नाही येशु आहे ना पैगंबर इथे बाबासाहेब आहेत म्हणून बाबासाहेब यांचा धम्म दिला तो बुद्धाचा धम्म लोकांनी हि स्वीकारला पाहिजे आज  बुद्ध धम्म दैववादाकडे झुकतो आहे का याचे सर्वाना चांगले प्रकारे समजले असेल कारण ज्यांना समजले नसेल त्यांनी फक्त बुद्धाचा प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत जाणून घ्या लवकर 
मध्यम मार्ग :
                      सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धाने सारनाथ येथे आपल्या नाविन्यपूर्ण धम्माचा प्रथम उपदेश करून जगाला बहुजन हिताय बहुजन सुखाय धम्माचे चक्र घुमवले त्यांचे ते भाषण धम्मचक्कप्पवत्तन सुत्त नावने प्रसिद्ध आहे . त्यामुळे हे सुत्त म्हणजे भगवान बुद्धाच्या जाहीरनामा होय धम्मचक्कप्पवत्तन सुत्त म्हणजे नेमक़्के की हे आपण जाणून घेवूया भगवान बुद्ध वाराणसीच्या ऋशिपतनात हरणांच्या बागेत विहार करत असताना ते आपल्या पंचवर्गीय भिक्खुणा उद्देशून ते म्हणाले भिक्खुनो प्रव्रज्जीताने या दोनटोकाने जावू नये १ विषय सुखात लोळत राहणे हा असून तो हीन नीच लोकांच्या लायकीचा अनर्थक आहे २देह दंडण करणे तो दुख्खादायक आणि अनर्थकारक आहे त मित्रानो या दोन्ही टोकांच्या स्वकाराबाबत एक वेगळा मार्ग शोधला त्याला मध्यम मार्ग असे म्हणतात

तथागताने जो मध्यम मार्ग शोधला त्या मध्ये तो मार्ग जो दृष्ठीदायक व ज्ञानदायक असून उपशमाला शांततेला दिव्याज्ञानाला सम्बोधाला आणि निर्वाणाला पोहोचविणारा आहे यालाच परम अष्टांगिक मार्ग होय १ सम्यक दृष्टी २ सम्यक संकल्प ३ सम्यक वाचा ४ सम्यक कर्मान्त ५ सम्यक आजीविका ६ सम्यक व्यायाम ७ सम्यक स्मृती ८ सम्यक समाधी यामध्ये मानवाला निर्वाण प्राप्त करण्यासाठी या मार्गाचा अवलंब करावा लागतो तथागत बुद्धाने यापुढे जावून चार परम सत्ये सांगितली आहेत ती अशी

१ दु:ख परम सत्य : तथागत आपल्या शिष्यांना सांगतात कि भिक्खुनो या जगात दु:ख आहे हे परमसत्य आहे वृद्धत्व दु:खकारक आहे रोग दु:खकारक आहे मृत्यू दु:खकारक आहे थोडक्यात पाच उपादान स्कंधच दु:खकारक आहेत

२ दु:ख समुदय परमसत्य : भिक्खुनो दु:ख समुदय हे परम सत्य आहे पुन्हा पुन्हा जन्म घेणारी तृष्णा हि मोहयुक्त असते जी नेहमी सुखाच्या शोधत असते काम तृष्णा भवतृष्णा विभव तृष्णा

३ दु:ख निरोध परमसत्य: भिक्खुनो दु:ख निरोध हे परम सत्य आहे जेत्या तृष्णेच्या परम वैराग्याने निरोध त्याग प्रती निसर्ग मुक्ती आणि अनासक्ती आहे

४ दु:ख निरोधगामिनी मार्ग परमसत्य : भिक्खुनो आर्य अस्थांगिक मार्ग हाच दु:खाचे निरोधागामिनी मार्ग आहे

भगवान बुद्धाचा प्रतीत्य समुत्पाद हा सिद्धांत केंद्रबिंदू आहे कोणतीही गोष्ट कारणाशिवाय अस्तित्वात येत नाही कारणाशिवाय अन्य कुणी हि काल्पनिक शक्ती आपल्या तेजाने किंवा चमत्काराने काहीही निर्माण करू शकत नाही काल्पनिक शक्तीचा बागुलबुवा विशिष्ट वर्गाने स्वतःच्या स्वार्थासाठी निर्माण केला जादुगार काही गोष्टी जादूने निर्माण केल्याचा भास निर्माण करतात त्यात ते तीन गोष्टींचा उपयोग करतात हातचलाखी आणि रासायनिक पदार्थाचा उपयोग करूनच प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले जात जगात जादू नाही हे स्वतः जादूगाराला माहित असते आणि त्याला ते मान्य हि असते जादूगाराच्या बडबडी पेक्षा त्याच्या हाताकडे लक्ष दिले तर त्याचे पितळ उघडे करता येते

भगवान बुद्धाने ईश्वर आत्मा परमात्मा या गोष्टी स्पष्टपणे नाकारल्या आहेत म्हणूनच त्यांच्या सिद्धांतामधून प्रतीत्य समुत्पाद म्हणजे कार्यकारण भाव सिद्धांत हे तत्व स्पष्ट तत्व सिद्ध होते कि कोणतेही गोष्ट कारणाशिवाय निर्माण होवू शकत नाही ज्या ज्या कारणांचा प्रभाव कार्याच्या रूपाने संपूर्ण ब्रह्मांडावर आणि जीवसृष्टीवर पडतो त्याचे कारण आत्मा किंवा ईश्वर नाही तर निसर्गनियम आहेत

म्हणूनच बुद्ध म्हणतात कि मनुष्यप्राणी जी कोणती कार्ये करतो ती मनाच्या द्वारे करतो सर्व कर्माचे मुल हे मन आहे मन हे स्वामी आहे मन हेच कारण आहेमनात दृष्ट विचार असतील तर माणसाचे विचार हे दृष्ट असतात ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याचप्रमाणे वाईट कर्मामुळे निर्माण झालेली दुःखे माणसाचा पाठपुरावा करीत असतात मन हे सर्व कर्माचे मुल आहे तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडवून आणते मनात सदविचार असतील माणसाचे शब्द आणि कार्य दोन्ही चांगले असतात सदाचाराच्या आचरणाने उदभवणारे सुख मनुष्याच्या सावलीप्रमाणे सदोदित त्याच्या पाठीमागे जातात

मन घडविते तसा मनुष्य बनतो सत्याचा शोध करण्यासाठी मनच सांगत असतो हा संस्कार पुण्यामार्गातील पहिले पाऊल होय बौद्ध जीवनामार्गाचीहि मुख्य शिकवण आहे मन हे ओढाळ चंचल दुर्निवार आणि दुर्धर आहे बाण बनविणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान माणूस मनाला एकाग्र आणि सरळ करतो पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफडते त्याचप्रमाणे माराच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकूळ असते ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे जे फार चंचल आहे जे सदैव सुखासाठी वखवखलेले असते अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे कारण दमन केलेले मन फार सुखकारक असते पापापासून दूर राहा पुण्य करीत राहा स्वतःचे विचार शुद्ध करीत रहा हि भगवान बुद्धाची शिकवण आहे

मध्यम मार्गाचा अवलंब मनावरच अवलंबून आहे

१] भगवन्न बुद्धाचा मध्यम मार्ग हा ऐकायला सोपा वाटतो मात्र हा सोपा वाटणारा मध्यम मार्ग स्वीकारला तर सर्वच बाबतीत मनुष्य सुखी होवू शकतो हे सर्व सुख मनावरच आधारभूत आहे

२] वाल्मिकी रामायणात वानरराज वालीच्या मुखातून भगवान बुद्धाचा मध्यम मार्ग सांगितलेला आहे रामाने झाडाआड लपून मारलेल्या बनणे घायाळ होवून बहुजन राजा वानरराज वाली धरणीवर शेवटची घटका मोजीत असताना त्यावेळी त्याचे आप्तजन गोल झाले त्याचा तरुण पुत्र अंगद हि त्याच्याजवळ येवून बसला व शोक करू लागला तेव्हा वाली त्याला समजावताना वा रामायण श्लोक ४-२२-२३ मध्ये म्हणतो कोणालाही सोबत अतिशय प्रेम करू नकोस आणि प्रेमाचा पूर्णपणे अभावदेखील होवू देवू नकोस कारण हे दोन्ही महान दोष आहेत म्हणून सदैव मध्यम स्थितीवर दृष्टीठेव पहा श्लोक

'' न चातीप्रणय: कार्यः कर्तव्योप्रनयश्च ते ।

उभयं हि महादोषं तस्मादंतरदुग भव '' ।। वा रा ४-२२-२३

३] दुखाचे मुल कारण तृष्णा आहे म्हणून मध्यम मार्गाचा उपदेश करताना भगवान बुद्ध म्हणतात अतिशय प्रेम करणे हे देखील दुःखाच्या कारणांपैकी एक महत्वाचे कारण आहे ते म्हणत कि आपण ज्याच्यावर अतिशय प्रेम करतो त्याचाजर अकस्मात मृत्यू झाला तर किंवा त्याचे काही बरेवाईट झाले तर आपल्याला दुःख होते म्हणून आपल्या अतिशय प्रिय व्यक्तीवर प्रेम अतिशय जास्त करू नये किंवा अतिशय कमी हि करू नये कारण या दोन्ही गोष्टी महादोष आहे प्रेम जास्त किंवा कमी केरु नये पण त्या व्यक्तीच्या प्रती आपले कर्तव्य पूर्णपणे पारपडले पाहिजे

भगवान बुद्ध स्वतः कोणावर प्रेम करीत नव्हते पण पण ते सर्वावर करुन दृष्टी ठेवीत असत

४]भगवान बुद्ध २४ - २४ तास समाधी लावून बसत असत म्हणून कुणी शिष्य त्यांना विचारीत असे कि भन्ते आम्ही ४-५ तास समाधी लावली तरी आमची कंबर दुखायला लागते पण आपण २४ तास समाधी लावून बसता तरी आपली कंबर का दुखत नाही यावर तथागत म्हणतात

५] माणसाचे शरीर हे खूप साऱ्या धातूंचे बनलेले असते म्हणून माणसाचे शरीर धर्म कसे असतील याचा निर्णय त्याच्या शरीरातील धातू करतात शरीर पातळ कि लठ्ठ आळशी कि स्पुर्तीदायक विद्वान कि कमी विद्वान चंचल कि कमी चंचल या सर्व गोष्टी शरीराला मिळणाऱ्या धातूवर अवलंबून असते

६] भगवान बुद्धाने शरीराची रचना पुष्कळशा धातूपासून बनली असल्याचे सांगितले त्यांनी शरीराच्या स्वभावावर धातूंचा प्रभाव असल्याचे सांगितले आणि त्यावेळचे तथागातांचे धातूविषयक असणारे विचार हे आज विज्ञान मान्य करत आहे

७] वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध झाले आहे कि शरीर निरनिराळ्या तत्वांचे बनलेले आहे यात कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन नाइट्रोजन लोह कल्शियम फॉस्फोरस हे मुख्य आहेत तथागताच्या संशोधनाप्रमाणे विज्ञान देखील शोध केला आहे कि वरील तत्व आवश्यक मात्रेत शरीरात पोहचले पाहिजे या तत्वांची कमी किंवा अधिकता निश्चितपणे शरीराला प्रभावित करते विज्ञानाची हि मान्यता बुद्धाने मध्यम मार्गातून अगोदर सांगितली आहे

८] विज्ञानाने म्हटले आहे कि कोणत्या तत्वाच्या कमतरतेमुळे शरीरात कोणकोणते रोग होवू शकतात आणि त्या धातूंची शरीरातील कमतरता दूर केली तर कोणते रोग बरे केले जातात आणि कोण्या धातूंची मात्रा वाढली तर कोणते रोग होतात आणि त्यासाठी विज्ञान माणसाला संतुलित आहार घ्यायला सांगते विज्ञानाचा हा साल बुद्धाने अडीच हजार वर्षापूवी मध्यम मार्गातून मानवाला दिला आहे

कमी किंवा अधिकच वापर शरीराच्या आवश्यकतेप्रमाणे करावा

भगवान बुद्धाने जीवन सुखी करण्यासाठी मध्यम मार्ग सांगितला आहे कमी किंवा जास्त या दोन्ही गोष्टीचा अतिरेकि आहे म्हणून दोन्ही गोष्टीच्या अतिरेकापासून स्वतःचा बचाव केला पाहिजे जसे एखादे तंतू वाड्याचे तार कमी जास्त अधिक आवरल्यास त्यातून गोड आवाज निघणार नाही शरीराचे किंवा जीवनाचे हि असेच आहे कोणाला जेवणात कोणता पदार्थ जास्त आवडतो तर कोणाला आवडत नाही पण त्या आवडलेल्या पदार्थात योग्य तत्व आहेच असे नाही आणि काही जास्त प्रमाणात तत्वे असतील तर त्याचा परिणाम वेगळा होतो

बौद्ध धम्म हि जगातील सर्वप्रथम नैतिक विचार पद्धती आहे जिच्यात मानवास अत्मानियमन करण्याची शिकवण देते ह्यासाठी प्रगतीशील जगाला हि सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धम्माची आवश्यकता आहे


एवढे मांडण्याची गरज यासाठी कि  काही लोक विसंगती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे एवढा मोठा लेख प्रपंच करावा लागला आहे  


हा थोडक्यात केलेले विश्लेषण आहे सविस्तर लिहण्यास गेल्यावर मोठं साहित्य निर्माण होईल यावर त्यामुळे सामान्य लोकांना कळावे यासाठी हि माहिती 


आता बुद्ध चमत्कारी कसा केला हे माझ्या ब्लॉग मध्ये लिहलेले आहे तरी लिंक त्याची मी देत आहे 

https://yugpravartak.blogspot.in/2014/12/blog-post.html


सत्याला सत्य म्हणून स्वीकारणे आवश्यक असते म्हणून खोटे बोलणाऱ्या  गैरसमज परसावणाऱ्या लोकांची मते वाचलायवर त्यावर चिकीत्सा करा व  सत्य स्वीकारा 



रविद्र मीनाक्षी मनोहर


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

बळीराजा : एक काल्पनिक पात्र