पोस्ट्स

जानेवारी १५, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ६

सम्यक व्यायाम : सम्यक व्यायाम म्हणजे बाह्य शरीराचा व्यायाम नाही . कसरत करून कमावलेली शरीयष्टी म्हणजे सम्यक व्यायाम नाही. सम्यक व्यायाम म्हणजे ज्ञानयुक्त प्रयत्न  अथवा अभ्यास करणे.  निर्वाण व सत्यप्राप्तीच्या कार्यात अथवा अभ्यास अत्यावधक मानून बुद्धाने उद्योग किंवा प्रयत्नपूर्वक अभ्यासाला अनन्य साधारण महत्व दिले आहे. मनात नको ते वाईट विचार येऊ न देणे आणि मनातील चांगले विचार बाहेर जाऊ न देणे ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. कारण अभ्यासाला काहीही अश्यक्य किंवा अलभ्य नाही .  ह्या गोष्टीचा संतांनी आपल्या उपदेशात व आपल्या साहित्यात उल्लेख केला पण तो मात्र भक्तीच्या मार्गासाठी वापरला पाहू या संतांचा याबाबत काय अर्थ आहे तो संत एक सारखे ईश्वराचा धावा करतात आणि आपल्या मनात ईश्वराशिवाय दुसरे विचार येऊ नयेत  ह्यासाठी करुणा भक्तात . ह्यासाठी  त्यांनी प्रयत्न किंवा अभ्यासाची महिती गायली आहे . आणि ह्याला बौद्ध धम्मात सम्यक प्रधान असे नाव आहे. न मिळो खाया न वाढो संतान । परी हा नारायण कृपा करो ।। विटंबो शरीर येता का विपत्ती । परी राहो चित्ती नारायण ।। क्षणक्षणा हाचि करावा विचार । त

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : 5

सम्यक अजिविका : यामध्ये योग्य आणि नीतीच्या मार्गाने अर्थोपार्जन करणे अपेक्षित आहे . संसारी माणसाला उदारनिर्वाहाकरिता जो व्यापार, व्यवसाय करावा लागतो तो नितीधर्मावर आधारित असावा . तो करताना इतरांची हानी करून स्वतःचा स्वार्थ साधने बुद्धाला अमान्य आहे. बुद्धाने खालील व्यवसायांना निषिद्ध ठरवले आहे. 1} शस्त्रांचा व्यापार 2}प्राण्यांचा व्यापार 3} मदयादींचा व्यापार4} मांसविक्री5} विषाचा व्यापार याखेरीज लक्खन सुत्तात दांडी मारणे, माप कमी करणे, लाच देणे, फसवणूक करणे, कपट करणे , मानसिक त्रास देणे, वध करणे , डाका टाकणे, लूटमार करणे हे अयोग्य आहेत बुद्धाने चुकीच्या मार्गाने पैसे कमावू नये असाच संदेश दिला आहे तुमचे जीवन हे चांगले आचरण असणारे असावे सम्यक आजीविका चा मराठी संतांवर असणारा प्रभाव पाहू या वैयक्तिक व सामाजिक जीवनाच्या शुद्धीसाठी ह्याची गरज आहे . मिथ्या आजीविकेचा त्याग करून सम्यक मार्गाने उदरनिर्वाह करणे म्हणजे सम्यक आजीविका होय. यात धर्मानुसार प्रामाणिकपणे श्रम करून धनार्जन करणे अभिप्रेत आहे. केवळ घाम गाळून द्रव्योपार्जन करताना नितीबाह्य मार्गाचा अवलंब न करणे हे कटाक्ष पूर्वक सांगितले आ

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

सम्यक कर्म : सम्यक कर्म बुद्धाचा कर्म सिद्धांत आणि हिंदू वा अन्य धर्माचा कर्म सिद्धांत हे वेगळे वेगळे आहेत  तरी हि बुद्धाने सम्यक कर्म सांगताना माणसाच्या आचरणात सदाचार आणि पावित्र्य असावे असा अभिप्राय आहे . हिंसा त्याग , दंड व शस्त्रप्रयोग  त्याग , प्राण्यांवरील दया , हेच सम्यक कर्म आहे . मनुष्य जीवनाच्या पावित्र्यासाठी आवश्यक असलेल्या पंचशीलाचाही यात समावेश होतो. कुशल अकुशल कर्माचे फळ भोगावे लागते म्हणून अशुभ त्यागून शुभ कर्मे केली पाहिजेत . त्यासाठी अहिंसा,अचौर्य,सत्य  मद्यत्याग  करावे . हि अपेक्षा असते . भिक्षु ना अकाल भोजन,सुवर्णधन ग्रहण निषिद्ध आहे . त्यांना दहा शिलांचे पालन करावे लागते . या अष्टांग मार्गाचा अनुभव घेणारा साधक सर्वज्ञ आनंद अनुभवत असतो . सर्व जगच त्याला निवास्थान वाटू लागते .   बुद्धाच्या सम्यक कर्माचा प्रभाव मराठी संतांवर पडलेला प्रभाव पाहताना आपण ज्ञानदेव  म्हणतात . हे विश्वाची माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपण जाला ।। १२-२११ पुढे जाऊन संत तुकाराम म्हणतात ' पाप पुण्य ,सुख दुःख , हानीलाभ आणि शंकाचा नाश  झाला असून आप परभाव नष्ट झाल्यामुळ

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग :३

 सम्यक वाणी : बुद्धाच्या अष्टांग मार्गातील हा तिसरा मार्ग आहे . ह्यात योग्य आणि सत्याधिष्टित धर्मानुकूल वचनांचे उच्चारण आणि असत्य व धर्मबाह्य वचनांचा त्याग अभिप्रेत आहे . यामध्ये कुणालाही विनाकारण दुखावणाऱ्या कठोर वचनांचा व चुगलखोरांचा यात निषेध केला असून उच्चारलेल्या विवेकपूर्ण सत्यवचनांचे प्रत्यक्षात आचरण अतिशय महत्वाचे मानले गेले आहे. यामध्ये शब्दामध्ये गोडवा असावा सत्याची धार असावी असे बुद्धाचे सांगणे आहे वाणीत समोरच्या व्यक्तीचे हृदयपरिवर्तन करण्याची क्षमता निर्माण व्हायला हवी.  अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर सम्यक वाणी म्हणजे चांगले शब्द उच्चारावे सत्य बोलावे विनाकारण कुणास हि वाईट बोलू नये.  तर अश्या प्रकारे सम्यक वाणी बाबत आपण पाहिले  पण आता याचा संतांवर प्रभाव कसा पडलाय ते हि पाहू या . तुकाराम महाराज म्हणतात , राग लोभाची पर्वा न करता सत्य सांगावे तुका म्हणे सत्य सांगे । येवोत रागे येतील ते ।। एवढेच काय परोपकार प्रसंगी हि असत्य बोलू नये  असा त्यांचा कटाक्ष आहे असत्य वाचन होता सर्व मोडी । जरी लग्नघडी परउपकार ।। जाईल पतना यासि संदेह नाही । साक्ष आहे काही सांगती ते ।।  १०२

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतावर प्रभाव भाग : २

सम्यक संकल्प : योग्य निर्णय किंवा निश्चय म्हणजे सम्यक संकल्प होय. साधकाला साधनेसाठी सम्यक संकल्पाची आवश्यकता असते. सदाचाराचा साधनेला उपयोगी ठरणाऱ्या निर्णयाचा संकल्प करणे जरूर ठरते . अद्रोह, अहिंसा,निष्कामता आणि तृष्णा वा वासनानाश तथा त्यागाचा दृढ  संकल्प यात अभिप्रेत असतो. अविद्याश्रीत संस्कारांना निर्मळ करण्यास ज्ञानमय संकल्प करणे म्हणजेच  सम्यक संकल्प होय.  मराठी संतांवर सम्यक संकल्पाचा प्रभाव जाणवतो.  खास करून तुकाराम महाराज बुद्धाच्या जास्तच जवळ गेलेले वाटत आहेत.  कारण त्यांच्याच साहित्यात बुद्ध तत्वांचा वापर जास्त आहे बुद्ध शिकवणीला आपलेसे केलेलं पाहायला मिळते. तुकाराम महाराज म्हणतात , स्वतः आपल्या हातानी संसाराला आग लावून बाहेर पडल्यावर मागे वळून पाहू नये . जसा दिपावर जळणारा पतंग मागे -पुढे पाहत नाही .  सवंसारा आगी लावुलेनी हाते । लावूनी मागे पहात नाही ।।  तुका म्हणे व्हावे तयापरी धीट । पतंग हा नीट दिपावरी ।। ३४१४ संकल्पपूर्वक सर्व लौकिकाची लाज बाळगून अन्नवस्त्राची लालसा लागल्यास देव उपेक्षित नाही .  सांडूनियां सर्व लौकिकाची लाज । आळवा यदुराज भक्तिभावे ।। पाहुनिया झाडे बर

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : १

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतावर प्रभाव भाग : 1 सम्यक दृष्टी : म्हणजे मध्यम दृष्टिकोनातून विचार करणे मध्यम मार्गीय ज्ञानाला अथवा विचार करण्याच्या पद्धतीला सम्यक दृष्टी म्हणतात . यात कुशल अकुशल म्हणजे भल्या वाईट गोष्टीचे ज्ञान अपेक्षित आहे. हिंसा,चिरो,व्यभिचार किंवा मिथ्याचाराचा समावेश अकुशल कायिक कर्मात होतो.असत्य,चुगली,कटू वा कठोर वचन आणि व्यर्थ बडबड हे वाचिक अकुशल काम होत. अविद्या,लोभ, व्यापाद, प्रतिहिंसा आणि मिथ्यादृष्टी धारणा हि मानसिक अकुशल कर्मे होत. ह्या अकुशल कर्मांच्या विरुद्ध कृतीला कुशल हि संज्ञा होय. सम्यक दृष्टीचा मराठी संतावर झालेला परिणाम : कुशल याला संतांनी योग्य वा शुभ आणि अकुशल याला अयोग्य वा अशुभ अश्या संज्ञा वापरल्या आहेत आणि यांच्या आचारांच्या मूळ कारणांना विचारपूर्वक ओळखणे हाच अर्थ सम्यक दृष्टीत अभिप्रेत आहे . हि सम्यक दृष्टी केवळ कायिक आचारापुरातीच सीमित नसून तिचा व्याप मानसिक आणि वाचिक आचारणापर्यंत पसरला आहे . बुद्धाच्या मूलगामी विचारांची गरुडझेप जीवनाच्या प्रत्येक अंगाशी संबंधित असून काया,वाचा, आणि मने करून सदाचाराची तीत अपेक्षा आहे . म्हणून सम्यक दृष्टीम