पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिथे बुद्ध हसतो तिथेच समाज वसतो

   पहाटेचा सूर्य माथ्यावर आला  होता.  अंगातून घामाच्या धारा  वाहू लागल्या होत्या क्षणभर विश्रांतीची गरज भासत असताना कंठ तहानेने व्याकुळ झाला होता. अश्यावेळी कुठे तरी निवारा शोधण्याची डोळ्यांची तळमळ चालू होती . क्षणात असे काही वाटू लागले कि आता जीवनाची यात्रा इथेच संपते कि काय ?  आणि अचानक डोळ्यासमोर  मंद झुळझुळ वाहणारा झरा नजरेस पडतो. आणि जीवाला हायसे वाटते . थंड गार पाण्याचे चार घोट घश्याखाली जाताच पोटामध्ये शांत  वाटू लागते. थंडगार पाणी तोंडावर शिडकुन आलेला क्षीण दूर करण्यास प्रयत्न करतो. पुन्हा ताजेतवाने होऊन क्षणभर विश्रांती करण्याचा बेत करतो.  निसर्गाच्या या कुशीत शांत दगडावर झाडाच्या सावलीखाली निपचित पडल्यागत झोप लागते.   आणि जीवनातील सर्वोच्च सुखाला गवसणी घातल्याचे सुख मिळते.   पुन्हा सायंकाळचा सूर्य अस्ताला निघालेला जाणवतो . आणि मग पावले नकळत गावाकडे वळू लागतात. थोडा थोडा अंधार पडू लागतो गावात येऊन थबकलेली पाऊले आता रात्रीचा निवारा शोधू लागतात. मंदिर मस्जिद विहारे सारी काही पाहतो घरे देखील पाहतो. पण माणसांच्या घरात आजची वस्ती होईल कि नाही लोक आपणाला   स्वीकारतील कि नाही या श

महार आणि मराठा...................

मानववंश शास्त्रज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर मानववंश शास्त्राचा वापर करीत म्हणतात महार आणि मराठे दोन भिन्न नसून एकच आहेत  त्यासाठी ते महार आणि मराठा यांच्या ज्ञातीची कुळे सारखीच असल्याचे सांगतात महार आणि मराठे यांच्या कुळात असणारे साम्य म्हणजे दोघांमध्ये सारखीच कुळे आहेत दोघांचे टोटेम देखील सारखेच आहे. आणि असे फक्त त्याच लोकांमध्ये असू शकते जे भिन्न नसून एकच कुळातील असणारे असू शकतात आणि बाबासाहेब म्हणतात कि  हे भाऊबंद  आहेत तरच ते एका वंशाचे सिद्ध होतात {द अनटॅचेबल १९४८ पेज ६४} यावरून निष्कर्ष काढता कसा येईल यासाठी पाहावे लागते मराठा समाजचे पूर्वीचे नाव काय होते ते यासाठी इसवी सणाच्या आधी आधी जावे लागते बुद्ध काळात या भूमीला गणसंघाचा दर्जा असल्याचे दिसते अंगुत्तर निकाय मध्ये रठ्ठीक शब्दाचा वापर हा गणराज्य प्रणालीतील राजाच्या पदांनंतर चा दर्जा असणारे पद मानले जाते यावरून रठ्ठीक रास्टिक राष्ट्रिक हे लोकांचे नाव नव्हते शिaaवाय अशोकाच्या काळात महारठ्ठ देश अस्तित्वात असल्याचा उल्लेख सापडतो त्यावेळी महारठ्ठ हे गणसंघ राज्य होते आणि रठ्ठीक पेत्तनिक व भोज यांचा उल्लेख अशोकाच्या अभिलेखात आलेलाआहे या

चळवळीच्या लाटेवर स्वार होताना ..........

इमेज
चळवळीत काम करणाऱ्याने प्रेम करू नये का? त्याची हि एक गर्लफेंड नसावी काय ? त्याला व्यतिगत आयुष्य नसते काय ? त्याची स्वतःचा काही छंद नसतो काय ? त्याला आयुष्यात काय खावे काय नाही याचे स्वातंत्र्य नसते काय ? त्याला आयुष्यात आनंद उपभोग घेण्याचा अधिकार नसतो काय ? असे असंख्य प्रश्न एका मित्राने विचारले मी म्हटले त्याला सारे त्याचे अधिकार आहे एक माणूस म्हणून त्याने ते जगावे इतके सारे हवे आहे तर चळवळीत कशाला जायचे कारण चळवळीत तुला यातले काहीच मिळणार नाही कारण बाबासाहेबांची चळवळ म्हणजे चैन करणे नव्हे मौजमस्ती करणे नव्हे आनंदच उपभोगायचा तर तुझ्यात आणि त्या जनावरात काय फरक आहे तो हि आनंद च उपभोगतो आहे रे मग तुला त्याचे जीवन चांगले वाटते का आयुष्यात प्रेम करा पण ते शरीरसुखासाठी नसावे रे कारण आजकाल प्रेम म्हणजे शरीराची आस इतकंच काय ते त्याच्यापुढे शरीरसुखाची गरज संपली कि प्रेमाची लक्तरे अशी वेशीवर टांगताना दिसतात मग या प्रेमाला काय अर्थ रे आता गर्लफ्रेंड असावी कि पण तिची गरज फक्त बेडपुरती नसावी मित्रा तिच्यासोबत आयुष्याची साथ देण्याची औकात असेल त

बलात्काराच्या देशा

आपला  भारत देश या देशात स्त्री  म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता असे केवळ बोलण्यापुरते का होईना पण म्हटले जाते  अश्या या  भारत देशात काय चालले आहे याची जाणीव आहे का जनतेला तेच कळेना झालाय  देशाच्या  नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने २०१४ व २०१५ ची आकडेवारी जाहीर   केली आहे आपण आधी आकडेवारी पाहू मग आपल्या महत्वाच्या विषयाकडे लक्ष देऊ या  २0१४ साली देशात ३७ हजार ४१३ बलात्कार झाले आणि  २0१५ साली बलात्काराची संख्या ३४ हजार ६५१ इतके बलात्कार या देशात झाले आहेत  कमालीची आकडेवारी आहे नाही का आपला भारत देश सर्व अभिमानाने मिरवतात  भारतात स्त्री देवीचा दर्जा देतो म्हणून आणि त्याच देवीची इज्जत सरेआम  निलाम करतो  एकीकडे नवरात्रीत नऊ दिवस  स्त्रीशक्ती म्हणून देवींचे भक्तिभावाने पूजन करणारे याचदिवसात देखील अनेक भूतलावरील देवींचे शील हरण करण्यात मश्गूल असतात  यावर्षी तर बातमीच अशी  होती नवरात्री दरम्यान कंडोम ची अधिक विक्री  आता क कंडोम कशासाठी वापरतात हे सांगण्याची आवश्यकता नाही पण हि मानसिकता बदलत का नाही वासनेच्या आहारी गेलाय का देश पुरा यंत्रणा कोलमडून पडली आहे सरकार ची कायद्याची भींती राहिलेली

मोर्चा म्हणजे एक पब्लिक इव्हेंट

जय भीम स्पष्ट बोलतो म्हणून वाईट वाटेल पण हरकत नाही पाठीमागून नाही सरळ बोलल्याचे शल्य जास्त राहत नसते आज मोर्चा म्हणजे एक पब्लिक इव्हेंट झाला आहे मला निघणारे मोर्चे यांची काही पार्श्वभूमी असायला पाहिजे पण तसे काहीच दिसत नाही मराठयांचे मूकमोर्चे निघाले व आज हि निघतच आहेत कोपर्डी च्या भूमिकेत बदल करून आरक्षणावर येऊन थांबले त्यांच्या मागण्यासाठी त्यांनी कोणतीही चर्चा करण्याची भूमिका न घेता केवळ मोर्चेच काढून जनरेठा दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा मागणीचा आणि मोर्चाचा सबधंच समजून येत नाही कारण ते हि इतकी वर्षे सत्तेत असताना त्यांना समाज का दिसला नाही हा सर्वात मोठा प्रश्न आता मराठ्यांचे सोडा आता आपण दलितांचे अर्थात बहुजनांचे मोर्चे निघत आहेत काय कारण सांगून संविधानच्या सन्मानार्थ बहुजन समाज रस्त्यावर उताराला आहे आधी काय सन्मान करायचे समजले नाही का तुम्हाला संविधानाचा सन्मान करण्याची आठवण आज बरी आली आणि यात सामील कोण निळे झेंडे घेऊन भगवे पिवळे हिरवे असे झेंडे घेऊन सामील संविधानाच्या सन्मानासाठी आम्ही रस्त्यावर आलोय मोर्चात कसले सन्मान ठेवता तुम्ही संविधानाप्रती ते तरी सां

आणि बुद्धच महार झाले .....................

जोहार मायबाप जोहार अशी हाक कानी आली कि दारासमोर म्हणे एक माणूस असायचा हातात नागफण्याची काठी घेऊन उभा असलेला राकट बांध्याचा माणूस गावाची महारकी करण्याचे काम करायचा गावाची मेलेली ढोर हा गडी एकटाच एका हाताने उचलून न्यायचा भले भले थकायचे पण हा एकटा ओढत नेत होता पण जगणे याचे जनावराला हि लाजवील असे होते हो गावकुसाबाहेर जीवन जगायचा व गावगाडा हाकीत बसायचा एका महसूर्याच्या जन्माने यांच्या जीवनाचे सोन झाले गावकुसातून गावात आला बंगला आला गाडी आली पण जात काय सुटली नाही भीमाने महाराची महारकी सोडली बुद्धाच्या ओटीत टाकून आज महार म्हणून स्वतः मिरवतात अश्या लोकांनी खास करून इकडे लक्ष द्या का दिला बुद्ध बाबासाहेबानी बुद्धच का दिला येशू हि देऊ शकले असते कि पैगंबर हि देऊ शकले असते गुरु साहेब पण देऊ शकले असते महावीर पण देऊ शकले असते पण तुम्हाला बुद्धच का दिला याकडे आम्ही कधी वळलो आहे का तुमच्या प्रगतीसाठी तुमच्या सन्मानासाठी तुमच्या स्वातंत्र्यासाठी स्वाभिमानासाठी मोकळा श्वास घेण्यासाठी जातीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी रूढी बंधने मोडून काढण्यासाठी दिला बुद्ध स्वातंत्र्य समता बंधुत

धम्मचक्र अनुवर्तन नव्हे धम्म चक्र प्रवर्तनच

१४ ऑक्टोबर १९५६ भारताच्याच नव्हे जगाच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण क्रांती जी  जगातील सर्वच क्रांती मोडून काढीत नवा इतिहास घडवला गेला बाबासाहेबांच्या या क्रांतीचे इतिहासात सुवर्ण अक्षरांनी  कोरला गेला हा इतिहास  रक्ताचा एक हि थेंब न सांडता केलेली धम्म क्रांती जगाच्या इतिहासात पहिलीच होती . धम्म स्वीकारला तेव्हा तारीख १४ ऑक्टोबर ची होती या दिवशी स्वीकारलेला धम्म भारताच्या इतिहासात बुद्ध धम्माल नवजीवन देणारे ठरले या भारतात बौद्ध लोक  असले तरी धम्म मात्र नामशेष होता हे मानावेच लागते महाबोधी विहार बुद्धाचे असून देखील बुद्धाचा धम्म नव्हता बुद्धाला या भारतात जिवंत  करून केलेली क्रांती हि बुद्धाच्या धम्म क्रांतीचेच रूप आहे  सारनाथ इथे बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन केले तर बाबासाहेब यांनी नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन केले  माझे हे म्हणणे थोडे धाडसाचे आहे कारण एकीकडे बुद्धाने हि धम्मचक्र प्रवर्तन केले आणि बाबासाहेब यांनी हि धम्म चक्र प्रवर्तन केले तर ते कसे काय केले  अनेक विद्वानांचे मत असते कि धम्मचक्र हे फक्त सम्यक संबुद्ध च प्रवर्तित करू शकतात   इतर सामान्य लोकांना ते शक्य नसते आणि हेच कारण आ